AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रात समान नागरी कायदा येणार का?, देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले

हिंदू धर्मियांचा विवाहाचा कायदा वेगळा आहे. शीख, बौद्ध, जैन धर्मालाही हा कायदा लागू होतो.

महाराष्ट्रात समान नागरी कायदा येणार का?, देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले
देवेंद्र फडणवीस
Govinda Hatwar
Govinda Hatwar | Updated on: Dec 01, 2022 | 11:02 PM
Share

मुंबई – युनिफार्म सिव्हील कोर्ट म्हणजेच समान नागरी कायदा. गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये हा मुद्दा तापलाय. पण, हा विषय आता गुजरातपुरताच मर्यादित राहिलेला नाही. महाराष्ट्रातली समान नागरी कायदा येऊ शकतो, असे संकेत देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत. समान नागरी कायदा गोव्यात आहे. आता उत्तराखंड, गुजरात, हिमाचलप्रदेशमध्ये येणार आहे. हळूहळू सर्व राज्यांना हा कायदा लागू करावा लागेल. महाराष्ट्रही समान नागरी कायद्याबाबत योग्य वेळेवर निर्णय घेईल. आपल्या राज्यात समान नागरी कायदा आणावा, याची जबाबदारी संविधानानं दिलेली असल्याचंही ते म्हणाले.

भाजपच्या निवडणूक घोषणापत्रात आतापर्यंत तीन गोष्टी राहिल्यात. लोकसभा निवडणुकीच्या घोषणापत्रात याचा कायमचं उल्लेख होत आलाय. काश्मीरमधून कलम ३७० हटविणं. मोदी सरकारनं हे कलम हटविलं. दुसरा विषय अयोध्येत भव्य राममंदिर. सर्वोच्च न्यायालयात याचा निकाल लागला. आता अयोध्येत भव्य राम मंदिराचं बांधकाम सुरू आहे.

आता भाजपकडून तिसऱ्या विषयावर अधिक जोर दिला जातो. तो म्हणजे समान नागरी कायदा. उत्तराखंड, गुजरात आणि हिमाचलप्रदेशमध्ये यासाठी समितीची स्थापना झाली आहे. देशातील जनताही याला पाठिंबा देईल, असं अमित शहा यांचं म्हणणंय.

लग्न, घटस्फोट, मूल दत्तक घेणं आणि मालमत्तेच्या वाटणीसाठी सर्वांसाठी एकच कायदा असेल. सध्या लग्न, घटस्फोट, संपती आणि वारसदार असे कौटुंबीक विषय नागरी कायद्याअंतर्गत येतात.

हिंदू धर्मियांचा विवाहाचा कायदा वेगळा आहे. शीख, बौद्ध, जैन धर्मालाही हा कायदा लागू होतो. पण, मुस्लीम समाजातील लग्न, घटस्फोटाची प्रकरण मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डानुसार चालतात. अशाच प्रकारे पारशी आणि ख्रिश्चन धर्माचेही पर्सनल लॉ बोर्ड आहेत.

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...