AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dam water| आनंदाची बातमी! राज्यात यंदा उन्हाळ्यात पाणीटंचाई नाही; जाणून घ्या धरणांमधील पाणीसाठ्याची स्थिती

सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे. यंदा उन्हाळ्यात पाणीटंचाई राहणार नाही. राज्यातील धरणांमध्ये 82.33 टक्के जलसाठा उपलब्ध आहे. धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा राहणार आहे. त्यामुळं पाण्याची चिंता नाही.

Dam water| आनंदाची बातमी! राज्यात यंदा उन्हाळ्यात पाणीटंचाई नाही; जाणून घ्या धरणांमधील पाणीसाठ्याची स्थिती
गोसे धऱणाचे संग्रहित छायाचित्र.
| Edited By: | Updated on: Jan 21, 2022 | 6:41 AM
Share

नागपूर : राज्यातील जनतेसाठी आनंदाची बातमी आहे. सध्या राज्यातील धरणांमध्ये 80.33 टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळं यंदा मे महिन्याच्या उकाड्यातंही राज्यातील जनतेला पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही. नागपूर, अमरावती, औरंगाबाद आणि कोकण विभागातील लघू, मध्यम आणि मोठ्या एकूण धरणांमध्ये सरासरी 82.33 टक्क्यापेक्षा जास्त पाणीसाठा आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत सध्या राज्यातील धरणांमध्ये नऊ टक्के जास्त पाणीसाठा आहे. ही राज्यातील जनतेसाठी आनंदाची बाब आहे.

विदर्भ विभागात 80 टक्के पाणीसाठा

अमरावती विभागात धरणांमध्ये 81.13 टक्के पाणीसाठी उपलब्ध आहे. गेल्या वर्षी तो 71.17 टक्के होता. नागपूर विभागात 77.44 टक्के पाणीसाठी आहे. गेल्या वर्षी तो 66.63 टक्के होता. राज्यातील लघू, मध्यम आणि मोठ्या धरणांमध्ये मिळून सध्या 82.33 टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे राज्यातील धरणात पुरेसा पाणीसाठा असल्याने यंदा उन्हाळ्यातंही पाण्याची चिंता नाही. नाशिक विभागात पाणीसाठा 83.78 टक्के होता. गेल्या वर्षी तो 78.7 टक्के होता. पुणे विभागात पाणीसाठा 83.31 टक्के होता. गेल्या वर्षी तो 76.89 टक्के होता. राज्यात एकूण पाणीसाठा 82.33 टक्के आहे.

औरंगाबाद विभागात 83.91 टक्के पाणीसाठा

औरंगाबाद विभागात 83.91 टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी तो 73.57 टक्के होता. कोकण विभागात 80.8 टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी तो 71.79 टक्के होता. दरवर्षी उन्हाळा आला की, पाणीटंचाईचा प्रश्न पडतो. पण, गेल्या वर्षी धरण भरले होते. यंदाही अशीच परिस्थिती आहे. याचा कारणही तसेच आहे. कोरोनामुळं उद्योगधंदे बंद होते. त्यामुळं पाण्याचा वापर कमी प्रमाणात झाला. शिवाय लोकं घराबाहेर कमी पडले. त्याचाही परिणाम पाणीसाठ्यावर झाला. पाण्याचा वापर कमी झाल्यामुळं धरणांतील पाणीसाठी कमी खर्च झाला. त्यामुळं यंदा धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठी आहे.

Chandrasekhar Bavankule | पटोलेंवर गुन्हा दाखल करावा, यासाठी आंदोलन करणाऱ्या बावनकुळेंवर गुन्हा; कोविड सूचनांचे उल्लंघन केले?

Gadchiroli Election | धर्मरावबाबा, अमरीशरावांच्या अहेरीत आदिवासी विद्यार्थी संघटनेची एंट्री, महाविकास आघाडीचे वर्चस्व

Corona | नागपुरात कोरोनाची दाहकता वाढली, रुग्णसंख्येने गाठला उच्चांकी आकडा; जाणून घ्या आजची स्थिती

शशिकांत शिंदेंचा विलीनीकरणावर मोठा दावा; तटकरेंची तीव्र प्रतिक्रिया
शशिकांत शिंदेंचा विलीनीकरणावर मोठा दावा; तटकरेंची तीव्र प्रतिक्रिया.
विलिनीकरणाला 35 आमदारांचा पाठिंबा? काय म्हणाले सुनील तटकरे?
विलिनीकरणाला 35 आमदारांचा पाठिंबा? काय म्हणाले सुनील तटकरे?.
शिवभोजन थाळी चालकांची चंद्रशेखर बावनकुळेंसमोर जोरदार घोषणाबाजी!
शिवभोजन थाळी चालकांची चंद्रशेखर बावनकुळेंसमोर जोरदार घोषणाबाजी!.
Sunil Tatkare : शशिकांत शिंदेंच्या लेखावर सुनील तटकरेंकडून आक्षेप!
Sunil Tatkare : शशिकांत शिंदेंच्या लेखावर सुनील तटकरेंकडून आक्षेप!.
काँग्रेसच्या मांडीवर बसून शेण तुम्हीच खल्लंय! बन यांचा राऊतांना टोला
काँग्रेसच्या मांडीवर बसून शेण तुम्हीच खल्लंय! बन यांचा राऊतांना टोला.
महापौर रितू तावडेंचे अनधिकृत फेरीवाल्यांवर कठोर कारवाईचे आदेश
महापौर रितू तावडेंचे अनधिकृत फेरीवाल्यांवर कठोर कारवाईचे आदेश.
आमची भूमिका ठरवणारा भाजप कोण? शंभुराज देसाईंचा थेट सवाल
आमची भूमिका ठरवणारा भाजप कोण? शंभुराज देसाईंचा थेट सवाल.
स्पिरीट ऑफ मुंबईच्या नावाखाली लोकलचा जीवघेणा प्रवास! व्हिडीओ व्हायरल
स्पिरीट ऑफ मुंबईच्या नावाखाली लोकलचा जीवघेणा प्रवास! व्हिडीओ व्हायरल.
टी20 विश्वचषकात उलटफेर: झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला हरवले
टी20 विश्वचषकात उलटफेर: झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला हरवले.
चंद्रपूर : भाजप-ठाकरे गटाची युती, मनसेचा संजय राऊतांवर हल्लाबोल
चंद्रपूर : भाजप-ठाकरे गटाची युती, मनसेचा संजय राऊतांवर हल्लाबोल.