AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईकरांना काय देणार? मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला प्लान

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुलाखतीत म्हटलंय की, मुंबईकरांचा अनेक वेळ हा वाहतुकीमध्ये जातो. त्यामुळे त्यांचा हा वेळ कसा वाचेल याबाबत त्यांचं सरकार काम करणार आहे. मुंबईकरांसाठी देवेंद्र फडणवीस यांच्या काय योजना आहेत जाणून घ्या काय म्हणाले फडणवीस.

मुंबईकरांना काय देणार? मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला प्लान
| Updated on: Dec 06, 2024 | 6:24 PM
Share

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांची रणनीती काय असेल याबाबत खुलासा केला आहे. मुंबईकरांना दररोज अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मुंबईकरांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय काय करणार याबाबत त्यांनी त्यांचा प्लान सांगितला आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘2016 मध्ये मी एक घोषणा केली होती. मुंबईच्या एमएमआर रिजनमधील कोणत्याही भागात एक तासात जाता आलं पाहिजे. आम्ही त्याच्या पुढे जात आहोत. कोस्टल रोड झाला. वर्सोवा मढचं टेंडर दिलं. त्याचं काम सुरू होत आहे. मढपासून विरारपर्यंत सिलिंक तयार केली आहे.’

मुंबईत मेट्रोचं नेटवर्क तयार करणार

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ‘जपान सरकारने ४० हजार कोटी देण्याचं कबूल केलं आहे. त्यामुळे मुंबईची वाहतूक कमी होणार आहे. ३७५ किलोमीटरचं मेट्रो नेटवर्क करणार आहोत. पाच वर्षात हे काम सुरू केलं. हे सर्व काम जेव्हा होईल तेव्हा मुंबईकरांचं एक महत्त्वाचं काम आहे ते पूर्ण होईल. मुंबईकरांचे तीन तास वाचतील. कुटुंबासोबत वेळ घालवता येणार आहे. बस सिस्टिमचा मेकओव्हर करणार आहोत. त्यासोबत मुंबई आणि एमएमआर रिजनमध्ये रहिवास ही मोठी समस्या आहे. ही समस्या आपण सोडवत आहे. आपण काम सुरू केलं आहे. मराठी माणसाला मुंबईतच घर मिळायला पाहिजे हे काम आपण सुरू केलं आहे.’

देवेंद्र फडणवास यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर काल पहिला कॅबिनेट घेतली. अधिकाऱ्यांना वेगाने काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, ही आता सेलिब्रेशनची वेळ नाही. आता महाराष्ट्राच्या इच्छा आकांशा पूर्ण करण्याची वेळ आहे.

महायुतीला मोठं यश मिळाल्यानंतर काल देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या सोहळ्याला अनेक दिग्गज नेते आणि इतर क्षेत्रातील लोकं उपस्थित होते.

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.