लोकसभा-राज्यसभेत विरोधकांचा गोंधळ, सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी; कामकाज स्थगित
संसदेत विरोधकांचा गोंधळ, सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी; कामकाज स्थगित

नीट पेपरफुटी आणि विद्यार्थी आंदोलकावरील लाठीचार्जवरून राजकारण तापलं आहे. नीट पेपरफुटीमुळे धर्मेंद्र प्रधान यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर आज पावसाळी अधिवेशनात मोदी सरकार परीक्षा दुरुस्ती विधेयक सादर करणार होतं. परंतु त्याआधीच विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. इंडिया आघाडीच्या खासदारांनी सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याने लोकसभेचं कामकाज स्थगित करण्यात आलं. लोकसभेनंतर राज्यसभेतही विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानं कामकाज स्थगित करण्यात आलं आहे.
देशातील पेपरफुटी रोखण्यासाठी सत्ताधारी सार्वजनिक परीक्षा सुधारणा विधेयक सादर करणार आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह हे विधेयक लोकसभेत सादर करणार आहेत. या विधेयकाच्या माध्यामातून पेपरफुटीतील मफियांवर कारवाई करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर सेवा पुरवणारी कंपनी आढळल्यास आठ वर्षांसाठी काळ्या यादीत टाकले जाणार आहे. या प्रकरणात दोषींना 10 वर्ष तुरुंगवास आणि 10 कोटींचा दंड होणार आहे. परंतु हे विधेयक सादर करणाऱ्या सत्ताधाऱ्यांविरोधात विरोधकांनी आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली जात आहे. त्यामुळे लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज हे 12 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले आहे.
