Nagpur Students | नागपुरात दहावी-बारावीचे विद्यार्थी रस्त्यावर; बसच्या काचा फोडण्याचे कारण काय?

नागपुरात 10 वी 12 वी ची परीक्षा रद्द करा किंवा ऑनलाईन घ्याव्यात या मागणीसाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले. मेडिकल चौकात काही विद्यार्थी एकत्रित येऊन घोषणाबाजी केली. घटनास्थळी पोलीस दाखल झालेत. काही विद्यार्थ्यांनी बसच्या काचा फोडल्या. त्यानंतर विद्यार्थ्यांना शांत केलं.

Nagpur Students | नागपुरात दहावी-बारावीचे विद्यार्थी रस्त्यावर; बसच्या काचा फोडण्याचे कारण काय?
नागपुरातील मेडिकल चौकात आंदोलन करताना विद्यार्थी.
Follow us
| Updated on: Jan 31, 2022 | 4:10 PM

नागपूर : राज्य सरकार दहावी आणि बारावीच्या ऑफलाईन परीक्षा (Offline exam) घेणार या अफवेने नागपुरात विद्यार्थ्यांनी (Students in Nagpur) एकत्र येत आंदोलन केलं. नागपुरातील मेडिकल चौक (Medical Square) परिसरात अचानक विद्यार्थी एकत्र आले. ऑफलाईन परीक्षेविरोधात घोषणाबाजी सुरू केली. सोशल मीडियावर दहावी आणि बारावीची परीक्षा राज्य सरकार ऑनलाईन घेणार आहे, अशी अफवा हिंदुस्थानी भाऊ नामक तरुणाने पसरली होती. या विरोधात विद्यार्थ्यांनी एकत्र यावं, असं आवाहनही त्यांनं केलं होतं. त्यामुळे विद्यार्थी एकत्र आले. वर्षभर आमचा ऑनलाईन अभ्यास झाला. आमची लिहण्याची सवय तुटली. त्यामुळं ऑफलाईन परीक्षा घेतली तर आमचं शैक्षणिक नुकसान होऊ शकतं. त्यामुळं एकतर परीक्षा रद्द करावी किंवा ऑनलाईन परीक्षा घ्यावी, अशी मागणी करत विद्यार्थी आक्रमक झाले होते. दरम्यान, एका शहर बसच्या काचा ही विद्यार्थ्यांनी फोडल्या. मात्र, पोलिसांनी वेळीच येत विद्यार्थ्यांची समजूत काढली आणि त्यांना परत पाठवलं.

ऑनलाईन परीक्षा आयोजित करणे शक्य नाही

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं बारावीची लेखी परीक्षा ही 4 मार्च ते 30 मार्च दरम्यान घेण्यात येणार आहे. तर, इयत्ता दहावीची लेखी परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिलदरम्यान होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. ऑनलाईन परीक्षा आयोजित करणं शक्य नसल्याचं मंडळाकडून जाहीर करण्यात आलंय. मात्र, राज्यातील दहावी बारावीचे विद्यार्थी या परीक्षांविरोधात आक्रमक झाले आहेत.

पालकांची अफवांवर विश्वास ठेऊ नये

दहावी बारावीच्या परीक्षा ऑफलाईन नको अशी भूमिका विद्यार्थ्यांसोबत पालकांद्वारे मांडण्यात आली आहे. नागपूरमध्ये पालकांनी देखील विद्यार्थ्यांच्या मागणीला समर्थन दिलं आहे. दहावी बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घ्याव्यात, अशी मागणी पालकांनी केली आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या आयोजनासंदर्भात कुणीतरी खोटी बातमी पसरवली होती. विद्यार्थी, पालक आणि शाळांनी त्यावर विश्वास ठेऊ नये. परीक्षा ज्या तारखेला आहेत त्याच तारखेला घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही कोरोनाच्या स्थितीवर लक्ष ठेऊन आहोत, असंही वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.

HSC SSC Exam : शिक्षण ऑनलाईन झालं, दहावी बारावीच्या परीक्षा ऑफलाईन नको, कोल्हापूर नागपूरमध्ये विद्यार्थी पालकांचं आंदोलन

HSC SSC Exam : दहावी बारावीच्या परीक्षा ठरलेल्या वेळीच होणार, वर्षा गायकवाड यांच्याकडून स्पष्टीकरण

HSC SSC Exam Date | इयत्ता दहावी, बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या कधीपासून परीक्षा सुरु होणार ?

Non Stop LIVE Update
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी.
बैठका अन सभांचा सपाटा सुरु असताना जरांगेंची प्रकृती बिघडली, उपचार सुरू
बैठका अन सभांचा सपाटा सुरु असताना जरांगेंची प्रकृती बिघडली, उपचार सुरू.
राज ठाकरेंच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा,कुणी केली जिव्हारी लागणारी टीका
राज ठाकरेंच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा,कुणी केली जिव्हारी लागणारी टीका.
तोंडाच्या वाफेने काही करता येतं पण... काँग्रेस नेत्याची ठाकरेंवर टीका
तोंडाच्या वाफेने काही करता येतं पण... काँग्रेस नेत्याची ठाकरेंवर टीका.
तर मी निवृत्ती घेतली असती, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?
तर मी निवृत्ती घेतली असती, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?.
4 जूनला समजेल शो कोणाचा... देवेंद्र फडणवीसांचा रोख नेमका कुणावर?
4 जूनला समजेल शो कोणाचा... देवेंद्र फडणवीसांचा रोख नेमका कुणावर?.
मोदींना वारंवार महाराष्ट्रात का यावं लागतंय? फडणवीसांनी दिलं थेट उत्तर
मोदींना वारंवार महाराष्ट्रात का यावं लागतंय? फडणवीसांनी दिलं थेट उत्तर.
उद्धव ठाकरेच घाटकोपर दुर्घटनेला जबाबदार, कारण... फडणवीसांचा हल्लाबोल
उद्धव ठाकरेच घाटकोपर दुर्घटनेला जबाबदार, कारण... फडणवीसांचा हल्लाबोल.
नामर्द म्हणत शिवसेनाचा अर्थ सांगून गुलाबराव पाटलांचा राऊतांवर हल्लाबोल
नामर्द म्हणत शिवसेनाचा अर्थ सांगून गुलाबराव पाटलांचा राऊतांवर हल्लाबोल.
ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूममध्ये CCTV चा डिस्प्ले 24 तास बंद अन् ...
ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूममध्ये CCTV चा डिस्प्ले 24 तास बंद अन् ....