AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वेठबिगारी कधी रोखणार ? ती बालिका दररोज म्हणायची मला घरी नेवून सोडा, तरीही…

संबंधित बालिका ही नुकतीच पाहिलीला शाळेत जात होती. संशयित ढेपले नामक मेंढपाळ तिथे आला आणि त्याने मुलीला काम देतो म्हणत थेट मुलीचा सौदाच केला.

वेठबिगारी कधी रोखणार ? ती बालिका दररोज म्हणायची मला घरी नेवून सोडा, तरीही...
Image Credit source: FACEBOOK
| Updated on: Oct 02, 2022 | 5:17 PM
Share

नाशिक : सहा वर्षाच्या मुलीला (child) सहा हजार रुपयांमध्ये विकत घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून तब्बल पाच वर्षांनी त्या मुलीची सुटका करण्यात आली आहे. याबाबत नाशिक (Nashik) जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. त्र्यंबकेश्वर पोलिसांत वेठबिगार उच्चाटन कायद्याबरोबरच बालन्याय हक्क कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही महिन्यांपूर्वी अशीच एक घटना इगतपुरी तालुक्यात घडली होती. त्यामुळे संपूर्ण राज्यात या वेठबिगारीच्याबाबत संताप व्यक्त केला जात होता. त्यावरून कठोर कारवाईची मागणी देखील करण्यात आली होती. त्यावरून आदिवासी विकास मंत्र्यांनी याबाबत दखल घेतली होती.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शिरसगाव येथे राहणारे आई-वडील आणि त्यांची पाच मुलं राहत होती. त्यात एका बालिकेचा समावेश होता.

संबंधित बालिका ही नुकतीच पाहिलीला शाळेत जात होती. संशयित ढेपले नामक मेंढपाळ तिथे आला आणि त्याने मुलीला काम देतो म्हणत थेट मुलीचा सौदाच केला.

आई-वडिलांच्या अशिक्षित असल्याचा ढेपले याने फायदा घेत सहा हजार रुपयांना सहा वर्षीच्या मुलीचा काम देतो या नावाखाली घेऊन गेला.

मुलीला मेंढया वळण्याचे काम देतो म्हणून घेऊन गेलेला ढेपले आणि त्याचे कुटुंब मुलीला हीन वागणूक देत होते.

सहा हजार रुपये रोख देऊन आणलेल्या मुलीला दररोज सकाळी चहा दिल्यानंतर मेंढया बसलेला शेतातील वाडा झाडण्याचे काम करावे लागत होते.

वाडा झाडून झाल्यावर जेवण दिले जायचे त्यांनंतर दिवसभर मेंढया चारण्यासाठी काम तब्बल पाच वर्षे करावे लागले आहे.

दररोज ती ढेपले आणि त्यांच्या कुटुंबाकडे मला माझ्या घरी नेवून सोडा असे म्हणायची तरीही ढेपले ही तिच्याकडून कामे करूनच घेत राहिले.

याच काळात श्रमजीवी संघटनेने बाल वेठबिगारीची काही प्रकरणे उघडकीस आणली होती. हीच बाब ढेपले यांच्या निदर्शनास आली होती आणि त्याचीच धास्ती ढेपले यांनी घेतली.

मुलीला तब्बल पाच वर्षांनी तिच्या आई आणि वडीलांकडे शिरसगाव येथे सोडले आहे. त्यांनंतर मुलीने आपल्याबरोबर घडलेली सर्व हकिगत सांगितली.

श्रमजीवी संघटनेच्या पदाढीकऱ्यांनी पुढाकार घेऊन त्र्यंबकचे तहसीलदार असलेले दीपक गिरासे यांच्याकडे याबाबत सर्व माहिती दिली.

त्यानंतर मुलीने स्वत:ही सर्व प्रकार सांगितला आणि त्यानंतर त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.