AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक, कुठे घडली ही घटना?

नुकतेच पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनवर दगडफेक केल्याची घटना समाेर आली आहे.

नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक, कुठे घडली ही घटना?
वंदे भारत एक्सप्रेसImage Credit source: Social Media
| Updated on: Dec 16, 2022 | 10:57 AM
Share

नागपूर, छत्तीसगडमध्ये नुकत्याच सुरू झालेल्या नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) ट्रेनच्या खिडकीवर अज्ञात व्यक्तीने दगडफेक (Stone pelting) केल्याची घटना समाेर आली आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR) च्या रायपूर विभागांतर्गत दुर्ग आणि भिलाई नगर रेल्वे स्थानकांदरम्यान ही सेमी हाय स्पीड ट्रेन राज्यातील बिलासपूरला जात असताना बुधवारी संध्याकाळी ही घटना घडल्याचे रेल्वे अधीकऱ्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी झाले हाेते लाेकार्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला हाेता. महाराष्ट्रातील नागपूर आणि छत्तीसगडमधील बिलासपूर दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन, देशातील सहावी सेवा आहे.

अज्ञात ईसमाने ट्रेनवर दगडफेक केली, ज्यामुळे काल संध्याकाळी E1 कोचच्या खिडकीचे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही, असे अधिकारी म्हणाले. रेल्वे प्रोटेक्शन फोर्सला (आरपीएफ) याची माहिती देण्यात आली आणि  घटनेची चौकशी सुरू करण्यात आली, असेल्याचे अधिकाऱ्यांनी सांगीतले.

यासाठी विषेश आहे वंदेभारत एक्सप्रेस

नागपूर-बिलासपूर मार्गावर धावणारी ही एक्सप्रेस  सुमारे 130 किमी प्रतितास वेगाने या मार्गावर 412 किलोमीटरचे अंतर कापते. नागपूर, गोंदिया, राजनांदगाव, दुर्ग, रायपूर आणि बिलासपूर येथे 6 थांब्यांसह हे अंतर कापण्यासाठी ट्रेनला 5 तास 30 मिनिटे लागतात.

1128 प्रवासी वाहून नेण्याची क्षमता असलेले या एक्सप्रेसमध्ये 16 चेअर-कार कोच आहेत. याशिवाय ही ट्रेन अनेक वैशिष्ट्यांनी परीपूर्ण आहे, तसेच प्रवाशांच्या सुरक्षेसाठी, अनेक सुविधांसह त्यात कॅमेरे आहेत.

नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन ही महाराष्ट्रातील दुसरी आणि भारतातील सहावी ट्रेन आहे. याआधी भारतात विविध मार्गावर 5 गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत.

देशातील पहिली सेमी-हाय-स्पीड रेल्वे कानपूर आणि अलाहाबादलाही सेवा पुरवते. दुसरी वंदे भारत ट्रेन दिल्ली आणि श्री वैष्णो देवी माता, कटरा दरम्यान सुरू करण्यात आली. मुंबई ते गांधीनगर दरम्यान तिसरी ट्रेन धावते. हिमाचल प्रदेशातील उना ते नवी दिल्ली असा प्रवास करणारी चौथी वंदे भारत एक्सप्रेस आहे.

अनिल पाटील अजितदादांच्या भेटीला, गळ्यात क्रीडा मंत्रिपदाची माळ पडणार
अनिल पाटील अजितदादांच्या भेटीला, गळ्यात क्रीडा मंत्रिपदाची माळ पडणार.
मुनगंटीवारांच्या विधानानं चंद्रपूरवरून भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळला
मुनगंटीवारांच्या विधानानं चंद्रपूरवरून भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळला.
CCI केंद्रावरील कर्मचाऱ्याला खोतकरांनी झापलं, शेतकऱ्यांना इंग्रजीत msg
CCI केंद्रावरील कर्मचाऱ्याला खोतकरांनी झापलं, शेतकऱ्यांना इंग्रजीत msg.
ठाकरे बंधूंचं ठरलं! युतीची उद्या घोषणा, 'या' 7 पालिकांसाठी एकत्र लढणार
ठाकरे बंधूंचं ठरलं! युतीची उद्या घोषणा, 'या' 7 पालिकांसाठी एकत्र लढणार.
महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात, भाजप-शिवसेनेचं 180 जागांवर एकमत
महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात, भाजप-शिवसेनेचं 180 जागांवर एकमत.
अखेर ठरलं ! दोन्ही NCP एकत्र, निवडणुकीबाबत मोठी अपडेट; इतिहास घडणार?
अखेर ठरलं ! दोन्ही NCP एकत्र, निवडणुकीबाबत मोठी अपडेट; इतिहास घडणार?.
जगतापांच्या राजीनाम्याचा सस्पेन्स वाढला, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
जगतापांच्या राजीनाम्याचा सस्पेन्स वाढला, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?.
धमक अन् ताकद नाही... दानवेंनी थोपटले दंड, शिरसाटांना खुलं आव्हान
धमक अन् ताकद नाही... दानवेंनी थोपटले दंड, शिरसाटांना खुलं आव्हान.
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार! संजय राऊत यांच्या ट्विटनं चर्चा
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार! संजय राऊत यांच्या ट्विटनं चर्चा.
बिबट्यासाठी जंगलात बोकड सोडणार ही योजना...शेट्टींचा गणेश नाईकांचा टोला
बिबट्यासाठी जंगलात बोकड सोडणार ही योजना...शेट्टींचा गणेश नाईकांचा टोला.