AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…म्हणजे वज्रमुठ सभेत खोडा निर्माण करण्याचा प्रयत्न; आशिष देशमुख यांचा नेमका आरोप काय?

काँग्रेस महाविकास आघाडीपासून वेगळी चूल मांडण्यासाठी राहुल गांधी, प्रियंका गांधी यांची सभा घेत आहेत, असंही देशमुख म्हणाले. यासाठी खोके जबाबदार असल्याचा आशिष देशमुख यांचा आरोप आहे.

...म्हणजे वज्रमुठ सभेत खोडा निर्माण करण्याचा प्रयत्न; आशिष देशमुख यांचा नेमका आरोप काय?
| Edited By: | Updated on: Apr 06, 2023 | 12:28 PM
Share

नागपूर : काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांनी पुन्हा एकदा काँग्रेसच्या नेतृत्वावर टीका केली. १६ तारखेला महाविकास आघाडीची सभा आहे. मग लगेच २० ते २५ तारखेला राहुल गांधी यांची सभा घेण्याचे कारण काय, असा सवाल आशिष देशमुख यांनी उपस्थित केला. यामुळे आशिष देशमुख पुन्हा एकदा आक्रमक झालेले पाहायला मिळाले. १६ तारखेला नागपुरात वज्रमुठ सभा आहे. असे असताना २० ते २५ तारखेला राहुल गांधी, प्रियंका गांधी यांची सभा म्हणजे वज्रमुठ सभेत खोडा निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांनी लावला आहे. काँग्रेस महाविकास आघाडीपासून वेगळी चूल मांडण्यासाठी राहुल गांधी, प्रियंका गांधी यांची सभा घेत आहेत, असंही देशमुख म्हणाले. यासाठी खोके जबाबदार असल्याचा आशिष देशमुख यांचा आरोप आहे. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्यावर पुन्हा टीका केली.

माझ्या विरोधात एकही कारण मिळाले नाही

मी काँग्रेस पक्षाचं हित व्हावं असंच वक्तव्य केलंय. त्यामुळे माझ्यावर कारवाई करण्याचं काही कारण नाही. आमदारकीला एक वर्ष बाकी असताना मी काँग्रेसमध्ये आलो. मला कारवाईची नोटीस मिळाली नाही. शिस्तपालन समितीने तीन तास बैठक घेतली. तरीही त्यांना माझ्या विरोधात एक कारण मिळालं नाही, असंही आशिष देशमुख म्हणाले.

देशमुख आता हिंगण्यातून लढणार?

आशिष देशमुख राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याची सुत्रांची माहिती आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा मतदारसंघात निवडणूक लढण्यास आशिष देशमुख इच्छूक असल्याचं कळते. आशिष देशमुख यांच्या आपल्याच पक्षातील नेत्यांवर टीका करण्याच्या स्वभावामुळे राष्ट्रवादीकडून नेट ॲंड वॅाचची भूमिका ठेवावी लागणार आहे. आशिष देशमुख यांचे काका आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांचाही विरोध असल्याची माहिती आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस संधी देणार का?

काँग्रेस कारवाई करणार असल्याने आशिष देशमुख यांच्यासमोर राष्ट्रवादीचा पर्याय राहू शकतो. काँग्रेस नेत्यांवर टीका करणाऱ्या आशिष देशमुख यांना राष्ट्रवादी संधी देणार का? असा प्रश्न उपस्थित होतो. आशिष देशमुख म्हणाले, शरद पवार आणि अजित दादा माझ्या शेतावर येऊन गेलेत. हिंगणा मतदारसंघात माझं शेत आहे. याच शेतावर शरद पवार आणि अजित दादा येऊन गेलेत. परंतु, राष्ट्रवादीत जाण्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले नाही.

नाना पटोले म्हणतात,…

खोके मिळाल्याने राहुल गांधी यांची सभा आयोजित केल्याचा आरोप आशिष देशमुख यांनी केला. त्यावर बोलताना नाना पटोले म्हणाले, नाना पटोलेला विकत घेणारा जन्माला आलेला नाही. माझे मेडिकल कॉलेज नाही. ज्यांना डोनेशन पद्धत माहीत आहे, त्यांना तसे वाक्य सुचतात. पक्ष म्हणून त्यांच्यावर कारवाई होईल, असंही नाना पटोले यांनी सांगितलं.

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.