AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकारी धान्य खाजगी गोडाऊनमध्ये उतरवत होते, तितक्यात अन्न पुरवठा विभागाचे अधिकारी आले अन्…

गेल्या अनेक दिवसापासून नागपुरात सरकारी धान्याचा काळाबाजार सुरु असल्याची माहिती अन्नप्रशासन विभागाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी आज छापा टाकला.

सरकारी धान्य खाजगी गोडाऊनमध्ये उतरवत होते, तितक्यात अन्न पुरवठा विभागाचे अधिकारी आले अन्...
नागपुरत सरकारी धान्याचा काळाबाजार उघडImage Credit source: TV9
| Updated on: Apr 20, 2023 | 8:37 PM
Share

नागपूर / सुनील जाधव : नागपूरमध्ये रेशन घोटाळा उघडकीस आला आहे. रेशनच्या धान्याचा काळाबाजार उघड झाला आहे. रेशनमध्ये गरिबांना दिलं जाणारं धान्य परवानगी नसलेल्या एका खाजगी गोडाऊनमध्ये उतरवण्यात येत होते. तितक्यात अन्नपुरवठा विभागाचे अधिकारी तेथे हजर झाले आणि त्यांनी घोटाळेबाजांना रंगेहाथ पकडले. पन्नास क्विंटल धान्य खाजगी गोडाऊनमध्ये उतरविण्यात आलं होतं. हे धान्य कुठून आलं आणि कोणाला विकलं जाणार होता याचा तपास सुरू आहे. यामागे मोठे रॅकेट सक्रिय असण्याची शक्यता आहे. याप्रकरणी सखोल तपास सुरु आहे.

गेल्या काही दिवसापासून सुरु होता धान्याचा काळाबाजार

गेल्या काही दिवसांपासून नागपूर शहरात रेशनच्या सरकारी धान्याचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असल्याची माहिती अन्नप्रशासन विभागाला मिळाली होती. तसेच ठाकरे गटाच्या युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा अन्न प्रशासन विभागाला या संदर्भात माहिती दिली होती. मात्र आरोपी हाती लागत नव्हते.

गुप्त माहितीच्या आधारे अन्नपुरवठा विभागाने छापा टाकला

गड्डीगोदाम परिसरातील एका गोडाऊनमध्ये सरकारी धान्य उतरविले जात असल्याची गुप्त माहिती आज अन्न वितरण विभागाला मिळाली होती. सदर गोडाऊन खाजगी आहे. तिथे कुठलाही बोर्ड नाही. यावरून अन्न वितरण विभागाने त्या ठिकाणी पोहोचत कारवाई केली असता त्या गोडाऊनमध्ये जवळपास 50 क्विंटल धान्य आढळून आले. ते धान्य सरकारी स्टॅम्प लागलेले आहे. सोबतच ट्रक चालकाकडून मिळालेल्या माहितीनुसार त्या ठिकाणी आणखी पंधरा क्विंटल धान्य पोहोचवलं जाणार होतं. त्यावरून ही कारवाई करण्यात आली असून, पुढील कारवाई आता अन्नप्रशासन विभाग करत आहे.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.