AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी सरण रचले, पूजा केली नंतर स्वतःला जाळून घेतले, नागपुरात वृद्ध व्यक्तीनं असं का केलं?

स्वतःचं सरण रचून पूजा केली. त्यानंतर वृद्धाने स्वतःला जाळून घेतलं. नागपूर जिल्ह्यातील किन्ही येथील वृद्धाच्या आत्महत्येनं खळबळ उडाली. धगधगत्या चितेत वृद्धाने स्वतःचा देह त्यागला. आत्माराम ठवकर असं या ज्येष्ठ व्यक्तीचं नाव आहे.

आधी सरण रचले, पूजा केली नंतर स्वतःला जाळून घेतले, नागपुरात वृद्ध व्यक्तीनं असं का केलं?
मृतक आत्माराम ठवकर, याच शरणावर त्यांनी स्वतःला जाळून घेतलं.Image Credit source: tv 9
| Edited By: | Updated on: Mar 02, 2022 | 9:40 AM
Share

नागपूर : जिल्ह्याच्या कुही तालुक्यातील किन्ही (Kinhi in Kuhi taluka) येथील एका वृध्द शेतकऱ्याने आपल्याच शेतात स्वत: सरण रचले. पूजा करून त्याठिकाणी आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. आत्माराम मोतीराम ठवकर (Atmaram Motiram Thakkar) असं 80 वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. ते वारकरी असून, धार्मिक प्रवृतीचे होते. विशेष म्हणजे आत्महत्येपूर्वी रचलेल्या सरणाशेजारी त्यांनी विधीवत पूजाही केली. येथील भारत गॅस कंपनीचे मालक चिंधू ठवकर यांचे ते वडीत आहेत. शेतात असलेल्या गॅस गोडाऊनच्या शेजारी ( next to gas godown) त्यांचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला. आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही. पोलिसांनी तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मात्र, घरात सर्व सुख सोई असताना असा अघोरी विचार मनात का डोकावला, स्वत: सरण रचून आत्महत्या करण्याचे कारण काय ? यासारखे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.

नेमकं कसं घडलं

शनिवारी किन्ही येथे रात्री मंडईचे आयोजन करण्यात आले होते. आत्माराम ठवकर हे येथे झाडीपट्टी नाटक बघायला गेले होते. नाटक पाहून झाल्यावर ते पहाटे त्यांच्या शेतात आले. येथे त्यांनी शेतातील लाकडे गोळा केली. स्वतःसाठी लाकडांचे सरण रचले. त्यावर तणस टाकली. सरणाची पूजा केली. त्यानंतर ते सरणावर चढले. स्वत:ला त्यांनी जाळून घेतले.

आत्माराम होते धार्मिक वृत्तीचे

सकाळी आत्माराम यांचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत होता. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वेलतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविला. याप्रकरणी वेलतूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक नितेश डोर्लीकर करीत आहेत. आत्माराम हे धार्मिक वृत्तीचे होते. वारकरी संप्रदायाचे अनुयायी होते. वृद्धापकाळामुळे ते सतत आजारीही राहायचे. त्यांना कोणताही दुर्धर आजार नव्हता किंवा ते गंभीर आजारी पडले नाहीत. त्यांची आर्थिक परिस्थिती देखील चांगली होती. त्यांचे सर्व व्यवहार हे मुलगा बघत असतो. त्यांतरही त्यांनी हा टोकाचा निर्णय का घेतला, याचा पोलीस शोध घेत आहे.

पित्याची आत्महत्या, तीन दिवसांनी मुलीच्या बॅगमध्ये सुसाईड नोट सापडली, एकाला अटक

साहित्यिक राम शेवाळकर यांचा बालकीर्तनकार, शिक्षक ते प्राचार्य असा प्रवास माहीत आहे का?

नागपूर मनपाच्या कारभारणींनी घेतला आढावा, महिला व बालकल्याणाच्या योजना कुठपर्यंत?

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.