AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | उत्तम गालवा कंपनीतील अपघातात 38 मजूर भाजले, 10 गंभीर जखमी

जिल्ह्यातील भुगाव येथील उत्तम गालवा कंपनीत झालेल्या अपघातात 38 मजूर भाजले असल्याची माहिती समोर आली आहे. wardha uttam galawa accident

Video |  उत्तम गालवा कंपनीतील अपघातात 38 मजूर भाजले, 10 गंभीर जखमी
उत्तम गालवा कंपनीत अपघात
| Updated on: Feb 03, 2021 | 3:32 PM
Share

वर्धा: जिल्ह्यातील भुगाव येथील उत्तम गालवा कंपनीत झालेल्या अपघातात 38 मजूर भाजले असल्याची माहिती समोर आली आहे. 38 जखमीपैकी 10 मजूर गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. गंभीर भाजलेल्या मजुरांना नागपूरला उपचारासाठी पाठवलं जाण्याची शक्यता आहे. कंपनी प्रशासनाच्या मतानूसार कंपनीत विस्फोट झाला नसून हा अपघात आहे. या घटनेची कामगार अधिकाऱ्यांमार्फत चौकशी होणार आहे. या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी प्रशासनाकडून टाळाटाळ करण्यात येत असल्याचं दिसून येत आहे. (wardha uttam galawa company accident 38 labours injured 10 serious)

भुगाव येथील उत्तम गालवा मेंटालीक स्टील या कंपनीत ब्लास फर्निश या युनिटमध्ये सकाळच्या सुमारास अपघात घडलाय. या घटनेत 35 मजूर जखमी झाले असून त्यातील 10 मजूर गंभीर जखमी आहे. जखमींना सावंगी आणि सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.गंभीर घटना घडूनही अद्यापपर्यंत कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही.

10 मजूर 40 टक्के भाजले

आज (3 फेब्रुवारी) सकाळी पाचच्या दरम्यान दुरुस्ती करण्याकरता प्लांट बंद करण्यात आला होता.आठ वाजता या ठिकाणी काम चालू करण्यात आले. दरम्यान कंपनीच्या ब्लास फर्निश या युनिटमध्ये सकाळी दहा वाजताच्या सुमारास हा अपघात घडलाय. दरम्यान ट्यु एयरमधून गरम हवा आणि बारीक कण उडाले यामुळे मजूर भाजले गेले आहेत. या घटनेत 35 कामगार भाजून जखमी झाले आहे. त्यातील 28 जण सावंगी, 10 मजुरांना सेवाग्राम येथे पाठवण्यात आले आहे. 40 टक्क्यांपेक्षा जास्त भाजल्यामुळे 10 जण जास्त गंभीर जखमी आहेत. दोन ते तीन जणांना नागपूरला उपचाराला पाठवणार असल्याची माहिती उत्तम गालवा कंपनीचे जनसंपर्क अधिकारी आर. के .शर्मा यांनी सांगितलं आहे.

या प्रकरणी कामगार अधिकाऱ्यामार्फत चौकशी करण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी दिली आहे. जिल्ह्याचे महसूल प्रशासन, जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झालं असून त्यांच्याकडून पंचनामा केला गेला आहे.

35 कामगार भाजल्याच्या या प्रकरणात जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी कामगार अधिकारी मार्फत चौकशी केली जाणार असल्याची माहिती दिलीय. मात्र, अद्यापपर्यंत या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही.सावंगी पोलिसांनी या प्रकरणाचा पंचनामा केलाय. मात्र, गुन्हा दाखल करण्यासाठी प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात आहे. घटने दरम्यान सेफ्टी ऑफिसर सुद्धा त्याठिकाणी उपस्थित असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे कामगारांमध्ये सध्या दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

संबंधित बातम्या:

Wardha | वर्धातील उत्तम गालवा कंपनीत भीषण अपघात, 26 कामगार भाजले

वर्धाच्या बॅचलर रोड मार्गावर विचित्र अपघात

(wardha uttam galawa company accident 38 labours injured 10 serious)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.