AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?; अजित पवारांनी महाराष्ट्राचा राजकीय इतिहास सांगितला

Ajit Pawar on Maharashtra Vidhansabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका मांडली. आगामी निवडणुकीत स्वबळावर लढणार की महायुतीत? यावर अजित पवारांनी भाष्य केलं आहे. वाचा सविस्तर बातमी...

राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?; अजित पवारांनी महाराष्ट्राचा राजकीय इतिहास सांगितला
अजित पवार, उपमुख्यमंत्रीImage Credit source: Facebook
| Updated on: Aug 11, 2024 | 2:33 PM
Share

विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. असं असताना राज्यातील राजकीय समिकरणांकडे सर्वांचंच लक्ष आहे. अजित पवारांच्या भूमिकेकडे राज्याचं लक्ष आहे. अशातच अजित पवारांनी ‘जन सन्मान यात्रा’ काढली आहे. या यात्रेअंतर्गत ते विविध ठिकाणांना भेटी देत आहेत. ही यात्रा म्हणजे अजित पवारांची स्वबळाची तयारी असल्याचं बोललं जात आहे. याच पार्श्वभूमीवर आज नाशिकमध्ये अजित पवारांशी टीव्ही 9 मराठीने संवाद साधला. तेव्हा आगामी विधानसभा निवडणूक, आघाडी- युती, मराठा आरक्षण या मुद्द्यांवर त्यांनी स्पष्ट मतं मांडली. राष्ट्रवादी विधानसभेला स्वबळावर लढणार का? यावरही अजित पवार बोलते झालेत.

स्वबळावर लढणार?

आजतरी राज्यात अशी स्थिती नाही की कोणत्याही एका पक्षाचं सरकार येईल… आधी राष्ट्रवादी आणि काँग्रेस, शिवसेना आणि भाजप अशा दोन- दोन पक्षांची आघाडी होती. 40 वर्षे महाराष्ट्रात कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळालेलं नाही. ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू, जयललिता, स्टॅलिन, करूणानिधी, अरविंद केजरीवाल या नेत्यांनी स्वबळावर सरकार आणलं तसं महाराष्ट्रात झालेलं नाही. मागच्या कित्येक वर्षात हा एक व्यक्ती आमचा नेता, त्याच्या पाठिशी आम्ही आहोत, असं म्हणत सरकार आलं असं झालेलं नाही. आताच्याही निवडणुकीत सगळ्यांनाच तीन- तीन मित्र पक्षांना घेऊन निवडणूक लढवावी लागतं, ही महाराष्ट्राची ओळख आहे, असं अजित पवार म्हणाले.

‘जन सन्मान यात्रा’ कशासाठी?

अजित पवार सध्या गुलाबी रंगाचं जॅकेट परिधान करतात. ‘जन सन्मान यात्रे’ ची थीमदेखील गुलाबी आहे. या मागचं कारण काय? असा प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला. तेव्हा अर्थसंकल्प सादर केला. यात लोकांच्या हिताचे निर्णय सरकारने घेतले. लाडकी बहीण योजना आणि वीजमाफीची योजना या योजना लोकांमध्ये लोकप्रिय झाल्या. त्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. त्यासाठी ही ‘जन सन्मान यात्रा’ आहे, असं अजित पवारांनी सांगितलं.

युगेंद्र पवार यांनी बारामतीतून शरद पवार गटाकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. यावर लोकशाहीमध्ये प्रत्येकाला उभं राहण्याचा, निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. ज्यांना लढायचं ते लढू शकतात, असं अजित पवार म्हणाले.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.