AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?; अजित पवारांनी महाराष्ट्राचा राजकीय इतिहास सांगितला

Ajit Pawar on Maharashtra Vidhansabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका मांडली. आगामी निवडणुकीत स्वबळावर लढणार की महायुतीत? यावर अजित पवारांनी भाष्य केलं आहे. वाचा सविस्तर बातमी...

राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?; अजित पवारांनी महाराष्ट्राचा राजकीय इतिहास सांगितला
अजित पवार, उपमुख्यमंत्रीImage Credit source: Facebook
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Aug 11, 2024 | 2:33 PM
Share

विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. असं असताना राज्यातील राजकीय समिकरणांकडे सर्वांचंच लक्ष आहे. अजित पवारांच्या भूमिकेकडे राज्याचं लक्ष आहे. अशातच अजित पवारांनी ‘जन सन्मान यात्रा’ काढली आहे. या यात्रेअंतर्गत ते विविध ठिकाणांना भेटी देत आहेत. ही यात्रा म्हणजे अजित पवारांची स्वबळाची तयारी असल्याचं बोललं जात आहे. याच पार्श्वभूमीवर आज नाशिकमध्ये अजित पवारांशी टीव्ही 9 मराठीने संवाद साधला. तेव्हा आगामी विधानसभा निवडणूक, आघाडी- युती, मराठा आरक्षण या मुद्द्यांवर त्यांनी स्पष्ट मतं मांडली. राष्ट्रवादी विधानसभेला स्वबळावर लढणार का? यावरही अजित पवार बोलते झालेत.

स्वबळावर लढणार?

आजतरी राज्यात अशी स्थिती नाही की कोणत्याही एका पक्षाचं सरकार येईल… आधी राष्ट्रवादी आणि काँग्रेस, शिवसेना आणि भाजप अशा दोन- दोन पक्षांची आघाडी होती. 40 वर्षे महाराष्ट्रात कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळालेलं नाही. ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू, जयललिता, स्टॅलिन, करूणानिधी, अरविंद केजरीवाल या नेत्यांनी स्वबळावर सरकार आणलं तसं महाराष्ट्रात झालेलं नाही. मागच्या कित्येक वर्षात हा एक व्यक्ती आमचा नेता, त्याच्या पाठिशी आम्ही आहोत, असं म्हणत सरकार आलं असं झालेलं नाही. आताच्याही निवडणुकीत सगळ्यांनाच तीन- तीन मित्र पक्षांना घेऊन निवडणूक लढवावी लागतं, ही महाराष्ट्राची ओळख आहे, असं अजित पवार म्हणाले.

‘जन सन्मान यात्रा’ कशासाठी?

अजित पवार सध्या गुलाबी रंगाचं जॅकेट परिधान करतात. ‘जन सन्मान यात्रे’ ची थीमदेखील गुलाबी आहे. या मागचं कारण काय? असा प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला. तेव्हा अर्थसंकल्प सादर केला. यात लोकांच्या हिताचे निर्णय सरकारने घेतले. लाडकी बहीण योजना आणि वीजमाफीची योजना या योजना लोकांमध्ये लोकप्रिय झाल्या. त्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. त्यासाठी ही ‘जन सन्मान यात्रा’ आहे, असं अजित पवारांनी सांगितलं.

युगेंद्र पवार यांनी बारामतीतून शरद पवार गटाकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. यावर लोकशाहीमध्ये प्रत्येकाला उभं राहण्याचा, निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. ज्यांना लढायचं ते लढू शकतात, असं अजित पवार म्हणाले.

Follow Us
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त...
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी.....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी......
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद.
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह...
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की.....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की......
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,.
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू.
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश...
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश....
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर...
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर....
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री...
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री....