AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुलवामा हल्ल्यावेळी आरडीएक्स पोहचलं कसं? संजय राऊत यांनी सवाल उपस्थित करत केले गंभीर आरोप, काय म्हणाले राऊत?

2019 च्या निवडणुकीपूर्वी झालेल्या पुलवामा हल्ल्यावरून संजय राऊत यांनी अनेक प्रश्न उपस्थित करत मोदी सरकारवर देशद्रोहाचा खटला दाखल करावा अशी मागणी केली आहे.

पुलवामा हल्ल्यावेळी आरडीएक्स पोहचलं कसं? संजय राऊत यांनी सवाल उपस्थित करत केले गंभीर आरोप, काय म्हणाले राऊत?
Image Credit source: TV9 Network
Kiran Balasaheb Tajne
Kiran Balasaheb Tajne | Updated on: Apr 15, 2023 | 10:40 AM
Share

नागपूर : 2019 च्या निवडणुकीपूर्वी पुलवामा येथे झालेल्या हल्ला राजकारणासाठी घडवून आणला गेला होता का? राजकारण करण्यासाठी हत्या झाली का? कडेकोट सुरक्षा असतांना तिथं आरडीएक्स कसं पोहचलं असे विविध सवाल उपस्थित करत संजय राऊत यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. यावरून मोदी सरकारवर तेव्हा सुध्दा प्रश्न उपस्थित केले गेले होते, पण त्यावेळी कोणी बोललं तर देशद्रोहाचा खटला दाखल केला जाईल अशी भीती दाखवली जायची पण आता मोदी सरकारवरच देशद्रोहाचा खटला चालला पाहिजे अशी मागणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केली आहे. पुलवामा हल्ला घडवून आणला का अशी शंका तेव्हाही उपस्थित केली होती असेही संजय राऊत यांनी म्हंटलं आहे.

निवडणुका आल्या की भारत पाकिस्तान सारखा मुद्दा उपस्थित करायचा आणि निवडणुका जिंकायच्या, हल्ला करून निवडणुका जिंकल्या होत्या का? असाही सवाल संजय राऊत यांनी उपस्थित करत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

2019 च्या निवडणुकीपूर्वी पुलवामा येथे दीडशे किलोच्या वर आरडीएक्सच्या माध्यमातून भारतीय जवानाच्या गाडीवर हल्ला झाला होता. त्यामध्ये चाळीस जवान शाहिद झाले होते. संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जात होती. त्यानंतर विरोधकांनी हल्ल्याच्या संदर्भात विविध प्रश्न उपस्थित केले होते.

याशिवाय संपूर्ण सीमेवर कडेकोट सुरक्षा असतांना पुलवामा हल्ला घडलाच कसा? इतक्या मोठ्या प्रमाणात आरडीएक्स पोहचले कसे? असे विविध प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर भारताकडून सर्जिकल स्ट्राईक केला होता. भारताने बदला घेतला असेही त्यावेळी सांगण्यात आले होते.

मात्र, त्यावरच नागपूर येथे संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. यामध्ये संजय राऊत यांनी थेट मोदी सरकारच्या कामगिरीवर शंका उपस्थित करत हल्लाबोल करण्यात सुरुवात केली आहे. मोदी सरकारवरच राष्ट्रद्रोहाचा खटला दाखल करा अशी मागणी करत निशाणा साधला आहे.

सर्जिकल स्ट्राईक केले होते म्हणजे भारताने पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन हवाई हल्ला केला होता. त्यामध्ये भारतीय लष्कराच्या स्पेशल फोर्सचे पॅराकमांडो ही कामगिरी करत असतात. खडतर प्रशिक्षण घेऊन ही कारवाई केली जाते. यामध्ये अचूक नियोजन आणि अनेक दिवस तयारी करावी लागते.

पुलवामा हल्ला झाल्यानंतर पाकिस्तानला उत्तर द्यायचे म्हणून भारताने सर्जिकल स्ट्राईक केले होते. त्यानंतर भारतीय लष्कराचे संपूर्ण जगभरात कौतुक केले जात होते. ऐन 2019 च्या निवडणुकीपूर्वी ही घटना घडल्यानंतर विरोधकांनी त्यावर बोट ठेवत काही प्रश्न उपस्थित केले होते.

Follow Us
रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? महाजनांचा मोठा काय?
Girish Mahajan | रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? गिरीश महाजनांचा मोठा दावा काय?
गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक.....
Gondia Rain | गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक शेतकरी चिंतेत
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
Mumbai | नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! 13 एप्रिलला अटक, आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
Thane Assault Case | ठाण्यातील वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर
Buldhana | लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर; कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी जप्त
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून मोठी भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार, नवे नियम लागू
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड