AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…म्हणजे वज्रमुठ सभेत खोडा निर्माण करण्याचा प्रयत्न; आशिष देशमुख यांचा नेमका आरोप काय?

काँग्रेस महाविकास आघाडीपासून वेगळी चूल मांडण्यासाठी राहुल गांधी, प्रियंका गांधी यांची सभा घेत आहेत, असंही देशमुख म्हणाले. यासाठी खोके जबाबदार असल्याचा आशिष देशमुख यांचा आरोप आहे.

...म्हणजे वज्रमुठ सभेत खोडा निर्माण करण्याचा प्रयत्न; आशिष देशमुख यांचा नेमका आरोप काय?
Updated on: Apr 06, 2023 | 12:28 PM
Share

नागपूर : काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांनी पुन्हा एकदा काँग्रेसच्या नेतृत्वावर टीका केली. १६ तारखेला महाविकास आघाडीची सभा आहे. मग लगेच २० ते २५ तारखेला राहुल गांधी यांची सभा घेण्याचे कारण काय, असा सवाल आशिष देशमुख यांनी उपस्थित केला. यामुळे आशिष देशमुख पुन्हा एकदा आक्रमक झालेले पाहायला मिळाले. १६ तारखेला नागपुरात वज्रमुठ सभा आहे. असे असताना २० ते २५ तारखेला राहुल गांधी, प्रियंका गांधी यांची सभा म्हणजे वज्रमुठ सभेत खोडा निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांनी लावला आहे. काँग्रेस महाविकास आघाडीपासून वेगळी चूल मांडण्यासाठी राहुल गांधी, प्रियंका गांधी यांची सभा घेत आहेत, असंही देशमुख म्हणाले. यासाठी खोके जबाबदार असल्याचा आशिष देशमुख यांचा आरोप आहे. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्यावर पुन्हा टीका केली.

माझ्या विरोधात एकही कारण मिळाले नाही

मी काँग्रेस पक्षाचं हित व्हावं असंच वक्तव्य केलंय. त्यामुळे माझ्यावर कारवाई करण्याचं काही कारण नाही. आमदारकीला एक वर्ष बाकी असताना मी काँग्रेसमध्ये आलो. मला कारवाईची नोटीस मिळाली नाही. शिस्तपालन समितीने तीन तास बैठक घेतली. तरीही त्यांना माझ्या विरोधात एक कारण मिळालं नाही, असंही आशिष देशमुख म्हणाले.

देशमुख आता हिंगण्यातून लढणार?

आशिष देशमुख राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याची सुत्रांची माहिती आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा मतदारसंघात निवडणूक लढण्यास आशिष देशमुख इच्छूक असल्याचं कळते. आशिष देशमुख यांच्या आपल्याच पक्षातील नेत्यांवर टीका करण्याच्या स्वभावामुळे राष्ट्रवादीकडून नेट ॲंड वॅाचची भूमिका ठेवावी लागणार आहे. आशिष देशमुख यांचे काका आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांचाही विरोध असल्याची माहिती आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस संधी देणार का?

काँग्रेस कारवाई करणार असल्याने आशिष देशमुख यांच्यासमोर राष्ट्रवादीचा पर्याय राहू शकतो. काँग्रेस नेत्यांवर टीका करणाऱ्या आशिष देशमुख यांना राष्ट्रवादी संधी देणार का? असा प्रश्न उपस्थित होतो. आशिष देशमुख म्हणाले, शरद पवार आणि अजित दादा माझ्या शेतावर येऊन गेलेत. हिंगणा मतदारसंघात माझं शेत आहे. याच शेतावर शरद पवार आणि अजित दादा येऊन गेलेत. परंतु, राष्ट्रवादीत जाण्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले नाही.

नाना पटोले म्हणतात,…

खोके मिळाल्याने राहुल गांधी यांची सभा आयोजित केल्याचा आरोप आशिष देशमुख यांनी केला. त्यावर बोलताना नाना पटोले म्हणाले, नाना पटोलेला विकत घेणारा जन्माला आलेला नाही. माझे मेडिकल कॉलेज नाही. ज्यांना डोनेशन पद्धत माहीत आहे, त्यांना तसे वाक्य सुचतात. पक्ष म्हणून त्यांच्यावर कारवाई होईल, असंही नाना पटोले यांनी सांगितलं.

मेळाव्यानंतर राज ठाकरेंचा संभ्रम? ठाकरे बंधू एकत्र पण युतीबद्दल काय?
मेळाव्यानंतर राज ठाकरेंचा संभ्रम? ठाकरे बंधू एकत्र पण युतीबद्दल काय?.
शिवसेनेच्या मंत्र्याची मनसेच्या मोर्चात एन्ट्री अन् काय घडल? बघा VIDEO
शिवसेनेच्या मंत्र्याची मनसेच्या मोर्चात एन्ट्री अन् काय घडल? बघा VIDEO.
ओम फट् स्वाहा...विरोधकांनी गोगावलेंना डिवचल, बघा VIDEO हसू अवरणार नाही
ओम फट् स्वाहा...विरोधकांनी गोगावलेंना डिवचल, बघा VIDEO हसू अवरणार नाही.
महादेव मुंडेंच्या पत्नीचा खळबळजनक आरोप, थेट कराडचं घेतलं नाव अन्...
महादेव मुंडेंच्या पत्नीचा खळबळजनक आरोप, थेट कराडचं घेतलं नाव अन्....
जिथे वडिलांनी लोकप्रतिनिधित्व केलं, तिथेच गवईंचा सत्कार
जिथे वडिलांनी लोकप्रतिनिधित्व केलं, तिथेच गवईंचा सत्कार.
सत्कार सोहळ्यात फडणवीसांकडून सरन्यायाधीश गवईंचे कौतुक
सत्कार सोहळ्यात फडणवीसांकडून सरन्यायाधीश गवईंचे कौतुक.
आम्ही आतंकवादी आहोत की दहशतवादी?पोलिसांच्या कारवाईवर अविनाश जाधव भडकले
आम्ही आतंकवादी आहोत की दहशतवादी?पोलिसांच्या कारवाईवर अविनाश जाधव भडकले.
अविनाश जाधवांची धडाकेबाज एन्ट्री अन् कार्यकर्त्यांचा जल्लोष
अविनाश जाधवांची धडाकेबाज एन्ट्री अन् कार्यकर्त्यांचा जल्लोष.
गोपनीय खात्यात लपवल, मध्यरात्री जे घडल ते अविनाश जाधवांनी सारं सांगितल
गोपनीय खात्यात लपवल, मध्यरात्री जे घडल ते अविनाश जाधवांनी सारं सांगितल.
त्यांना चपलेने मारलं पाहिजे..; राजन विचारेंची सरनाईकांवर आगपाखड
त्यांना चपलेने मारलं पाहिजे..; राजन विचारेंची सरनाईकांवर आगपाखड.