AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vidhan Parishad Election : भाजपवाले नक्कीच थर्ड अंपायरकडे जाऊ शकतात, रोहित पवारांचं विधान परिषदेबाबत भाकीत, राज्यसभेचा किस्सा पुन्हा?

भाजपवाले नक्की थर्ड अंपायरकडे जाऊ शकतात. मविआ चिडली असं ते म्हणू शकतात. किंवा मत बाद करु शकतात, असे म्हणत त्यांनी राज्यसभेच्या मतदानावेळी घेतलेल्या आक्षेपावरही भाष्य केलं आहे. त्याची पुन्हा पुरावृत्ती होऊ शकते, असा अंदाजही रोहित पवारांनी वर्तवला आहे.

Vidhan Parishad Election : भाजपवाले नक्कीच थर्ड अंपायरकडे जाऊ शकतात, रोहित पवारांचं विधान परिषदेबाबत भाकीत, राज्यसभेचा किस्सा पुन्हा?
Image Credit source: tv9
| Updated on: Jun 19, 2022 | 3:16 PM
Share

मुंबई : उद्या राज्यात विधान परिषदेच्या (Vidhan Parishad Election) दहा जागांसाठी मतदान पार पडत आहे. त्यासाठी तयारी जोरदार सुरू आहे. या निवडणुकीबाबत महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि भाजप (BJP) अशी दोन्हींकडून जोरदार फिल्डिंग लावली जात आहे. दोन्हीकडून विजयाचे दावेही केले जात आहेत. या निवडणुकीबाबतच आता आमदार रोहित पवार यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी विधान परिषदेचं गणित हे क्रिकेटच्या भाषेत समजावून सांगितलं आहे. तसेच एखादी मॅच हरतो त्यातून शिकावं लागलं. पीच तेच, प्रतिस्पर्धी तेच आहे. त्यामुळे आपण सर्व काळजी घेऊ, पण भाजपवाले नक्की थर्ड अंपायरकडे जाऊ शकतात. मविआ चिडली असं ते म्हणू शकतात. किंवा मत बाद करु शकतात, असे म्हणत त्यांनी राज्यसभेच्या मतदानावेळी घेतलेल्या आक्षेपावरही भाष्य केलं आहे. त्याची पुन्हा पुरावृत्ती होऊ शकते, असा अंदाजही रोहित पवारांनी वर्तवला आहे.

आमच्यात कुणीही नाराज नाही

तसेच रोहित पवार यांनी आमदारांच्या नाराजीबाबत आणि त्यांना वेळ देण्याबाबतही भाष्य केलं आहे. अजितदादा नेहमी सर्व आमदारांना वेळ देतात, शिवसेना नाराज नाही. मात्र राऊतांनी जाहीर ॲलिगेशन लावले ते व्हायला नको होतं. पण आता आमदारांची नाराजी दूर केली आहे. आमच्याकडे नेहमी संवाद असतो, असेही रोहित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. तर निवडणूक आयोगावर आमची विश्वास आहे. उद्या रन आऊट कोणी होणार नाही याची काळजी घेतली जाईल. पाच उमेदवार आहेत त्यापैकी दुसरा तिसराही रन आऊट होऊ शकतो, असेही रोहित पवार म्हणाले आहेत.

मलिक, देशमुखांना मतदानाचा हक्क नाकारणे खेळी

तर नाराजीच्या बातम्या पेरल्या जात आहेत, असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.  अशा बातम्या पसरवले जात आहे .कितीही भ्रम तयार भाजपने केला तर त्यांना त्याचे फळ मिळणार नाही. तसेच याविषयी कधीही चर्चा झाली नाही तिन्ही नेते आणि महाविकास आघाडीचा संवाद उत्तम आहे, तसेच नवाब मलिकांना आणि अनिल देशमुख यांना मतदानाचा हक्क डावळला आहे. संविधान आणि नैतिक अधिकार डावलणं चुकीचं आहे. 302 च्या कैद्याला मतदानाचा हक्क असतो. मात्र या ठिकाणी कोणत्या कलमाणे नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मतदानापासून लांब ठेवण्यात आलंय? असा सवालही राऊतांनी केला आहे. महाविकास आघाडीची 2 मते कमी करण्यासाठी हे पडद्या मागून  सर्व सुरू आहे, त्यामुळे लोकशाही धोक्यात आली आहे, असेही संजय राऊत म्हणाले आहेत.

Follow Us
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता.
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान.
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड.
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम.
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती.
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?.
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही.....
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही......
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?.
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके...
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके....
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं.