AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वांद्रे-जोगेश्वरीत पाणी कपात, आंघोळ, कपडे, भांडी धुण्यासाठी बिस्लरीचं पाणी

वांद्रे ते जोगेश्वरी विभागात गेले तीन दिवस पाणी नसल्यामुळे तेथील रहिवाशांच्या समस्या वाढू लागल्या (Water shortage due to metro) आहेत.

वांद्रे-जोगेश्वरीत पाणी कपात, आंघोळ, कपडे, भांडी धुण्यासाठी बिस्लरीचं पाणी
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Feb 02, 2020 | 9:24 AM
Share

मुंबई : वांद्रे ते जोगेश्वरी विभागात गेले तीन दिवस पाणी नसल्यामुळे तेथील रहिवाशांच्या समस्या वाढू लागल्या (Water shortage due to metro) आहेत. मेट्रोच्या कामामुळे वांद्रे ते जोगेश्वरी विभागात पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्यामुळे येथे पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. असे असूनही अजून पालिकेने याची दखल घेतली नसून लोकांनी संताप व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे पाणी नसल्याने लोकांनी थेट बिस्लरी बॉटलचे पाणी कपडे, भांडी आणि आंघोळीसाठी विकत (Water shortage due to metro) घेतलं आहे.

जोगेश्वरी पूर्व येथील कोकण नगरमध्ये काही लोक टँकरने आपल्या घरात पाणी भरत आहेत. तर काहींनी बिस्लरी बॉटल विकत घेतल्या आहेत. गेले तीन दिवस लोक रस्त्यावर पाणी भरण्यासाठी गर्दी करत आहेत. पण दररोज बिस्लरी बॉटल विकत घेणेही सर्वसामान्य व्यक्तीला परवडणे कठीण आहे. त्यामुळे लवकरात लवकर फुटलेल्या पाईप लाईनचे काम पूर्ण करुन पाणी सुरु करावे, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

“वांद्रे ते जोगेश्वरी या विभागात गेले तीन दिवस पाणी नसल्याने लोक हैराण झालेले आहेत. अंधेरी ईस्टमधल्या अनेक सोसायट्यांमध्ये लोक हवालदिल झालेत. या मेट्रोच्या कामामुळे एक महत्वाची पाईपलाईन फुटली आणि प्रचंड प्रमाणात पाणी वाहून गेलं. या विभागातल्या हजारो लोकांना वेठीला धरल्या सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच कुठेही टँकर्स उपलब्ध होत नाहीयेत”, असं अभिनेता किशोर कदम उर्फ कवी सौमित्रने सांगितलं

“वांद्रे ते जोगेश्वरी विभागात गेले तीन दिवस पाणी नसल्याने लोक हैराण झाले आहेत. पाण्याच्या टँकर्सच्या दरातही वाढ झाली आहे. घरात एक थेंबही पाणी नाही. दररोज बिस्लरीच पाणी किती खरेदी करणार? जे विकत घेऊ शकत नाही त्यांचं काय, विभागातील शासकीय अधिकारी यावर लक्ष देतील का?” असा सवाल अभिनेता किशोर सौमीत्रने उपस्थित केला आहे.

पाणी कपातीमुळे टँकर्सच्या दरातही वाढ

पाणी कपात असल्यामुळे पाण्याच्या टँकर्सनेही आपल्या दरात वाढ केली आहे. या सगळ्यांनी चौदाशेवरुन थेट पाच-सह हजारांवर आपले दर नेले आहेत. पालिकेच्या ऑफिसमध्ये लोक टँकर्ससाठी रांगा लावून लोक उभे आहेत.

Follow Us
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
Pune Protest | पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या भिंतीवर चढल्या, मागणी काय?
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी
मोठी बातमी! अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी; कोर्टाचा मोठा निर्णय
फडणवीसांच्या PM शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा
Uddhav Thackeray | फडणवीसांच्या PM पदाच्या शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा; मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर....
नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की...
Pune Nasrapur Case | नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की जन्मठेप?; निकाल थोड्याच वेळात...
छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या..
Rohit Pawar | छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारला इशारा