AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vidhan Parishad Election : क्या नाराजी नाराजी बोल रहें हो बार बार, विधान परिषदेबाबत विचारल्यावर अजित पवारांचं तिखट उत्तर

यावेळी अजित पवारांना महाविकास आघाडीतील नाराजीबाबत विचारले असतात, क्या नाराजी क्या नारजी बोल रहे हो बार बार, आमच्यात कुणीही नाराज नाही, अशी प्रतिक्रिया देताना ते दिसून आले. तसेच मित्रपक्षांची मतं मिळवण्याचा प्रयत्न आम्ही करतोय असेही त्यांनी स्पष्ट केलं.

Vidhan Parishad Election : क्या नाराजी नाराजी बोल रहें हो बार बार, विधान परिषदेबाबत विचारल्यावर अजित पवारांचं तिखट उत्तर
Image Credit source: tv9
दादासाहेब कारंडे
दादासाहेब कारंडे | Updated on: Jun 18, 2022 | 3:43 PM
Share

मुंबई : राज्यात सध्या विधान परिषदेच्या निवडणुकांचा (Vidhan Parishad Election) धुरळा उडाला आहे. यातच आता आमदारांना सर्वच राजकीय पक्षांकडून फोनाफोनी सुरू आहे. शिवसेनेने (Shivsena) आपले आमदार आधीच हॉटेलवर ठेवले आहेत. त्यात काही अपक्ष आमदारही आहेत. आज अजित पवारांना (Ajit Pawar) विधान परिषदेबाबात पत्रकारांनी काही प्रश्न विचारले, यावेळी अजित पवार काही तिखट उत्तरं देताना दिसून आले. तसेच अपक्ष आमदारांना सर्वच राजकीय पक्षांनी फोन केल्याचेही त्यांनी मान्य केले. मात्र याबाबत मुख्यमंत्र्यांना सांगितल्याचे स्पष्टीकरणही त्यांनी दिले. यावेळी अजित पवारांना महाविकास आघाडीतील नाराजीबाबत विचारले असतात, क्या नाराजी क्या नारजी बोल रहे हो बार बार, आमच्यात कुणीही नाराज नाही, अशी प्रतिक्रिया देताना ते दिसून आले. तसेच मित्रपक्षांची मतं मिळवण्याचा प्रयत्न आम्ही करतोय असेही त्यांनी स्पष्ट केलं.

आमची सर्वांची एकजूट आहे

या विधान परिषदेच्या निवडणुकीत मतं बाद होणार नाहीत याच्यासाठी काळजी घेतोय. राज्यसभेत काय घडलंय सर्वांनी पाहिलं आहे. मात्र यावेळी शिवसेनेचे उमेदवार निवडून येतील. महाविकास आघाडीची एकजूट आहे. आम्ही एकमेकांना भेटतो आहे. अपक्षांना काही नेत्यांनी फोन केले हे खरं आहे. मुख्यमंत्री सांगितील तसं आम्ही मतदान करू असे आमदारांनी सांगितलं आहे. असे स्पष्टीकरण अजित पवारांनी दिले आहे. तसेच ज्याला मतं कमी पडतील तो बाहेर होईल, असेही अजित पवार म्हणाले आहेत.

पवार बैठकीला मार्गदर्शन करणार

तर आज संध्याकाळी आमच्या आमदारांची बैठक आहे. या बैठकीला शरद पवार मार्गदर्शन करणार आहेत. मला अजून कोणत्याही सूचना आल्या नाही. कुणीही दबाव आणल्याचे अजून सांगितलं नाही. यावेळी आमदार निवडून देत असताना आपल्याकडे व्यवस्थित कोटा आहे. मागच्या वेळी आमचे उमेदवार निवडून देऊन कमी मतं उरत होती. त्यामुळे आम्ही एकत्र बैठक घेतली होती. मात्र आता शिवसेनेचे दोन उमेदवार निवडून येतील असं चित्र आहे. आम्हाला थोडी संख्या कमी पडतेय त्याबाबत आम्ही अपक्षांची मदत घेऊ, असेही अजित पवार म्हणाले.

अग्निपथ योजनेबाबत काय म्हणले?

तसेच अजित पवार यांनी अग्निपथ योजना आणि त्यावरून सुरू असलेल्या आंदोलनावरही भाष्य केलं आहे. अग्निपथ योजनेविरोधात तरुणांचा रोष पहायाला मिळाला. तरुणांच्या आंदोलनात सार्वजनिक संपत्तीचं नुकासान झालं. केंद्राने आधीच वयाची मर्यादा वाढवली असती तर हे झालं नसतं. तरुणाईवर अन्याय होणार नाही याची काळजी घेऊ, पण राष्ट्रीय संपत्तीचं नुकसान करणे योग्य नाही, असेही अजित पवारांनी यावेळी बजावलं आहे.

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.