AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Electricity : ऐन उन्हाळ्यात मुंबईकरांना वीज दरवाढीचा शॉक!

Mumbai Electricity : ऐन उन्हाळ्यात मुंबईकरांना वीज दरवाढीचा शॉक लागू शकतो. तिसऱ्या वर्षाच्या शेवटी, गेल्या पाच वर्षांतील वीजेच्या दराचा आढावा घेण्यात येतो. त्यानुसार, वीज कंपन्या नवीन वीज दरवाढीचा प्रस्ताव दाखल करतात.

Mumbai Electricity : ऐन उन्हाळ्यात मुंबईकरांना वीज दरवाढीचा शॉक!
दरवाढी घाम काढणार
| Updated on: Feb 23, 2023 | 8:06 PM
Share

मुंबई : ऐन उन्हाळ्यात मुंबईकरांना वीज दरवाढीचा शॉक (Electricity Prices Hike) लागू शकतो. मुंबईत वीज दरवाढीचा झटका लागू शकतो. यंदा वीज दरात वाढीचा (1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024) आणि पुढील वर्षी कपातीचा प्रस्ताव (1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025) प्रस्तावित आहे. या प्रस्तावावर आज, 23 फेब्रुवारीपर्यंत हरकती मागविण्यात आल्या होत्या. जर या प्रस्तावावर हरकती घेण्यात आल्या नाहीत तर वीज दरवाढ अटळ आहे. मुंबईत (Mumbai) तीन वीज कंपन्यांच्या प्रस्तावित वीज दरवाढीविषयी सुनावणी झाली आहे. या सुनावणीत सहभागी मुंबईकरांना गुरुवारपर्यंत हरकती नोंदविता येणार होत्या. कंपन्या 1 एप्रिलपासून प्रस्तावित वीज दरवाढ लागू करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

या विद्युत वितरण कंपन्यांची 1 एप्रिल 2020 रोजीपासून पंचवार्षिक विद्युत शुल्क निश्चिती सुरु झाली. तिसऱ्या वर्षाच्या शेवटी, गेल्या पाच वर्षांतील वीजेच्या दराचा आढावा घेण्यात येतो. त्यानुसार, वीज कंपन्या नवीन वीज दरवाढीचा प्रस्ताव दाखल करतात. आता जर हरकती आल्या नाहीत तर मात्र मुंबईकरांसाठी दरवाढ अटळ आहे. त्यात बदल होऊ शकत नाही.

या प्रस्तावात तीन वीज वितरण कंपन्यांनी वर्ष 2024-25 मध्ये वीज दरात अजून कपात करण्याची सूचना केली आहे. घरगुती वीज ग्राहकांच्या श्रेणीत, अदानी इलेक्ट्रिसिटीने 2023-24 साठी 2 ते 7 टक्के वाढीचा प्रस्ताव ठेवला आहे. पण 2024-25 या कालावधीसाठी कंपनीने वीज दरात 3 आणि 4 टक्के कपातीचा प्रस्ताव ठेवला आहे. टाटा पावरने 2023-24 या चालू वर्षासाठी 10 ते 30 टक्क्यांच्या दरवाढीचा प्रस्ताव ठेवला आहे. तर 2024-25 या वर्षाकरीता 6 ते 7 टक्के कपातीचा प्रस्ताव ठेवला आहे.

मुंबईत वीज वितरण करण्यासाठी तीन कंपन्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. त्यात अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड( Adani Electricity Mumbai Limited), टाटा पावर आणि बेस्ट इंटरप्राइजेस यांचा समावेश आहे. या तीनही वीज वितरण कंपन्यांनी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाला दरवाढीचा प्रस्ताव सोपवला आहे. या प्रस्तावावर आयोगासमोर ऑनलाईन सुनावणी झाली आहे. ही सुनावणी या सोमवारी संपली.

बेस्टने 2023-24 आणि 2024-25 यावर्षासाठी घरगुती ग्राहकांना दिलासा दिला आहे. बेस्टने वीज शुल्क कपातीचा प्रस्ताव ठेवला आहे. वर्ष 2023-24 मध्ये सरासरी 7.33 टक्के शुल्क कपात तर वर्ष 2024-25 मध्ये सरासरी 1.10 टक्क्यांची कपात प्रस्तावित आहे.

अदानी इलेक्ट्रिसिटी कंपनीकडे सध्या मुंबईतील 30 लाख ग्राहक आहेत. तर टाटा पावरकडे 8 लाख ग्राहक आहेत. बेस्टकडे साडेदहा लाख ग्राहकांपर्यंत वीज पोहचविण्याची जबाबदारी आहे. महावितरणकडे राज्यातील इतर शहरांमध्ये वीज वितरणाची जबाबदारी आहे. महावितरण कंपनीने 2023-24 या वर्षासाठी 37 टक्के आणि 2024-25 या वर्षासाठी 14 टक्के वीज दरवाढीचा प्रस्ताव ठेवला आहे.

महावितरणच्या प्रस्तावित दरवाढीसंदर्भात मंगळवारी नवी मुंबईत सुनावणी सुरु झाली. महावितरणद्वारे 23 फेब्रुवारीला पुण्यात सुनावणी सुरु झाली. 25 फेब्रुवारी रोजी औरंगाबाद, 27 फेब्रुवारी रोजी नाशिक, 2 मार्च रोजी अमरावती तर 3 मार्च रोजी नागपूर येथे सुनावणी होईल.

Follow Us
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त...
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी.....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी......
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद.
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह...
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की.....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की......
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,.
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू.
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश...
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश....
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर...
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर....
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री...
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री....