AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमरावती लोकसभेची जागा आम्हालाच पाहिजे, हवं तर नवनीत राणा यांना…; बच्चू कडू यांचं मोठं विधान

Bacchu Kadu on Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणूक, अमरावती मतदार संघ अन् उमेदवारी; बच्चू कडू यांचा मोठा दावा. लोकसभेनंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवरही बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसंच शेतकरी आत्महत्येच्या मुद्यावरून त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

अमरावती लोकसभेची जागा आम्हालाच पाहिजे, हवं तर नवनीत राणा यांना...; बच्चू कडू यांचं मोठं विधान
| Updated on: Jan 03, 2024 | 10:09 AM
Share

गजानन उमाटे, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, नागपूर | 03 जानेवारी 2024 : लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आहे. अशातच युतीतील महत्वाचा घटक पक्ष असलेल्या प्रहारने लोकसभेसाठी काही जागांवर दावा केला आहे. यात अमरावती या लोकसभा मतदार संघावर प्रहारने दावा केला आहे. अमरावतीची जागा आम्ही मागणार आहोत, असं प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. अमरावतीमधून नवनीत राणा या खासदार आहेत. अशातही तुम्ही अमरावतीच्या जागेवर दावा करणार आहात का? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा नवनीत राणा यांनी आमच्या तिकीटावर निवडणूक लढवावी, असं बच्चू कडू म्हणालेत. टीव्ही 9 मराठीशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

“हे मतदारसंघ प्रहारला द्या”

अमरावतीची लोकसभेची जागा आम्हाला हवी आहे. हवं तर खासदार नवनीत राणा यांना प्रहारच्या तिकीटावर अमरावती लोकसभा मतदारसंघातून लढवू. नवनीत राणा महायुतीच्या उमेदवार म्हणून प्रहारच्या तिकीटावर अमरावती लोकसभा लढवू. अकोला, अमरावतीसह लोकसभेच्या तीन जागा आम्हाला हव्या आहेत, असं बच्चू कडू म्हणाले. आज महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. यावर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली.महायुतीच्या आजच्या पत्रकार परिषदेबाबत माहिती नाही, असं ते म्हणाले.

विधानसभा निवडणुकीवर म्हणाले…

लोकसभेपाठोपाठच विधानसभेची निवडणूकही महाराष्ट्रात होणार आहे. विधानसभेला किती जागांवर उमेदवार देणार? असा प्रश्न विचारला असता बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली. विधानसभेच्या 15 जागा आम्हाला लढवायच्या आहेत. 15 तारखेनंतर मिटिंग घेऊन भुमिका मांडू. जिथे आमचा उमेदवार खंबीर असेल. चांगला उमेदवार तिथे आम्ही लढू, असं बच्चू कडू म्हणाले. मी श्रीरामाचं दर्शन करुन आलोय. पुन्हा वाटलं तर पुन्हा दर्शनाला जाऊ, असंही त्यांनी सांगितलं.

सरकारवर आरोप

शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. शेतमालाला भाव मिळत नाही. शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी फक्त पॅकेज नको, कायम उपाय हवा. शेतीबाबत अनिश्चित धोरणामुळे शेतकरी आत्महत्या आहेत. तरुणांच्या आत्महत्या वाढल्याआहेत. ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या मुलांना मुली मिळत नाही. यासाठी सरकार जबाबदार आहे. शेतकऱ्यांच्या मुलांसोबत लग्न म्हणजे आगीत उडी घेतल्यासारखं आहे. चपराशाला, हॅाटेल मध्ये काम करणाऱ्यांना मुली देतात. पण शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी देत नाही. याला सरकार जबाबदार आहे, असा घणाघात बच्चू कडू यांनी केला आहे.

Follow Us
पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर राहुल गांधी आक्रमक; थेट म्हणाले. हे...
पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर राहुल गांधी आक्रमक; थेट म्हणाले. हे....
मुंबईत उष्णतेचा कहर; सलग तिसऱ्या दिवशी तापमान 35 अंशांच्या पार
मुंबईत उष्णतेचा कहर; सलग तिसऱ्या दिवशी तापमान 35 अंशांच्या पार.
पेट्रोल-डिझेल टंचाईची शक्यता? पंतप्रधान मोदींच्या आवाहानाबाबत नागरिक..
पेट्रोल-डिझेल टंचाईची शक्यता? पंतप्रधान मोदींच्या आवाहानाबाबत नागरिक...
पुन्हा वर्क फ्रॉम होमची गरज; मोदींचं मोठं आवाहन, म्हणाले.....
पुन्हा वर्क फ्रॉम होमची गरज; मोदींचं मोठं आवाहन, म्हणाले......
निदा खानची 44 दिवस लपाछपी, छत्रपती संभाजीनगरातून कुठे सटकणार होती?
निदा खानची 44 दिवस लपाछपी, छत्रपती संभाजीनगरातून कुठे सटकणार होती?.
पीएम मोदींच्या सोनं खरेदीवरील आवाहनानंतर ज्वेलरी उद्योगाची प्रतिक्रिया
पीएम मोदींच्या सोनं खरेदीवरील आवाहनानंतर ज्वेलरी उद्योगाची प्रतिक्रिया.
171 लिंक अन् थेट पीडितेच्या घरी जाऊन... TCS धर्मांतरण प्रकरणात नवा...
171 लिंक अन् थेट पीडितेच्या घरी जाऊन... TCS धर्मांतरण प्रकरणात नवा....
सुषमा अंधारे आज हक्कभंग कारवाईला सामोरं जाणार; राजकीय घडामोडींना वेग
सुषमा अंधारे आज हक्कभंग कारवाईला सामोरं जाणार; राजकीय घडामोडींना वेग.
हा घ्या एक कांदा आणि एक रुपया; संतप्त शेतकऱ्याचं फडणवीसांना पत्र...
हा घ्या एक कांदा आणि एक रुपया; संतप्त शेतकऱ्याचं फडणवीसांना पत्र....
भोंदू अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर अडचणीत; एसआयटीचे 8 सवाल चर्चेत
भोंदू अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर अडचणीत; एसआयटीचे 8 सवाल चर्चेत.