AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाना पटोलेंकडून भूमाफियाचा शिक्का, भाजप आमदार संतापला, म्हणाला मविआ काळात…

नाना पटोले यांनी केलेले स्टॅम्प ड्युटी घोटाळ्याचे आरोप भाजप नेते नरेंद्र मेहता यांनी फेटाळून लावले आहेत. ही योजना मविआ काळातीलच असून राजकीय हेतूने सुपारी घेऊन आरोप केले जात असल्याचे मेहता यांनी म्हटले आहे.

नाना पटोलेंकडून भूमाफियाचा शिक्का, भाजप आमदार संतापला, म्हणाला मविआ काळात...
nana patole narendra mehta
| Updated on: Mar 17, 2026 | 1:49 PM
Share

मीरा भाईंदरचे आमदार आणि भाजप नेते नरेंद्र मेहता यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लावलेले सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. नाना पटोले यांनी मंत्र्यांना पत्र लिहून मेहता यांच्यावर भूमाफिया असल्याचा शिक्का मारला असून स्टॅम्प ड्युटी (मुद्रांक शुल्क) घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी केली होती. यावर नरेंद्र मेहता यांनी प्रत्युत्तर दिले आहे. माझा अशा प्रकारचा कोणताही घोटाळा झालेला नाही, हे सर्व व्यवहार अत्यंत पारदर्शक आहेत. माझ्यावरील स्टॅम्प ड्युटी घोटाळ्याचे आरोप पूर्णपणे बिनबुडाचे असून, राजकीय शत्रूंनी दिलेल्या सुपारीवरूनच ही चिखलफेक केली जात आहे, अशा शब्दात नरेंद्र मेहता यांनी प्रत्युत्तर दिले.

कोणतेही मुद्रांक शुल्क थकलेले नाही

नरेंद्र मेहता यांनी नुकतंच विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना याबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी सविस्तर उत्तर दिले. ज्या योजनेचा उल्लेख केला जात आहे, ती योजना खुद्द महाविकास आघाडी सरकारच्या काळात नाना पटोले सभापती असतानाच आणली गेली होती. जर या योजनेत काही त्रुटी असतील, तर मविआ सरकारने बिल्डरांना खूश करण्यासाठी ही योजना आणली होती का, याचा खुलासा नाना पटोले यांनीच करावा. माझ्या नावावर आमदार होण्यापूर्वी केवळ एकच जागा होती आणि तिची सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आमची कोणतीही मुद्रांक शुल्क (Stamp Duty) थकलेली नाही, असे नरेंद्र मेहता म्हणाले.

सातत्याने खोट्या तक्रारी करतात

आमच्याकडे ४-५ लोक असे आहेत जे निव्वळ ब्लॅकमेलर आणि चीटर आहेत. त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असून ते केवळ तक्रारी करण्याचे काम करतात. हे पेड वर्कर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे सातत्याने खोट्या तक्रारी करत असतात, मात्र त्यात कोणतेही तथ्य नसते,” असा गंभीर आरोपही मेहता यांनी केला.

मिरा भाईंदरमध्ये काँग्रेसचे अस्तित्व आम्ही संपवले आहे, याचाच राग मनात धरून स्थानिक नेते नाना पटोलेंना चुकीची माहिती पुरवत आहेत. ५-६ महिने जुन्या पत्राचा आधार घेऊन केवळ राजकीय द्वेषापोटी हे आरोप केले जात असल्याचे नरेंद्र मेहता यांनी म्हटले. दरम्यान, रुग्णालयात उंदीर चावल्याने झालेल्या मृत्यूच्या घटनेवर मेहता यांनी तीव्र संताप व्यक्त केला. ही अत्यंत गंभीर बाब असून संबंधित डॉक्टरांवर कडक कारवाई व्हायला हवी, अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप नेते नरेंद्र मेहता यांच्यावर भूमाफिया असल्याचा शिक्का मारत गंभीर आरोप केले होते. नरेंद्र मेहता यांनी मुद्रांक शुल्क घोटाळा केल्याचा दावा पटोले यांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी मंत्र्यांना पत्र लिहून केली होती. त्यावर आता नरेंद्र मेहतांनी स्पष्टीकरण दिले आहे.

Follow Us
सरकारी पत्रात भाजप आमदारच ‘भूमाफिया’, मोठी खळबळ
सरकारी पत्रात भाजप आमदारच ‘भूमाफिया’, मोठी खळबळ.
पुण्यात जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धाब्यावर...रस्त्यावरच घरगुती गॅसचे वाटप
पुण्यात जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धाब्यावर...रस्त्यावरच घरगुती गॅसचे वाटप.
ऑपरेशन सक्सेस फुल आणि पेशंट..., एलपीजी तुटवड्यावरून राऊतांची....
ऑपरेशन सक्सेस फुल आणि पेशंट..., एलपीजी तुटवड्यावरून राऊतांची.....
गॅस मुद्द्यावरून राजकारण तापलं; ठाकरे-सुळे यांचा सरकारवर हल्लाबोल
गॅस मुद्द्यावरून राजकारण तापलं; ठाकरे-सुळे यांचा सरकारवर हल्लाबोल.
एकनाथ शिंदे दिल्लीला का गेले? संजय राऊत यांचं एका वाक्यात उत्तर....
एकनाथ शिंदे दिल्लीला का गेले? संजय राऊत यांचं एका वाक्यात उत्तर.....
राज्यात गॅस मुबलक असल्याचा सरकारचा दावा, तरीही मंत्री भुजबळ यांच्या...
राज्यात गॅस मुबलक असल्याचा सरकारचा दावा, तरीही मंत्री भुजबळ यांच्या....
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर.
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले.
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले.
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची..
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची...