AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai: पावसाने दडी मारल्याने पाणीकपातीचे संकट, 7 तलावांत फक्त 11 टक्के पाणी

मुंबईला पाणी पुरवणाऱ्या सात तलांवात फक्त 11 टक्के पाणी शिल्लक आहे.

Mumbai: पावसाने दडी मारल्याने पाणीकपातीचे संकट, 7 तलावांत फक्त 11 टक्के पाणी
पाणीकपातीचे संकटImage Credit source: (Image Google)
| Edited By: | Updated on: Jun 19, 2022 | 10:18 AM
Share

मुंबई: अर्धा जून (June) महिना संपून गेला तरी पावसाचा पत्ता नसल्याने मुंबईवर (Mumbai) पाणीकपातीचे संकट ओढावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुढील आठवडाभर पावसाने (Rain) दडी मारल्यास तलावांत उपलब्ध पाण्याचा आढावा घेऊन 10 ते 15 टक्क्यांपर्यंत पाणीकपात होण्याची शक्यता पालिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली. मुंबईला पाणी पुरवणाऱ्या सात तलांवात फक्त 11 टक्के पाणी शिल्लक आहे.

मुंबईला मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार आणि भातसा अशा सात धरणांमधून दररोज 3800 दशलक्ष लिटर शुद्ध पाण्याचा पुरवठा केला जातो. या वर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात तलावातील पाण्याची पातळी समाधानकारक असताना आता मात्र तीन वर्षांतील आजच्या दिवसाची सर्वात कमी पाणीसाठा शिल्लक राहिला असल्याचे समोर आले आहे. सद्यस्थितीत तलावांत 160831 दशलक्ष लिटर पाणीसाठा शिल्लक असून तो पुढील ४२ दिवसांना पुरणारा आहे. पावसाने आणखी ओढ दिल्यास आठवडाभरानंतर उपलब्ध पाणीसाठा पाहून पाणीकपातीबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

तलावातील सध्याचा पाणीसाठा

मोडकसागर – 48375 दशलक्ष लिटर

तानसा    –  6088 दशलक्ष लिटर

मध्य वैतरणा-  23729 दशलक्ष लिटर

भातसा   – 76788 दशलक्ष लिटर

विहार – 3715  दशलक्ष लिटर

तुलसी – 2164 दशलक्ष लिटर

आठवडाभर वाट पाहून पालिका निर्णय घेणार आहे.

तीन वर्षांतील १८ जूनचा जलसाठा

2022- 160831 दशलक्ष लिटर (11 टक्के)

2021 – 186719 दशलक्ष लिटर (12.90 टक्के)

2020- 1674343 दशलक्ष लिटर (११.५७ टक्के)

Follow Us
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता.
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान.
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड.
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम.
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती.
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?.
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही.....
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही......
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?.
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके...
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके....
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं.