AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वीज ‘काळ’ बनून आली, नागपुरात तीन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, दोघे सुदैवाने बचावले

नागपूर जिल्ह्यात वीज अंगावर पडून एकाच वेळी तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झालाय. रामटेक तालुक्यातल्या चोरखुमारी शिवारातली ही घटना आहे. (3 Farmer Death lighting Strike In nagpur Ramtek)

वीज 'काळ' बनून आली, नागपुरात तीन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, दोघे सुदैवाने बचावले
नागपूर जिल्ह्यात वीज अंगावर पडून एकाच वेळी तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झालाय.
| Edited By: | Updated on: Jul 07, 2021 | 7:43 AM
Share

नागपूर :  नागपूर जिल्ह्यात वीज अंगावर पडून एकाच वेळी तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झालाय. रामटेक तालुक्यातल्या चोरखुमारी शिवारातली ही घटना आहे. दुपारी तीनच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर शेतातील झोपडीत आश्रयाला थांबलेल्या पाच शेतकरी मजूरांपैकी तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. (3 Farmer Death lighting Strike In nagpur Ramtek)

दिलीप मंगल लांजेवार, मधुकर पंधराम आणि योगेश कोकण अशी तिन्ही मृतांची नावं आहेत. वीज अंगावर पडून एकाचवेळी या तिघा मजुरांचा जागीच मृत्यू झाला. तर या घटनेत दोन शेतकरी मजूर जखमी झालेत जखमींमध्ये बारा वर्षाच्या मुलाचा समावेश आहे जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सविस्तर घटना काय…?

सविस्तर घटना अशी की, शेतात मशागतीची कामं सुरु असताना पाऊस सुरु झाल्यावर शेतातले काम करणारे शेतकरी मजूर झोपडीत आश्रयाला गेले. मात्र पाऊस सुरू असताना वीज कोसळल्याने वीज अंगावर पडून तीन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला.

रामटेक तालुक्यात चोरखुमारी शिवारात माजी पंचायत समिती सदस्य हरीसिंह सोडते यांची शेती आहे. त्यांच्याच शेतात शेतीच्या मशागतीची कामं सुरु होती. काम सुरू असताना दुपारच्या वेळी पावसाला सुरुवात झाल्यानंतर शेतातील मजूर एका झोपडीत आश्रयाला थांबले. मात्र वीज काळ बनून आली आणि तिने शेतकऱ्यांचा जीव घेतला…

(3 Farmer Death lighting Strike In nagpur Ramtek)

हे ही वाचा :

अवकाळी पावसाचा फटका, हिंगोलीत वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू

Follow Us
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?.
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.