AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवी मुंबईत भंगाराच्या गोदामात झोपलेल्या तीन कामगारांची हत्या

तुर्भे एमआयडीसीतील भंगाराच्या गोदामात तीन कामगारांचा निघृण खून करण्यात आला. बोनसरी गावात ही थरारक घटना घडली. झोपेत असलेल्या कामगारांची हत्या झाल्याने परिसरात खळबळ उडाली.

नवी मुंबईत भंगाराच्या गोदामात झोपलेल्या तीन कामगारांची हत्या
| Updated on: Jul 13, 2019 | 12:57 PM
Share

नवी मुंबई : तुर्भे एमआयडीसीतील भंगाराच्या गोदामात तीन कामगारांचा निघृण खून करण्यात आला. बोनसरी गावात ही थरारक घटना घडली. झोपेत असलेल्या कामगारांची हत्या झाल्याने परिसरात खळबळ उडाली. आर्थिक व्यवहारातून हे तिहेरी हत्याकांड झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.  तुर्भे एमआयडीसीतील बोनसरी गावाजवळ अनधिकृतपणे चालत असलेल्या भंगाराच्या गोदामामध्ये हा प्रकार घडला.

झोपेच्यावेळीच हे हत्याकांड झालं असावं. या हत्येमागे चोरीऐवजी पैशांच्या देवाण-घेवाणीचा वाद असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे.

मारेकऱ्यांनी तीनही कामगारांच्या डोक्यात जड वस्तूने हल्ला केला, त्यानंतर त्यांच्यावर कोयत्याने सपासप वार करुन ही हत्या केली.  या हत्येनंतर त्यांचे मृतदेह त्याच ठिकाणी लपवण्यात आले होते. शनिवारी सकाळी हा प्रकार उघडकीस येताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, तपास सुरु केला.

घटनास्थळी पोलिसांचं डॉग स्क्वॉड आणि फिंगर प्रिंट शोधणारी टीम दाखल झाली. मारेकऱ्यांना शोधण्यासाठी पोलिसांची विविध पथकं अनेकस्थळी रवाना झाली आहेत.

Follow Us
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास.
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी.
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!.
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.