सर्वात मोठी बातमी ! दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? शरद पवार यांनी एका वाक्यात काय दिलं उत्तर?

राज्यात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाच्या चर्चांना ज्येष्ठ नेते शरद पवारांनी पूर्णविराम दिला आहे. पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटींनंतर या चर्चांना उधाण आले होते. या चर्चांवर अखेर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पवारांनी अवघ्या एका वाक्यात उत्तर देऊन हा विषय थांबवला आहे.

सर्वात मोठी बातमी ! दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? शरद पवार यांनी एका वाक्यात काय दिलं उत्तर?
sharad pawar
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 28, 2026 | 2:30 PM

राज्यात गेल्या काही दिवसापासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत. गेल्या आठवड्यात शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी पवार गट एनडीएसोबत जाणार असल्याची चर्चा झाली. त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत गाठीभेटी झाल्या. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या पुन्हा एकदा चर्चा रंगल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी एका वाक्यात उत्तर देऊन हा विषय संपवला आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांना दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर विचारलं. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या देशभरात चर्चा सुरू आहेत. दोन्ही राष्ट्रवादी खरंच एकत्र येणार आहे का? असा सवाल शरद पवार यांना विचारण्यात आलं. त्यावर पवार यांनी अवघ्या एका वाक्यात उत्तर दिलं. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा काहीच संबंध नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. शरद पवार यांनी अत्यंत मोजक्या शब्दात उत्तर देऊन हा विषयच संपवल्याचं बोललं जात आहे.

गुन्हे मागे नाहीच

दरम्यान, नीट परीक्षा घोटाळ्याप्रकरणी विद्यार्थ्यांनी देशभर आंदोलन केलं. याप्रकरणी विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. केंद्र सरकारने सीजेपीला आश्वासन देऊनही हे गुन्हे मागे घेतले जात नाहीत. त्याबाबतही शरद पवार यांना विचारण्यात आले. त्यावर मी याबाबत पंतप्रधानांशी बोललो आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

चर्चा कशी सुरू झाली?

दोन्ही राष्ट्रवादींचे विलिनीकरण होण्याची चर्चा अचानक सुरू झाली नाही. तर शरद पवार यांनी गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसदेत भेट घेतली होती. त्यांच्याशी चर्चा केली होती. नीट आंदोलनाबाबत ही चर्चा झाली होती. त्यानंतर दोन दिवसाने शरद पवार एनडीएसोबत जाणार असल्याची बातमी आली. पवारांनी मोदींची भेट घेतली तेव्हाच पवार एनडीएसोबत जाण्याचा निर्णय झाल्याचंही सांगितलं जात होतं. अर्थात ही सर्व सूत्रांची माहिती होती. अधिकृत असं काही नव्हतं. त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी एक दोन दिवसाच्या फरकाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण होणार असल्याच्या बातम्या येऊन धडकल्या. भाजपने विलिनीकरणाची अट ठेवल्याचंही सांगितलं गेलं. त्यामुळेच पवारांना आज त्याबाबत विचारण्यात आलं असता त्यांनी या सर्व गोष्टींना पूर्णविराम दिला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us