AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुग्धाभिषेकानंतर आता राहुल गांधी यांच्यासाठी मशाल मार्च; काँग्रेसनं जशास तसं दिलं उत्तर

कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात आणि भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. राम कुलर चौकापासून निघालेला हा मार्च महाल परिसरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ पोहोचला.

दुग्धाभिषेकानंतर आता राहुल गांधी यांच्यासाठी मशाल मार्च; काँग्रेसनं जशास तसं दिलं उत्तर
| Edited By: | Updated on: Mar 27, 2023 | 9:39 PM
Share

नागपूर : गेल्या दोन दिवसांपासून देशासह राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. लोकसभा अध्यक्षांकडून राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आल्यामुळे आता काँग्रेस आणि भाजप आमने सामने आली आहे. त्यातच राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाविरोधात वक्तव्य केल्याचा आरोपही भाजपकडून करण्यात आला आहे. त्याविरोधात भाजपकडून राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. तर भाजपने राहुल गांधी यांच्याविरोधात कारवाई केल्यामुळे लोकशाहीची वाटचाल हुकुमशाहीकडे होत असल्याचा आरोप केला गेला करत राहुल गांधी यांच्यावर झालेली कारवाई जोपर्यंत मागे घेतली जात नाही तोपर्यंत काँग्रेसकडून आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

भाजपकडून राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाचा अपमान केल्याची आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यभरात त्यांच्याविरोधात आंदोलन केले जाणार असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले होते.

तर काल सोलापूरात राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलन केले गेल्यानंतर आज सोलापूरातच राहुल गांधी यांच्या समर्थनात त्यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेकही करण्यात आला.

त्यामुळे काँग्रेससनेही भाजपला जशास तसे उत्तर दिल्याचे आज दिसून आले. तर सोलापूरात दुग्धाभिषेक करण्यात आल्यानंतर नागपूरात आज राहुल गांधी यांच्या समर्थनाथ मशाल मार्च काढून राहुल गांधी यांच्यावरील कारवाई मागे घ्या अशा घोषणा देत भाजप विरोधातही जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

राहुल गांधी यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईविरोधात आणि राहुल गांधींच्या समर्थनात नागपुरात युवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मशाल मार्च काढून राहुल गांधी यांच्या सर्मथनात घोषणाही देण्यात आल्या.

यावेळी कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात आणि भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. राम कुलर चौकापासून निघालेला हा मार्च महाल परिसरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ पोहोचला.

या ठिकाणी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि राहुल गांधींना न्याय मिळत नाही तोपर्यंत अशाच प्रकारे आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.