AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“आमच्या सरकारने सांगितले आहे की एकही मुलगा असला तरी शाळा बंद होणार नाही”; देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना उत्तर दिलं…

आपण शिक्षक भरती सुरू केली तर काही लोकांनी अफवा उडविला की पट संख्या कमी असलेल्या शाळा बंद होणार पण आम्ही शाळा बंद करणार नाही म्हणत त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला.

आमच्या सरकारने सांगितले आहे की एकही मुलगा असला तरी शाळा बंद होणार नाही; देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना उत्तर दिलं...
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Jan 15, 2023 | 5:38 PM
Share

मुंबईः शिक्षक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीमुळे राज्यातील वातावरण प्रचंड तापले आहे. नाशिकच्या सत्यजित तांबे यांच्या राजकीय भूमिकेमुळे भाजप (BJP) आणि काँग्रेसमध्ये (Congress) जोरदार खडाजंगी सुरू असतानाच उपमुख्यमंत्री यांनी नागो गाणार (Nago Ganar) यांना उमेदवारी घोषित करीत विरोधकांवर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी नागो गाणार यांना उमेदवारी घोषित केली असून भाजप आणि मित्र परिवाराचे त्यांनी समर्थन राहील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

बारा वर्षे नागो गाणार आमदार राहिले आहेत पण त्यांच्यामध्ये कोणताही बदल झाला नसल्याचे सांगत कोणीही भ्रष्ट्राचाराचा आरोप त्यांच्यावर करू शकत नाही या शब्दात त्यांनी त्यांचा गौरव केला आहे.

नागो गाणार हे सातत्याने त्यांचे प्रश्न लावून धरतात तर काही शिक्षक आमदार हे शिक्षकांचे प्रश्न सोडून बिल्डरांचे प्रश्न लावून धरतात असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला आहे. तर गाणार हे फक्त शिक्षकांचे प्रश्न मांडत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

उद्धव ठाकरे सरकारवर निशाणा साधताना त्यांनी म्हटले की, अडीच वर्षे उद्धवजी ठाकरे यांच्या सरकारने शिक्षकांसाठी एकही निर्णय घेतला नाही.

राज्यामध्ये एकही शिक्षक भरती केली नाही. आमच्या सरकारने सांगितले आहे की एकही मुलगा असला तरी शाळा बंद होणार नाहीत असा शब्द त्यांनी यावेळी दिला आहे.

भाजपने या योजना बंद केल्या आहेत असं वातावरण विरोधकांकडून तयार केले जात आहे अशी जोरदार टीकाही त्यांनी केली आहे.

नागो गाणार यांच्या कामाविषयी गौरवोद्गगार काढताना ते म्हणाले की, व्रतस्थपणे काम करणारे नेते फार कमी असतात त्यापैकी एक गाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

गेली अनेक वर्षे ही जागा शिक्षक परिषद वाढवते आणि भाजप त्यांना समर्थन देते यावर्षी सुद्धा आपण त्यांना समर्थन दिले आहे.

नागो गाणार 12 वर्ष आमदार राहिले आहेत. तरीही त्यांच्यामध्ये काडीचाही बदल झाला नाही. ते जमिनीवरच आहेत हे महत्त्वाचं आहे.

काही लोक आमदार होताच त्यांची विमान हवेत उडतात मात्र गाणार हे शिक्षकांच्या प्रश्नासाठी भिडतात आणि प्रश्न सुटेपर्यंत लढत राहतात अशा शब्दात त्यांनी त्यांचा गौरव केला आहे.

शिक्षण संस्थांपकावर बोलतानाही त्यांनी नागो गाणार यांच्या कामाचे कौतूक केले आहे. काही संस्था चालक गाणार यांच्यावर नाराज होतात मात्र ते कधी वैमनस्यातून त्याकडे बघत नाही तर शिक्षकांच्या प्रश्नसाठी ते कायमच लढत राहतात असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

कायम विना अनुदानित शाळांचा प्रश्न काँग्रेस-राष्ट्रवादीने निर्माण केला होता. आम्ही अश्वासन दिले नव्हतं पण आम्ही ते काम करून दाखविले आहे.

येत्या काळात आपण अनुदानाचे सगळे ठरलेले टप्पे पूर्ण करणार असून मागील सरकारने शिक्षकांच्या बाजूने कुठलेही निर्णय घेतले नाही असं सांगत ठाकरे सरकारवर त्यांनी जोरदार हल्लाबोल चढविला आहे.

आपण शिक्षक भरती सुरू केली तर काही लोकांनी अफवा उडविला की पट संख्या कमी असलेल्या शाळा बंद होणार पण आम्ही शाळा बंद करणार नाही म्हणत त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुनी पेन्शन योजनेववरूनही त्यांनी महाविकास आघाडीच्या सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी जुन्या पेन्शन योजनेवर बोलताना म्हणाले की, काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांची मला लाज वाटते ते जणू दाखवतात की. जुनी पेन्शन योजना भाजपने बंद केली आहे. मात्र तसे नाही.

पेन्शन खर्च वाढणार असल्याने विचारपूर्वक निर्णय घेतला पाहिजे असं मी सांगितलं होते. काही राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा ठरविले असले तरी ती अजून दिली नाही.

जुन्या पेन्शनचा वाद असो की कुठलाही तो प्रश्न सोडविण्याची ताकत फक्त आपल्यात आहे असा विश्वास व्यक्त करून त्यांनी विरोधखांवर जोरदार निशाणा साधला आहे.

Follow Us
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
राजकारणात नवा ट्विस्ट! शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा शरद पवारांना फोन; उद्या भेटून सविस्तर बोलू...
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...
Ashwini Bhide | मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची मागणी; BMCवर संताप
महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा
Rupali Chakankar | महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून मोठा वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा; दीपाली सय्यद अडचणीत?
रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड काय झाली चर्चा?
मोठी बातमी! रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड नेमकी काय झाली चर्चा?
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत...नेमकं काय घडलं?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
Kishori Pednekar | मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? मॅनहोलमध्ये पडून मृत्यू; BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...नेमकं काय घडतंय?
खाडकन उघडले धरणाचे 4 दरवाजे, तापी नदीपात्रात भयंकर विसर्ग सुरू, काळजी
खाडकन उघडले धरणाचे 4 दरवाजे, तापी नदीपात्रात भयंकर विसर्ग सुरू, काळजी घेण्याचे आवाहन!
राजकारणात मोठा ट्विस्ट! ठाकरे सेना-शिंदे सेना-भाजप एकाच मंचावर
राजकारणात मोठा ट्विस्ट! ठाकरे सेना-शिंदे सेना-भाजप एकाच मंचावर; औरंगाबादमध्ये नवं समीकरण
एकच खळबळ! माणूस मॅनहोलमध्ये कसा काय पडला? CCTV तून धक्कादायक माहिती
एकच खळबळ! माणूस मॅनहोलमध्ये कसा काय पडला? CCTV तून धक्कादायक माहिती समोर