AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘त्यांना जात प्रमाणपत्र मिळेल, पण नॉन क्रिमीलेअर होणार नाही’, ओबीसी नेत्याचं मोठं वक्तव्य

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या सगेसोयरेच्या मागणीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. ज्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांच्या सगेसोयऱ्यांना देखील प्रतिज्ञापत्राच्या आधारावर ओबीसी जात प्रमाणपत्र देण्यात यावं, अशी मागणी मनोज जरांगे यांची आहे. याचबाबत बबनराव तायवाडे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

'त्यांना जात प्रमाणपत्र मिळेल, पण नॉन क्रिमीलेअर होणार नाही', ओबीसी नेत्याचं मोठं वक्तव्य
जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Jan 26, 2024 | 7:58 PM
Share

सुनील ढगे, Tv9 मराठी, नागपूर | 26 जानेवारी 2024 : मराठा नेते मनोज जरांगे पाटील सगेसोयरेच्या मागणीवर ठाम आहेत. ज्या मराठ्यांच्या ओबीसी नोंदी सापडत आहेत त्यांच्या सगेसोयरेंना प्रतिज्ञापत्राच्या आधारे ओबीसी प्रमाणपत्र वाटप केलं जावं, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. मनोज जरांगे यांनी याबाबतच्या मागणीसाठी सरकारला आज रात्री आणि उद्या दुपारी 12 वाजेपर्यंतचा वेळ दिला आहे. सरकारने ही मागणी मान्य केली तर मराठा समाजाला मोठा दिलासा मिळणार आहे. मराठा समाजाच्या नागरिकांच्या आतापर्यंत 57 लाख नोंदी सापडल्या आहेत. त्यापैकी 37 लाख जणांना ओबीसी जात प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं आहे, असं सरकारने सांगितलं आहे. आता सगेसोयरेंना प्रतिज्ञापत्रांच्या आधारावर ओबीसी प्रमाणपत्र देण्याची मागणी मान्य केली तर मराठा समाजाच्या मोठ्या जनसमुदायाला थेट ओबीसी जात प्रमाणपत्र मिळणार आहे. पण राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी याबाबत मोठा दावा केला आहे.

“मनोज जरांगे यांनी मागणी केली की ज्याच्या नोंदी मिळाल्या त्यांच्या नातेवाईकांच्या नोंदी नसतील तर प्रतिज्ञापत्र देऊन प्रमाणपत्र दिलं जावं. असं ते म्हणत असले तरी त्याचा फायदा होणार नाही. त्यांना जात प्रमाणपत्र मिळेल. मात्र त्यांचं नॉन क्रिमीलेअर होऊ शकत नाही. कारण त्यासाठी वंशावळी असावी लागते. ते त्यांच्याकडे मिळणार नाही. त्यामुळे त्याचा फायदा होणार नाही”, असा मोठा दावा बबनराव तायवाडे यांनी केला.

‘ते’ राज्य सरकारच्या हातात नाही, बबनराव तायवाडे यांचा दावा

“मनोज जरांगे म्हणतात 37 लाख लोकांना प्रमाणपत्र निर्गमित केले आहेत, आणि त्यांच्याकडे यादी आहे, तर त्या यादीच्या प्रतीक्षेत आम्ही आहोत. माझ्या मते ज्या काही 54 लाख नोंदी सापडल्या त्यापैकी 99 टक्के जुन्याच नोंदी आहेत. सगेसोयरे संदर्भात निर्णय घेणे हे राज्य सरकारच्या हातात नाही, आपली पितृसत्ताक असल्याने वडिलांची जात मुलांना लागते, आईकडची जात लागत नाही. जे सर्व जीआर जरांगे मागत आहे, ते सर्व जुनेच नियम आहेत. 12 वी पर्यंत मुलींना मोफत शिक्षण आहेच, त्या पुढच्या शिक्षणासाठीही मदत मिळते”, असं बबनराव तायवाडे म्हणाले.

“मनोज जरांगे यांच्या ज्या काही मागण्या होत्या त्या मान्य झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे रात्रभरात आंदोलन समाप्त होईल अशी अपेक्षा आहे”, असं बबनराव तायवाडे म्हणाले. तसेच “सध्याच्या घडामोडींवरून आम्ही सरकार आणि जरांगे पाटील यांच्या भूमिकेकडे लक्ष ठेवून आहोत”, अशी प्रतिक्रिया बबनराव तायवाडे यांनी दिली.

Follow Us
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला