AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाकडून 18 पिंजरे, सर्च ऑपरेशन सुरू; नरभक्षक बिबट्याला मारणार?

नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बिबट्याने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. त्याला जेरबंद करण्यासाठी 18 पिंजरे लावण्यात आले असून शर्तीचे प्रयत्न केले जात आहे.

बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाकडून 18 पिंजरे, सर्च ऑपरेशन सुरू; नरभक्षक बिबट्याला मारणार?
Image Credit source: TV9 Network
Kiran Balasaheb Tajne
Kiran Balasaheb Tajne | Updated on: Apr 15, 2023 | 11:54 AM
Share

नाशिक : नाशिकच्या ग्रामीण भागात बिबट्याचा मोठ्या प्रमाणात वावर वाढला आहे. त्यामध्ये नाशिकची ओळख ही लेपर्ड सिटी म्हणून होऊ लागली आहे. अशातच नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ब्राह्मणवाडे येथे एका बिबट्याने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. तब्बल 18 पिंजरे लावून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी तळ ठोकून बसले आहे. अद्यावयत यंत्रणेच्या माध्यमातून बिबट्या कसा जेरबंद करता येईल यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहे. त्यामध्ये हा बिबट्या नरभक्षक असल्याचा मोठा संशय वनविभागाला आला आहे. त्यामुळे पिंजरे लावून बिबट्या जेरबंद झाला नाहीतर बेशुद्ध करून त्याला पकडण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.

याच बिबट्याने त्र्यंबकेश्वरच्या परिसरात दोन लहान मुलांवर हल्ला केला होता. दोन्ही घटना काही अंतरावर घडल्या आहे. एका चार वर्षाच्या मुलीला ओट्यावर जेवण करत असताना बिबट्याने हल्ला करून फस्त केले होते. त्यात मुलीचा मृत्यू झाला होता.

तर दुसरीकडे आई अंगणात बसून मुलीला दूध पाजत असतांना आईच्या मांडीवरुन बिबट्याने झडप घालून ओढून नेले होते. त्यात कमरे खालील भाग पूर्ण खाऊन घेतल्याने मुलीचा मृत्यू झाला होता. त्यामुळे परिसरात बिबट्याच्या हल्ल्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.

खरंतर हा संपूर्ण परिसर आदिवासी परिसर आहे. यामध्ये शेती आणि शेतमंजूरी करणारे लोक आहेत. त्यात वारंवार बिबट्या दिसून येत असतांना वनविभागाने पिंजरा लावून त्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात असतांना वन विभागाने दुर्लक्ष केल्याने या घटना घडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला होता.

गेल्या काही दिवसापूर्वी या परिसरात बिबट्याचा हल्ल्यात 2 लहान मुलांचे मृत्यू झाल्याने वन विभागावर जोरदार टीका करण्यात आली होती. त्याच पार्श्वभूमीवर ब्राह्मणवाडे परिसरात वन विभागाकडून तब्बल 18 पिंजरे लावण्यात आले आहे.

वनविभाग कडून बिबट्याला पकडण्यासाठी जोरदार सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. दिवसा आणि रात्री वनविभागाचे अनेक कर्मचारी आणि काही अधिकारी घटनास्थळी तळ ठोकून आहे. 18 पिंजरे, अत्याधुनिक गन, कॅमेरे आणि इतर साहित्यासह कर्मचाऱ्यांकडून सर्च ऑपरेशन सुरू केले आहे.

नरभक्षक झालेल्या बिबट्याला मारण्याची वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे परवानगी मागितल्याची सूत्रांची माहिती आहे. अनेक दिवस उलटून गेले बिबट्या हाती लागत नसल्याने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांचं टेंशन वाढलं आहे. त्यामुळे वनविभागाच्या प्रयत्नांना यश येते का बिबट्याला ठार केले जाते हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

Follow Us
रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? महाजनांचा मोठा काय?
Girish Mahajan | रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? गिरीश महाजनांचा मोठा दावा काय?
गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक.....
Gondia Rain | गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक शेतकरी चिंतेत
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
Mumbai | नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! 13 एप्रिलला अटक, आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
Thane Assault Case | ठाण्यातील वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर
Buldhana | लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर; कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी जप्त
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून मोठी भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार, नवे नियम लागू
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड