AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आमदारांच्या उणिवांवर बोट, कोणते आमदार किती कमी पडले?; भाजप प्रदेश अध्यक्षांच्या सूचना काय?

भाजपच्या वरिष्ठांनी दिल्लीवरून प्रदेश पातळीवरील नेत्यांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार एक सर्वेक्षण करण्यात आलं. आमदारांमध्ये असलेल्या उणिवांबद्दल चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबंधित आमदारांना सूचना दिली आहे.

आमदारांच्या उणिवांवर बोट, कोणते आमदार किती कमी पडले?; भाजप प्रदेश अध्यक्षांच्या सूचना काय?
| Edited By: | Updated on: Mar 30, 2023 | 10:06 AM
Share

नागपूर : आमदार निवडून आल्यानंतर त्यांनी काय विकासकाम केलीत. याचा आढावा घेतला जातो. ते कुठं कमी असतील, तर त्यांना तशा सूचना दिल्या जातात. जेणेकरून जनतेची कामं झाली पाहिजे. तसेच त्या कामांचं सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचली पाहिजे. अशी भाजपची कामाची पद्धत आहे. त्या दृष्टिकोनातून भाजपची टीम सध्या कामाला लागली आहे. आमदारांनी केलेल्या कामांचा आढावा घेतला जात आहे. ते कुठं कमी असतील, तर त्यांना तशा सूचना दिल्या जात आहेत. त्यामुळे त्या उणिवा ते कमी करून स्वतःचा परफार्मन्स अधिक चांगला करतील. भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबंधित आमदारांना काही सूचना दिल्या आहेत.

आमदरांच्या रिपोर्टमध्ये काय?

भाजपच्या वरिष्ठांनी दिल्लीवरून प्रदेश पातळीवरील नेत्यांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार एक सर्वेक्षण करण्यात आलं. आमदारांमध्ये असलेल्या उणिवांबद्दल चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबंधित आमदारांना सूचना दिली आहे. आमदार जनसंपर्कात किती कमी आहेत. विकासकामात किती कमी आहेत. सोशल मीडियावर काय कमी आहेत. किती विकासकामे करायची आहेत. मतदारसंघाबाबत काय रिपोर्ट आहे. जवळपास प्रत्येक आमदारांचे सुमारे १०० पानांचा रिपोर्ट आहे.

पाच-सहा पानांच्या उणिवांचा रिपोर्ट

पाच-सहा पानांचा उणिवांचा रिपोर्ट आमदारांच्या हातात देण्यात आला. तेव्हा सगळे आमदार अचंबित झाले. सरकारच्या काळात आमदार कुठं-कुठं कमी पडले. मतदारसंघात काय स्थिती होती. मतदारसंघाची परिस्थिती काय आहे. आमदार कितपत तयार आहेत.

नऊ महिन्यांचा लेखाजोगा

भाजप आमदार यांना कामगिरी सुधारण्याच्या सूचना भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्यात. आमदारांच्या विधानसभा मतदार संघात सर्वेक्षण केले जाणार आहे. नऊ महिन्यांचा लेखाजोगा मांडावा लागणार आहे. त्यानंतर अधिक सक्रिय होण्याच्या सूचना दिल्या जातील.

विधानसभा क्षेत्रात काम करत असताना आमदारांनी बरीच कसरत करावी लागते. एकीकडे पक्षाच्या सूचना तर दुसरीकडे लोकांच्या समस्या. नागरिक समस्या घेऊन आमदारांना भेटी देत असतात. अशात ते कुठं कमी तर पडत नाही ना, याचा अहवाल तयार केला जातो. ते कुठं कमी पडत असतील, तर पक्षाकडून तशा सूचना दिल्या जातात. त्यात संबधित आमदारांना सुधारणा करण्यात मदत होते.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.