AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमरावती लोकसभेची जागा आम्हालाच पाहिजे, हवं तर नवनीत राणा यांना…; बच्चू कडू यांचं मोठं विधान

Bacchu Kadu on Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणूक, अमरावती मतदार संघ अन् उमेदवारी; बच्चू कडू यांचा मोठा दावा. लोकसभेनंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवरही बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसंच शेतकरी आत्महत्येच्या मुद्यावरून त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

अमरावती लोकसभेची जागा आम्हालाच पाहिजे, हवं तर नवनीत राणा यांना...; बच्चू कडू यांचं मोठं विधान
| Updated on: Jan 03, 2024 | 10:09 AM
Share

गजानन उमाटे, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, नागपूर | 03 जानेवारी 2024 : लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आहे. अशातच युतीतील महत्वाचा घटक पक्ष असलेल्या प्रहारने लोकसभेसाठी काही जागांवर दावा केला आहे. यात अमरावती या लोकसभा मतदार संघावर प्रहारने दावा केला आहे. अमरावतीची जागा आम्ही मागणार आहोत, असं प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. अमरावतीमधून नवनीत राणा या खासदार आहेत. अशातही तुम्ही अमरावतीच्या जागेवर दावा करणार आहात का? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा नवनीत राणा यांनी आमच्या तिकीटावर निवडणूक लढवावी, असं बच्चू कडू म्हणालेत. टीव्ही 9 मराठीशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

“हे मतदारसंघ प्रहारला द्या”

अमरावतीची लोकसभेची जागा आम्हाला हवी आहे. हवं तर खासदार नवनीत राणा यांना प्रहारच्या तिकीटावर अमरावती लोकसभा मतदारसंघातून लढवू. नवनीत राणा महायुतीच्या उमेदवार म्हणून प्रहारच्या तिकीटावर अमरावती लोकसभा लढवू. अकोला, अमरावतीसह लोकसभेच्या तीन जागा आम्हाला हव्या आहेत, असं बच्चू कडू म्हणाले. आज महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. यावर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली.महायुतीच्या आजच्या पत्रकार परिषदेबाबत माहिती नाही, असं ते म्हणाले.

विधानसभा निवडणुकीवर म्हणाले…

लोकसभेपाठोपाठच विधानसभेची निवडणूकही महाराष्ट्रात होणार आहे. विधानसभेला किती जागांवर उमेदवार देणार? असा प्रश्न विचारला असता बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली. विधानसभेच्या 15 जागा आम्हाला लढवायच्या आहेत. 15 तारखेनंतर मिटिंग घेऊन भुमिका मांडू. जिथे आमचा उमेदवार खंबीर असेल. चांगला उमेदवार तिथे आम्ही लढू, असं बच्चू कडू म्हणाले. मी श्रीरामाचं दर्शन करुन आलोय. पुन्हा वाटलं तर पुन्हा दर्शनाला जाऊ, असंही त्यांनी सांगितलं.

सरकारवर आरोप

शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. शेतमालाला भाव मिळत नाही. शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी फक्त पॅकेज नको, कायम उपाय हवा. शेतीबाबत अनिश्चित धोरणामुळे शेतकरी आत्महत्या आहेत. तरुणांच्या आत्महत्या वाढल्याआहेत. ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या मुलांना मुली मिळत नाही. यासाठी सरकार जबाबदार आहे. शेतकऱ्यांच्या मुलांसोबत लग्न म्हणजे आगीत उडी घेतल्यासारखं आहे. चपराशाला, हॅाटेल मध्ये काम करणाऱ्यांना मुली देतात. पण शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी देत नाही. याला सरकार जबाबदार आहे, असा घणाघात बच्चू कडू यांनी केला आहे.

रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.