AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यातील धरणसाठ्यांची परिस्थिती काय, किती कुठं आहे धरणांतील साठा जाणून घ्या

नागपूर विभागातील मोठे, मध्यम आणि लहान धरणांमध्ये ४० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर कोकण विभागातील धरणांमध्ये ३७ टक्के पाणीसाठा पाणीसाठा शिल्लक आहे.

राज्यातील धरणसाठ्यांची परिस्थिती काय, किती कुठं आहे धरणांतील साठा जाणून घ्या
| Updated on: May 21, 2023 | 11:43 PM
Share

गजानन उमाटे, प्रतिनिधी, नागपूर : राज्यातील जनतेसाठी चिंता मिटवणारी एक चांगली बातमी आहे. कडाक्याच्या उन्हात पाण्याची मागणी वाढली असताना राज्यातील सर्व धरणांमध्ये सध्या एकूण ३२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षी येवढाच पाणीसाठा सध्या धरणांमध्ये आहे. पावसाळ्यापर्यंत पुरेसा इतका पाणीसाठा सध्या राज्यातील धरणांमध्ये आहे. त्यामुळेच सध्या राज्यात पाणीटंचाईची चिंता नाही. सध्या नागपूर विभागातील मोठे, मध्यम आणि लहान धरणांमध्ये ४० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर कोकण विभागातील धरणांमध्ये ३७ टक्के पाणीसाठा पाणीसाठा शिल्लक आहे.

अमरावती विभागातील धरणांमध्ये ४१ टक्के पाणीसाठा, तर औरंगाबाद विभागात ३६ टक्के आणि नाशिक विभागातील धरणांमध्ये ३४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या उन्हाळ्यातंही यावेळेस धरणांमध्ये ३२ टक्केच पाणीसाठा शिल्लक होता.

यावेळेसही राज्यातील सर्व लघू, मध्यम आणि मोठ्या धरणांमध्ये ३२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढली तरिही, पावसाळ्यापर्यंत महाराष्ट्राला पुरेसा येवढा पाणीसाठा धरणांमध्ये असल्याने पाणीटंचाईची चिंता नाही.

पुणे विभागात फक्त २३ टक्के पाणीसाठा शिल्लक

राज्याच्या जलसंधारण विभागाच्या माहितीनुसार पुणे विभाग सोडल्यास राज्यातील इतर विभागातील धरणांमध्ये सध्या पुरेसा पाणीसाठा शिल्लक आहे. नागपूर विभागातील धरणांमध्ये ४० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. कोकण विभागातील धरणांमध्ये ३७ टक्के पाणीसाठा, तर अमरावती विभागातील धरणांमध्ये ४१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. शिवाय पुणे विभागात २३ टक्के पाणीसाठा असल्याने थोडी चिंता आहे. परंतु, राज्यातील विचार करता यंदा पाणीचंटाई नाही, असेच म्हणता येईल.

कुठल्या विभागातील धरणात किती पाणीसाठा शिल्लक

विभाग धरणातील पाणीसाठा

अमरावती – ४१ टक्के

कोकण – ३७ टक्के

नागपूर – ४० टक्के

नाशिक – ३४ टक्के

पुणे – २३ टक्के

औरंगाबाद – ३६ टक्के

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.