AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nilesh Rane on Shivsena: बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री, शिष्य कॅबिनेट मंत्री, पण सत्तेच्या सारीपाटात दिघे कुटुंब कुठे?; निलेश राणेंनी ठेवलं वर्मावर बोट

Nilesh Rane on Shivsena: शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपण आनंद दीघेंवरील धर्मवीर मुक्काम पोष्ट ठाणे हा सिनेमा पाहणार असल्याचं सांगितलं.

Nilesh Rane on Shivsena: बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री, शिष्य कॅबिनेट मंत्री, पण सत्तेच्या सारीपाटात दिघे कुटुंब कुठे?; निलेश राणेंनी ठेवलं वर्मावर बोट
सत्तेच्या सारीपाटात दिघे कुटुंब कुठे?; निलेश राणेंनी ठेवलं वर्मावर बोटImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 14, 2022 | 12:50 PM
Share

मुंबई: शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख दिवंगत आनंद दिघे (anand dighe) यांच्या जीवनावर आधारीत ‘धर्मवीर मुक्काम पोष्ट ठाणे’ हा सिनेमा आला आहे. या सिनेमाचं मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे. यातील आनंद दिघे यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता प्रसाद ओक (prasad oak) यांचंही कौतुक होत आहे. ठाणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच हा सिनेमा आल्याने त्याचा प्रचंड गवगवा सुरू आहे. आनंद दिघे यांच्या पोस्टरला शिवसेनेकडून दुधाचा अभिषेकही करण्यात आला आहे. एकीकडे हे सर्व सुरू असतानाच भाजप नेते निलेश राणे (nilesh rane) यांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा राज्याचा मुख्यमंत्री आहे. दीघेंचे शिष्य एकनाथ शिंदे कॅबिनेट मंत्री आहेत. शिंदेंचे चिरंजीव खासदार आहेत. पण सत्तेच्या सारीपाटात दिघे कुटुंबीय कुठे आहे? असा सवाल निलेश राणे यांनी केला आहे. निलेश राणे यांनी थेट शिवसेनेच्या वर्मावरच बोट ठेवल्याने एकच चर्चा रंगली आहे.

निलेश राणे यांनी ट्विट करून शिवसेनेला डिवचले आहे. बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री, “शिष्य” एकनाथ शिंदें कॅबिनेट मंत्री, मुलगा खासदार, स्व. आनंद दिघे साहेबांच्या घरात साधा नगरसेवक, शाखाप्रमुख नाही पण निवडणूक आली की दिघे साहेब. आज दिघे साहेबांवर आधारीत धर्मवीर नावाचा चित्रपट रिलीज झाला. पण त्यांच्या कुटुंबाचे कुठेच नाव नाही, अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे. त्यामुळे शिवसेनेची चांगलीच कोंडी झाली आहे.

धर्मवीर पाहणार

दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपण आनंद दीघेंवरील धर्मवीर मुक्काम पोष्ट ठाणे हा सिनेमा पाहणार असल्याचं सांगितलं. काल मी सिनेमा पाहायला जाऊ शकलो नाही. पण लवकरच हा सिनेमा पाहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

आनंद दिघेंची कार्यपद्धती चांगली होती

शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी व्हिवियाना मॉलमध्ये जाऊन धर्मवीर हा सिनेमा पाहिला. यावेळी त्यांनी सिनेमावर प्रतिक्रिया व्यक्त केली. चित्रपट चांगला आहे .आनंद दिघे यांचा स्वभाव आणि कार्यपद्धती चांगली होती. शिवसेनेचे नेते आणि शिवसेनेचे नाते जे होते त्यामध्ये प्रेम होतं. माझ्या वडिलांसोबत त्यांचे संबंध चांगले होते. ते ठाण्यात पेपर प्रॉडक्ट कंपनी येथे काम करत होते. नवीन तरुणांसाठी आक्रमकता सोडायची नाही. शिवसेना वाढणारच आहे आणि ठाण्याची शिवसेना मागे हटणार नाही. दिघे साहेबांचे महत्व महाराष्ट्रमध्ये देखील आहे. ते इतर जिल्ह्यात मार्गदर्शन करत असे. त्याचे मार्गदर्शन अनेकजण घेत असे, असं शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी सांगितलं.

Follow Us
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये...
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये....
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले.
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त.
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?.
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला.
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान.
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग.
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह.
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम.
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठा दिलासा; 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठा दिलासा; 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा.