मोठी बातमी! विनायक मेटे यांचा हुकमी एक्का, शिवसंग्रामचा तरुण चेहरा शिंदे गटात

शिवसंग्राम पक्षाचे दिवंगत अध्यक्ष विनायक मेटे यांचा अत्यंत जवळचा सहकारी, पक्षाचा तरुण चेहरा अशी ओळख असलेला नेता आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात जाणार असल्याची माहिती समोर आलीय.

मोठी बातमी! विनायक मेटे यांचा हुकमी एक्का, शिवसंग्रामचा तरुण चेहरा शिंदे गटात
Follow us
| Updated on: Nov 19, 2022 | 5:56 PM

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाची बातमी समोर आलीय. शिवसंग्राम पक्षाचे दिवंगत अध्यक्ष विनायक मेटे यांचा अत्यंत जवळचा सहकारी, पक्षाचा तरुण चेहरा अशी ओळख असलेले शिवसंग्राम युवकचे प्रदेशाध्यक्ष उदय आहेर यांनी खूप मोठा निर्णय घेतलाय. उदय आहेर गेल्या अनेक वर्षांपासून शिवसंग्राम पक्षासोबत काम करत आहेत. पण शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे यांच्यासोबत उडालेल्या खटक्क्यांमुळे त्यांनी आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळालीय. या वृत्तामुळे विनायक मेटे यांच्या निधनानंतर शिवसंग्राम पक्षात फुट पडली की काय? अशा चर्चांना आता उधाण आलंय.

शिवसंग्राम पक्षातील जवळपास 90 टक्के पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपल्यासोबत शिंदे गटाला पाठिंबा दर्शवणार असल्याची माहिती खुद्द उदय आहेर यांनी दिलीय. उदय आहेर यांनी आपल्या भूमिकेबाबत ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली.

“विनायक मेटे यांच्या निधनानंतर शिवसंग्राममध्ये नेतृत्वाची खूप मोठी पोकळी निर्माण झालीय. फक्त शिवसंग्रामच नाही तर इतरही मराठा समाज आणि बारा बलुतेदार समाजासाठी विनायक मेटे यांचा आधार होता. त्यांच्या निधनानंतर खूप मोठी पोकळी निर्माण झालीय”, असं उदय आहेर म्हणाले.

हे सुद्धा वाचा

“मराठा समाज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचा प्रश्न, शेतकरी पेन्शन योजना आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंच आणि इतरही प्रश्न आहेत, त्यांचं निरसन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आश्वासक चेहरा आहे. एकनाथ शिंदे हे प्रश्न सोडवू शकतात. त्यामुळे शिवसंग्रामच्या जवळपास 90 टक्के पदाधिकाऱ्यांनी, आम्ही सगळ्यांनी मिळून निर्णय घेतलाय की आता शिवसंग्रामचा पाठिंबा एकनाथ शिंदे यांना द्यायचा”, अशी भूमिका उदय आहेर यांनी मांडली.

शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे यांनी कुणीही पदाधिकारी शिंदे गटात गेले नाहीत, असं विधान केलंय. त्यांच्या या प्रतिक्रियेबाबत उदय आहेर यांना प्रश्न विचारला असता, “एकटं उरल्यानंतर अशी आदळाआपट होणारच आहे. किती पदाधिकारी त्यांच्यासोबत आहेत हे आता लवकरच कळेल. सगळ्या पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री उदय सामंत यांच्यासोबत बैठक झालीय”, असा गौप्यस्फोट उदय आहेर यांनी केला.

“मुंबईत खूप मोठा मेळावा घेऊन आम्ही आमचं शिंदे गटाला समर्थन जाहीर करणार आहोत. त्यामुळे तानाजी शिंदे काय बोलतात या गोष्टीला आम्ही फार महत्त्व देत नाहीत”, अशी प्रतिक्रिया उदय आहेर यांनी दिली.

दरम्यान, शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे यांनी नुकतंच उदय आहेर यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचं वृत्त समोर आलं होतं. त्यामुळे संतापलेल्या उदय आहेर यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

Non Stop LIVE Update
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.