AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai: पावसाने दडी मारल्याने पाणीकपातीचे संकट, 7 तलावांत फक्त 11 टक्के पाणी

मुंबईला पाणी पुरवणाऱ्या सात तलांवात फक्त 11 टक्के पाणी शिल्लक आहे.

Mumbai: पावसाने दडी मारल्याने पाणीकपातीचे संकट, 7 तलावांत फक्त 11 टक्के पाणी
पाणीकपातीचे संकटImage Credit source: (Image Google)
Siddhi Bobade
Siddhi Bobade | Edited By: सिद्धेश सावंत | Updated on: Jun 19, 2022 | 10:18 AM
Share

मुंबई: अर्धा जून (June) महिना संपून गेला तरी पावसाचा पत्ता नसल्याने मुंबईवर (Mumbai) पाणीकपातीचे संकट ओढावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुढील आठवडाभर पावसाने (Rain) दडी मारल्यास तलावांत उपलब्ध पाण्याचा आढावा घेऊन 10 ते 15 टक्क्यांपर्यंत पाणीकपात होण्याची शक्यता पालिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली. मुंबईला पाणी पुरवणाऱ्या सात तलांवात फक्त 11 टक्के पाणी शिल्लक आहे.

मुंबईला मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार आणि भातसा अशा सात धरणांमधून दररोज 3800 दशलक्ष लिटर शुद्ध पाण्याचा पुरवठा केला जातो. या वर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात तलावातील पाण्याची पातळी समाधानकारक असताना आता मात्र तीन वर्षांतील आजच्या दिवसाची सर्वात कमी पाणीसाठा शिल्लक राहिला असल्याचे समोर आले आहे. सद्यस्थितीत तलावांत 160831 दशलक्ष लिटर पाणीसाठा शिल्लक असून तो पुढील ४२ दिवसांना पुरणारा आहे. पावसाने आणखी ओढ दिल्यास आठवडाभरानंतर उपलब्ध पाणीसाठा पाहून पाणीकपातीबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

तलावातील सध्याचा पाणीसाठा

मोडकसागर – 48375 दशलक्ष लिटर

तानसा    –  6088 दशलक्ष लिटर

मध्य वैतरणा-  23729 दशलक्ष लिटर

भातसा   – 76788 दशलक्ष लिटर

विहार – 3715  दशलक्ष लिटर

तुलसी – 2164 दशलक्ष लिटर

आठवडाभर वाट पाहून पालिका निर्णय घेणार आहे.

तीन वर्षांतील १८ जूनचा जलसाठा

2022- 160831 दशलक्ष लिटर (11 टक्के)

2021 – 186719 दशलक्ष लिटर (12.90 टक्के)

2020- 1674343 दशलक्ष लिटर (११.५७ टक्के)

Follow Us
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदेंनी सगळं सांगितलं!
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने एकच खळबळ
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच
Eknath Shinde | चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीचा आदेश!
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा
Raj Thackeray | राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा; मोदींच्या मौनावर गंभीर सवाल
आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधान
Rohit Pawar | 'आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधानाने खळबळ
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात
मोठी बातमी! महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात; विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी
मुंबईत भीषण दुर्घटना! शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; सचिन अहिरांच्या प्रवेशानंतर शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही?
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ