AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav Thackeray : ‘कोल्हापूर पासून ते चंद्रपूर, जिथे जातो तिथे अदानी; खाणी ते शाळाही अदानीला दिल्या’, उद्धव ठाकरेंचा मोठा आरोप

"हे संकट फार मोठं आहे. जसं म्हणतो की आसमानी आणि सुलतानी, तसं आपल्या महाराष्ट्राच्यासमोर अदानीची सुल्तानी हे फार मोठं संकट आहे. अदानीची सुलतानी. आम्ही फेक नरेटिव्ह बोलत असू तर धारावीसाठी या सरकारने जे आदेश काढले आहेत", अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

Uddhav Thackeray : 'कोल्हापूर पासून ते चंद्रपूर, जिथे जातो तिथे अदानी; खाणी ते शाळाही अदानीला दिल्या', उद्धव ठाकरेंचा मोठा आरोप
उद्धव ठाकरे यांची अदानींचा उल्लेख करत महायुतीवर टीका
| Updated on: Nov 17, 2024 | 9:45 PM
Share

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज मुंबईतील बीकेसीत जाहीर प्रचारसभा पार पडली. यावेळी त्यांनी महायुतीवर सडकून टीका केली. विशेष म्हणजे महायुती सरकारने धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानी उद्योग समूहाला दिल्याने त्यावर उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला. महायुती सरकारने फक्त धारावी नाही तर अनेक क्षेत्रात अदानी उद्योह समूहाला प्रकल्प दिल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. यावेळी त्यांनी कोल्हापूर आणि चंद्रपूरचंदेखील उदाहरण दिलं. “महायुती सरकार नुसती धारावी नाही तर आख्खी मुंबई ही अदानीच्या घशात घालत आहे. केवळ धारावीच नव्हे, आख्खी मुंबईच नव्हे, तर मुंबईच्या आसपासचा परिसर देखील अदानींच्या घशात घालत आहेत”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

“जिथे जातो तिथे अदानी. म्हणजे मी प्रचाराची सुरुवात केली कोल्हापूरपासून तिथले आपले राधानगरीचे आमदार के. पी. पाटील म्हणाले की, आमच्या इथलं पाणी सुद्धा अदानीला विकलेलं आहे. चंद्रपूरमध्ये गेलो. तिथल्या खाणी आणि शाळा सुद्धा अदानींना दिलेल्या आहेत. आज पालघरला गेलो. तिथलं वाढवण बंदर झाल्यानंतर अदानीला देऊन टाकणार आहेत. विमानतळ अदानी, बंदर अदानी, आपल्याला वीज येते ती महाराष्ट्रभराची विजय अदानीकडे, खाणी अदानीकडे, सगळे उद्योगधंदे अदानीकडे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

‘अदानीची सुल्तानी हे फार मोठं संकट’

“हे संकट फार मोठं आहे. जसं म्हणतो की आसमानी आणि सुलतानी, तसं आपल्या महाराष्ट्राच्यासमोर अदानीची सुल्तानी हे फार मोठं संकट आहे. अदानीची सुलतानी. आम्ही फेक नरेटिव्ह बोलत असू तर धारावीसाठी या सरकारने जे आदेश काढले आहेत, मिठागर अदानीला, दहीसर टोलनाका अदानीला, मुलुंडचा टोलनाका अदानीला, कुर्ल्याची मदर डेअरी अदानीला. हे सरकारचेच आदेश आहेत. हे तर काही फेक नरेटिव्ह नाहीत. नंतर आपलं सरकार आल्यानंतर मी ते आदेश फेकून फाडून देईन हे सुद्धा मी आज सांगतोय. जणू काही इथे कुणी माणसं राहतच नाहीत”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

(हेही वाचा : ‘मला पंकजा ताईला खास धन्यवाद द्यायचे, तू फार मोठं काम केलंस’, ठाकरे नेमकं काय म्हणाले?)

Follow Us
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दरवाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दरवाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.
शहरातही आता चुलींना मागणी वाढली, गॅस सिलिंडर टंचाईवर शोधला उपाय
शहरातही आता चुलींना मागणी वाढली, गॅस सिलिंडर टंचाईवर शोधला उपाय.
खरातवर आणखी दोन गुन्हे दाखल, एकूण गुन्ह्यांची संख्या १०, हवाला रॅकेट..
खरातवर आणखी दोन गुन्हे दाखल, एकूण गुन्ह्यांची संख्या १०, हवाला रॅकेट...