AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | नागपुरात चट मंगनी, पट ब्याह! दहा मिनिटांत नोंदणी; अर्ध्या तासात लग्न, कसे ते वाचा

लग्न म्हटलं की बँड बाजा आणि बारात आलेच. पण, कोरोनामुळं हा ट्रेंड लोप पावतोय. दहा मिनिटांत नोंदणी, आणि अर्ध्या तासांत लग्न. हा नवा ट्रेंड कोरोनामुळं आलाय. कसा ते वाचा.

Video | नागपुरात चट मंगनी, पट ब्याह! दहा मिनिटांत नोंदणी; अर्ध्या तासात लग्न, कसे ते वाचा
प्रातिनिधीक फोटो
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Jan 21, 2022 | 10:17 AM
Share

नागपूर : जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहेत. रोजची रुग्णसंख्या साडेचार हजारच्या उंबरठ्यावर गेलीय. त्यामुळेच नागपूर जिल्ह्यात तरुणांमध्ये शॅार्टकट मॅरेजचा ट्रेंड वाढतोय. ना बॅंडबाजा, ना बारात, ना घोडा, ना मनपाच्या कारवाईचं टेन्शन… दहा मिनिटांत लग्नाची नोंदणी आणि अर्ध्या तासांत शुभमंगल… असं शॅार्टकट लग्न उरकणाऱ्यांची संख्या नागपुरात वाढलीय. गेल्या वीस दिवसांत नागपुरात सव्वादोनशे पेक्षा जास्त जोडण्यांनी कोर्टमॅरेज करत शॅार्टकट लग्न उरकलंय.

झाडाखालीच घातले फुलांचे हार

वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे नागपुरातील सलील आणि ईश्वरी यांनी शॅार्टकट मॅरेजचा पर्याय निवडत कोर्टमॅरेज केलंय. सलील मोठ्या कंपनीत इंजिनिअर आहे, तर ईश्वरी आर्किटेक्ट. कोरोना वाढू नये म्हणून सरकारने लग्नात पन्नास पाहुण्यांची मर्यादा घालून दिलीय. सलील आणि ईश्वरी यांनी सरकारी निर्बंधांचं तंतोतंत पालन करत. 42 पाहुणे, दहा मिनिटांत लग्नाची नोंदणी आणि जिल्हाधिकारी कार्यालय परिसर झाडाच्या खाली एकमेकांना फुलाचा हार घालत, शुभमंगल सावधान केलं. आणि वाढत्या कोरोनापासून इतरांनाही सावधान होण्याचा सल्ला .

कोरोना निर्बंधांचा परिणाम

कोरोना निर्बंधांमुळे नागपुरात सलील आणि इश्वरी यांनीच शॅार्टकट विवाहाचा निर्णय घेतला असं नाही, तर गेल्या वीस दिवसांत नागपुरातील सव्वादोनशेपेक्षा जास्त जोडप्यांनी अशाचप्रकारे आपलं लग्न उरकलं. वैभव पाटील हे त्यापैकीच एक. निसर्गाच्या सानिध्यात एक दुसऱ्याला हार घालत दहा मिनिटांत त्यांचंही शुभमंगल झाल्याची माहिती विवाह नोंदणी निबंधक सीमा वालदे यांनी दिली. नागपुरात एकीकडे सरकारी निर्बंध धाब्यावर बसवत लॅानमध्ये लग्न करणारे जोडपेही आहेत. तर दुसरीकडे कोरोनाच्या संकटात सरकारी नियमांचं काटेकोर पालन करत, समाजासमोर आदर्श घालून देणारे जोडपे हे जोडपे. या जोडप्यांचं समाजाने कौतुक करायला हवं.

Dam water| आनंदाची बातमी! राज्यात यंदा उन्हाळ्यात पाणीटंचाई नाही; धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा

Chandrasekhar Bavankule | पटोलेंवर गुन्हा दाखल करावा, यासाठी आंदोलन करणाऱ्या बावनकुळेंवर गुन्हा; कोविड सूचनांचे उल्लंघन केले?

Gadchiroli Election | धर्मरावबाबा, अमरीशरावांच्या अहेरीत आदिवासी विद्यार्थी संघटनेची एंट्री, महाविकास आघाडीचे वर्चस्व

Follow Us
हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! पवार संतापले
Rohit Pawar Tweet | हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या मृत्यूवर रोहित पवार संतापले
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं...
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं एका पाठोपाठ...
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल, म्हणाली, आम्ही फक्त...
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; सुषमा अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले;
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले; पंतप्रधानांच्या अगदी मागे उभा असलेल्या नेत्याला...
मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
Manoj Jarange | मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून ..
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून सवाल
वडापाव घ्यायला गेला अन्... पायाला धक्का लागल्याच्या वादातून मोठा घात,
मोठी खळबळ! वडापाव घ्यायला गेला अन् जीवाला मुकला... पुण्यात काय घडलं?
जेन-झीला खूश करण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन? मुंबई लोकलमध्ये...
Tejaswi Ghosalkar | जेन-झीला खूश करण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन? मुंबई लोकलमध्ये विद्यार्थ्यांसाठी 3 डबे राखीव ठेवण्याची मागणी!
मोहन भागवत 15 ऑगस्टला नागपुरात! तरुणांशी साधणार संवाद
Mohan Bhagwat | मोहन भागवत 15 ऑगस्टला नागपुरात! तरुणांशी साधणार संवाद; भारताच्या उज्ज्वल भविष्यावर मांडणार विचार