AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमित शाह यांच्यासाठी नियम बदलले काय?; उद्धव ठाकरे यांचा निवडणूक आयोगाला सवाल

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला एक खरमरीत पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी निवडणूक आयोगाने आचारसंहितेत काही बदल केला आहे का? असा सवाल केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मतदारांना रामलल्लाचं दर्शन मोफत घडवून आणण्याचं आश्वासन दिलं आहे. त्यामुळे निवडणुकीत असे मुद्दे घेतले तर चालतील का? असा सवाल ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला केला आहे.

अमित शाह यांच्यासाठी नियम बदलले काय?; उद्धव ठाकरे यांचा निवडणूक आयोगाला सवाल
uddhav thackeray Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 16, 2023 | 2:59 PM
Share

मुंबई | 16 नोव्हेंबर 2023 : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मध्यप्रदेशच्या निवडणुकीत मतदारांना अयोध्येतील रामल्लाचं मोफत दर्शन देण्याचं आश्वासन दिलं आहे. शाह यांच्या या आश्वासनाला माजी मुख्यमंत्री उद्द व ठाकरे यांनी हरकत घेतली आहे. निवडणुकीत धार्मिक गोष्टींचं आश्वासन देता येतं काय? निवडणूक आयोगाने आचारसंहितेत बदल केला आहे काय? की भाजपला नियमातून डावललं गेलं आहे. नियम फक्त आम्हालाच आहे काय? असा सवाल करणारे खरमरीत पत्र उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला लिहिलं आहे. पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांनी याबाबतची माहितीही दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकाच्या निवडणुकीत बजरंग बली की जयचा नारा दिला होता. त्यावेळी त्यांच्यावर काहीच कारवाई झाली नाही. आता मध्यप्रदेशाच्या निवडणुकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मोफत रामलल्लाचं दर्शन घडवून देण्याचं आश्वासन मतदारांना दिलं आहे. निवडणुकीत धर्मावर आधारीत विधानं करून मतदान मागता येत नाहीत.

हा नियम आता निवडणूक आयोगाने शिथील केला आहे काय? धार्मिक आधारावर मतं मागितली म्हणून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या सहा शिलेदारांचा मतदानाचा हक्क काढून घेण्यात आला होता. ते चुकीचं होतं की बरोबर? मोदी आणि शाह आता जे करत आहेत ते योग्य आहे काय? आचारसंहितेत बसतं का? निवडणूक आयोगाने नियम शिथील केले का? केले असतील तर कधी केले?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

सरकारी भाषेत अवगत करा

निवडणूक आयोगाने आचार संहितेत बदल केला असेल तर तो सर्वच राजकीय पक्षांना सांगितला पाहिजे. केवळ हा बदल केल्याचं भाजपलाच सांगितलं का?, असा सवाल करतानाच राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि अरविंद केजरीवाल यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. यावरून निवडणूक आयोग जागरूक आहे हे दिसून येतं. मोदी आणि शाह यांनी निवडणुकीत जे केलं ते चुकीचं आहे असं वाटत नाही. मग आम्ही जे केलं होतं ते अयोग्य होतं का? हे आम्हाला निवडणूक आयोगाने सांगावं. आम्हाला आपल्या सरकारी भाषेत अवगत केलं तरी चालेल, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. याबाबतचं पत्र निवडणूक आयोगाला पाठवल्याचं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.