AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंब्य्रात महाराजांचं मंदिर बांधण्याच्या फडणवीसांच्या आव्हानावर काय म्हणाले उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे यांनी सभेत बोलताना सर्व जिल्ह्यांमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज यांचं मंदिर बांधणार असं म्हटलं होतं. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आव्हान दिलं होतं. हिंमत असेल तर मुंब्य्रात मंदिर बांधून दाखवा असं त्यांनी म्हटलं होतं. त्यावर उत्तर देताना उद्धव ठाकरे काय म्हणाले पाहा.

मुंब्य्रात महाराजांचं मंदिर बांधण्याच्या फडणवीसांच्या आव्हानावर काय म्हणाले उद्धव ठाकरे
| Updated on: Nov 06, 2024 | 8:42 PM
Share

कोल्हापुरात महायुतीने प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आव्हान दिले होते की, तुम्ही सर्व जिल्ह्यांमध्ये महाराजांचे मंदिर बांधणार आहात. पण आधी मुंब्र्यात महाराजांचं मंदिर बांधून दाखवा. यावर उत्तर देताना आज उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, ‘देवाभाऊ जाऊ तिथे खाऊ. मुंब्र्यात जा. तिथल्या शिल्पावर आधीच शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले आहे. मुंब्रा ठाणे जिल्ह्यात आहे. तिथला गद्दार फोडला. त्याला मुख्यमंत्री बनवला. त्याच्या जिल्ह्यात शिवाजी महाराजांचं मंदिर बनवणं तुम्हाला आव्हान वाटत असेल तर मग मुख्यमंत्री बनवलाच कशाला?’

‘उद्धव ठाकरे म्हणाले की, मुंबई बचाव करणार आहोत. धारावी बचाव करणार आहोत. आम्ही अदानीच्या घशात जाऊ देणार नाहीत. गावठाणे असो की कोळीवाडे असोत त्यांचं अस्तित्व कायम ठेवून कोळी बांधवांच्या मतानुसार विकास करणार आहे. मासे सुकवण्याची सोय किनाऱ्यावर आहे, कोळीवाड्यात आहे. ते काय गच्चीत मासे सुकवाणार आहेत. मुंबई आणि महाराष्ट्राचं गुजरातीकरण सुरू आहे. ते थांबवण्यासाठी ही निवडणूक आहे. सर्व गुजरातला नेत आहे.’

‘आम्ही शिवाजी महाराज की जय म्हणून हे सर्व प्रश्न षंडासारखे बघत असू तर जगण्याला अर्थ नाही. आम्ही शिवाजी महाराजांचं मंदिर प्रत्येक जिल्ह्यात बांधू. सुरतेला बांधू. मी बोलल्यावर देवाभाऊ बोलले. कारण त्यांना शिवाजी महाराज सहन होत नाही. शिवाजी महाराज म्हटल्यावर अंगाची लाहीलाही होते.’

‘आपल्याकडे आयटम बॉम्ब आहे. पलिकडे फुसकुल्या तडतड्या आहेत. चालू द्या. आपण २३ तारखेला विजयी जल्लोष करत आहोत. कालपासून सभा सुरू झाल्या आहेत. काही लोक म्हणाले, की उत्साह दिसत नाही. मी म्हटलं फराळ तर संपू द्या. लोक म्हणाले, महागाई एवढी वाढली फराळ कसं खाणरा. मी म्हणालो, की ठिक आहे. उद्याच्या सभेत आम्ही तेच फटाके फोडणार आहोत.’

‘आम्ही मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना पाच जीवनाश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवले होते. आनंदाचा शिधामध्ये लेंड्या मिळतात. उंदराच्या लेंड्या मिळतात हा आनंद. आम्ही पाच वस्तूंचे भाव स्थिर ठेवू. शेतकऱ्यांचं नुकसान होऊ न देता करणार आहोत. ९० हजार रुपये प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीचे काढले जात नाही. उद्या श्वास घ्यायलाही टॅक्स लावतील. आपला खिसा मारतात. आणि वरणं योजना येत आहे.’ असं ही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

Follow Us
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर.
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले.
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले.
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची..
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची...
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा.
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल.
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना....
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना.....
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या...
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या....
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना.
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ.