AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik | स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू असताना देखील ग्रामीण भागातील नागरिक अद्याप मूलभूत सुविधांपासून वंचितच…

नाशिकच्या आदिवासी भागामध्ये सोईसुविधा अजिबात नाहीयंत. तेथे रस्ते तर सोडाच पण पूल नसल्याने नागरिकांना अत्यंत धोकादायक पध्दतीने दररोजच नदीच्या पाण्यातून प्रवास करावा लागतो. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तर नदीला पूर आल्यावर आपला जीव धोक्यात घालून ग्रामस्थांना ये जा करावी लागते.

Nashik | स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू असताना देखील ग्रामीण भागातील नागरिक अद्याप मूलभूत सुविधांपासून वंचितच...
| Edited By: | Updated on: Aug 13, 2022 | 11:32 AM
Share

नाशिक : संपूर्ण देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जातोयं. मात्र, आजही नाशिकच्या (Nashik) आदिवासी भागामध्ये मुलभूत सुविधा नागरिकांपर्यंत पोहचलेल्या नाहीयंत, ही वस्तुस्थिती आहे. नाशिकच्या आदिवासी भागामध्ये एक विधारक चित्र आहे, ज्याची कल्पना आपण कोणीही नक्कीच केली नसणार. आजही आदिवासी भागांमध्ये रस्ते, नाले आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था (Arrangement) नाहीयं. इतकेच नाही तर नाशिकच्या आदिवासी भागांमध्ये शाळा नसल्याने अनेक मुले ही शिक्षणापासून वंचित आहेत. पूल नसल्याने नागरिकांना आपला जीव धोक्यात घालून नदींमधूनच (River) प्रवास करावा लागतोयं.

पूल नसल्याने नदीपात्रातून करावा लागतो धोकादायक पध्दतीने प्रवास

नाशिकच्या आदिवासी भागामध्ये सोईसुविधा अजिबात नाहीयंत. तेथे रस्ते तर सोडाच पण पूल नसल्याने नागरिकांना अत्यंत धोकादायक पध्दतीने दररोजच नदीच्या पाण्यातून प्रवास करावा लागतो. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तर नदीला पूर आल्यावर आपला जीव धोक्यात घालून ग्रामस्थांना ये जा करावी लागते. यामध्ये लहान मुले ते वयस्कर सर्वांनाच धोकादायक पध्दतीने प्रवास करावा लागतोयं.

शासन आणि प्रशासनाचे ग्रामस्थांच्या मागणीकडे दुर्लक्ष

पेठ सुरगाणा कहाडोळंपाडा येथील नागरिकांचा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव तरी परवड सुरूच आहे. पार नदीवर पुल बांधण्याची गेल्या अनेक दिवसांपासून नागरिक सातत्याने मागणी करत आहेत. मात्र, नागरिकांच्या या मागणीकडे शासन आणि प्रशासन सर्रासपणे दुर्लक्ष करताना दिसते आहे. नाशिकच्या अनेक ग्रामीन भागामध्ये रस्ते नसल्याने नागरिकांना एखाद्या व्यक्तीला अर्जंटमध्ये दवाखान्यात न्यायचे असेल तर कपड्यांची झोळी करून घेऊन जावे लागते.

Follow Us
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दरवाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दरवाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.
शहरातही आता चुलींना मागणी वाढली, गॅस सिलिंडर टंचाईवर शोधला उपाय
शहरातही आता चुलींना मागणी वाढली, गॅस सिलिंडर टंचाईवर शोधला उपाय.
खरातवर आणखी दोन गुन्हे दाखल, एकूण गुन्ह्यांची संख्या १०, हवाला रॅकेट..
खरातवर आणखी दोन गुन्हे दाखल, एकूण गुन्ह्यांची संख्या १०, हवाला रॅकेट...