AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमित शाह यांच्यासाठी नियम बदलले काय?; उद्धव ठाकरे यांचा निवडणूक आयोगाला सवाल

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला एक खरमरीत पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी निवडणूक आयोगाने आचारसंहितेत काही बदल केला आहे का? असा सवाल केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मतदारांना रामलल्लाचं दर्शन मोफत घडवून आणण्याचं आश्वासन दिलं आहे. त्यामुळे निवडणुकीत असे मुद्दे घेतले तर चालतील का? असा सवाल ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला केला आहे.

अमित शाह यांच्यासाठी नियम बदलले काय?; उद्धव ठाकरे यांचा निवडणूक आयोगाला सवाल
uddhav thackeray Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 16, 2023 | 2:59 PM
Share

मुंबई | 16 नोव्हेंबर 2023 : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मध्यप्रदेशच्या निवडणुकीत मतदारांना अयोध्येतील रामल्लाचं मोफत दर्शन देण्याचं आश्वासन दिलं आहे. शाह यांच्या या आश्वासनाला माजी मुख्यमंत्री उद्द व ठाकरे यांनी हरकत घेतली आहे. निवडणुकीत धार्मिक गोष्टींचं आश्वासन देता येतं काय? निवडणूक आयोगाने आचारसंहितेत बदल केला आहे काय? की भाजपला नियमातून डावललं गेलं आहे. नियम फक्त आम्हालाच आहे काय? असा सवाल करणारे खरमरीत पत्र उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला लिहिलं आहे. पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांनी याबाबतची माहितीही दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकाच्या निवडणुकीत बजरंग बली की जयचा नारा दिला होता. त्यावेळी त्यांच्यावर काहीच कारवाई झाली नाही. आता मध्यप्रदेशाच्या निवडणुकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मोफत रामलल्लाचं दर्शन घडवून देण्याचं आश्वासन मतदारांना दिलं आहे. निवडणुकीत धर्मावर आधारीत विधानं करून मतदान मागता येत नाहीत.

हा नियम आता निवडणूक आयोगाने शिथील केला आहे काय? धार्मिक आधारावर मतं मागितली म्हणून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या सहा शिलेदारांचा मतदानाचा हक्क काढून घेण्यात आला होता. ते चुकीचं होतं की बरोबर? मोदी आणि शाह आता जे करत आहेत ते योग्य आहे काय? आचारसंहितेत बसतं का? निवडणूक आयोगाने नियम शिथील केले का? केले असतील तर कधी केले?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

सरकारी भाषेत अवगत करा

निवडणूक आयोगाने आचार संहितेत बदल केला असेल तर तो सर्वच राजकीय पक्षांना सांगितला पाहिजे. केवळ हा बदल केल्याचं भाजपलाच सांगितलं का?, असा सवाल करतानाच राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि अरविंद केजरीवाल यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. यावरून निवडणूक आयोग जागरूक आहे हे दिसून येतं. मोदी आणि शाह यांनी निवडणुकीत जे केलं ते चुकीचं आहे असं वाटत नाही. मग आम्ही जे केलं होतं ते अयोग्य होतं का? हे आम्हाला निवडणूक आयोगाने सांगावं. आम्हाला आपल्या सरकारी भाषेत अवगत केलं तरी चालेल, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. याबाबतचं पत्र निवडणूक आयोगाला पाठवल्याचं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

Follow Us
उदय सामंत: 'एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य'
उदय सामंत: एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य
मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे
'मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे', रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेंची प्रतिक्रिया
मराठी न बोलल्यास परवाना रद्द करण्याच्या धमक्यांवरचा दुबेंचा इशारा
संजय दुबे यांचा प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषेच्या सक्तीला थेट विरोध
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल:
शरद पवार एनडीएमध्ये जाणार नाहीत, विरोधातच राहणार
पवारांकडून एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या; पक्ष कार्यकर्त्यांना दिले स्पष्ट निर्देश
देशमुखांचं कारागृह महानिरीक्षकांना पत्र; गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी
धनंजय देशमुखांचे बीड कारागृह महानिरीक्षकांना पत्र: गैरप्रकार चौकशी आणि आरोपी स्थलांतराची मागणी
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर? ठाण्यातील कार्यक्रमात भाजप नेत्यांची अनुपस्थिती
बेस्ट कामगारांचा बेमुदत संप; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
बेस्ट कामगारांचा मंगळवारपासून बेमुदत संप: प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
पालकमंत्री महाजनांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना मदत
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना अवयव प्रत्यारोपणासाठी मदत