AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur Digital | शासनाच्या सर्व योजनांचा लाभ एका क्लिकवर; 14 एप्रिलला नागपुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर न्याय योजनेचा प्रारंभ

या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील सर्व शासकीय योजनांची इत्यंभूत माहिती एकाच ठिकाणी मिळेल. तसेच स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांना आपल्या क्षेत्रात रोजगाराच्या उपलब्धतेची माहिती देखील या वेबसाइटच्या माध्यमातून होणार आहे.

Nagpur Digital | शासनाच्या सर्व योजनांचा लाभ एका क्लिकवर; 14 एप्रिलला नागपुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर न्याय योजनेचा प्रारंभ
Image Credit source: tv 9
Govinda Hatwar
Govinda Hatwar | Updated on: Apr 11, 2022 | 5:22 AM
Share

नागपूर : डिजिटल युगाच्या काळात नागपूरकर जनतेला सर्व शासकीय योजनांचा (Government Scheme) मोठ्या प्रमाणात सहज व सुलभतेने लाभ मिळावा. यासाठी ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत (Guardian Minister Dr. Nitin Raut) यांनी पुढाकार घेतला आहे. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती दिनाला ही डिजिटल क्रांती नागपूरकर जनतेला जिल्हा प्रशासनाच्यावतीने लोकार्पित होणार आहे. जिल्ह्यातील सामान्यातील सामान्य व्यक्तीला डोळ्यासमोर ठेऊन सहज सुलभ व जलद न्यायाचे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर न्याय योजना (Dr. Babasaheb Ambedkar Justice Scheme) तयार करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील सर्व शासकीय योजनांची इत्यंभूत माहिती एकाच ठिकाणी मिळेल. तसेच स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांना आपल्या क्षेत्रात रोजगाराच्या उपलब्धतेची माहिती देखील या वेबसाइटच्या माध्यमातून होणार आहे.

सहज, सुलभ, सरळ पोर्टल

पालकमंत्री डॉ. नितीन राऊत 14 एप्रिल रोजी या योजनेची सुरुवात करणार आहे. जिल्हा प्रशासनाच्यावतीने 14 एप्रिल रोजी या संदर्भात एका शानदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना आमंत्रित करण्यात येत आहे. www.mahabany.in या वेबसाईटवर ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सर्व योजनांची माहिती या ठिकाणी मिळणार आहे. पोर्टल कसे वापरावे यापासून तर सहज, सुलभ आणि सरळ त्रिसूत्रीचा वापर करावा. या ठिकाणी विविध योजनांचा लाभ सामान्यातल्या सामान्य ग्रामीण नागरिकांना देखील घेता यावा अशा पद्धतीने हे पोर्टल बनवण्यात आले आहे.

सर्व माहिती जिल्हाधिकाऱ्यांच्या डेस्कटॉपवर

जिल्हा प्रशासनामार्फत या पोर्टलवर करण्यात आलेल्या अर्जाला विशिष्ट कालमर्यादेत पूर्ण करण्याचे धोरण आहे. याची सर्व माहिती जिल्हाधिकाऱ्यांच्या डेस्कटॉपवर उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे या ठिकाणी कोणत्याही योजनेसाठी लाभासाठी करण्यात आलेला अर्ज विशिष्ट कालमर्यादेत संबंधित विभागामार्फत पूर्ण करणे अनिवार्य असणार आहे. अस्तित्वात असणाऱ्या वेगवेगळ्या वेबसाईट सोबत या नव्या डिजिटल व्यासपीठाचा समन्वय असेल. त्यामुळे अस्तित्वात असणाऱ्या वेबसाईट सोबतच शासनाच्या ज्या विभागाच्या वेबसाईट नाहीत, त्या विभागाच्या योजनांना देखील यामुळे डिजिटल व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.

Video Sharad Pawar | शरद पवार यांचे नागपुरात जल्लोषात स्वागत, विमानतळावर कार्यकर्त्यांची गर्दी, अमरावतीच्या दिशेने रवाना

Nagpur Vaccination | नागपूर मनपा क्षेत्रात लसीकरण, 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Buldana Jobs | रोजगार निर्मितीत बुलडाणा जिल्हा विदर्भात अव्वल, 10 लाख रोजगाराच्या संधी केल्या उपलब्ध

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली