AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India’s Titanic tragedy : 700 जणांसह जलसमाधी घेतलेल्या ‘रामदास’ बोट दुर्घटनेची 75 वर्ष..

येत्या 15 ऑगस्ट रोजी भारताच्या स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण होत आहे. देशभरात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत आहे. मात्र 75 वर्षांपूर्वीच घडलेल्या एका दुर्दैवी घटनेत 700 प्रवाशांना प्राण गमवावे लागले होते.

India’s Titanic tragedy : 700 जणांसह जलसमाधी घेतलेल्या 'रामदास' बोट दुर्घटनेची 75 वर्ष..
| Edited By: | Updated on: Aug 13, 2022 | 10:43 AM
Share

येत्या 15 ऑगस्ट रोजी भारताच्या स्वातंत्र्याची 75 वर्ष (75th Independence Day) पूर्ण होत आहे. देशभरात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत आहे. मात्र 75 वर्षांपूर्वीच घडलेल्या एका दुर्दैवी घटनेत 700 प्रवाशांना प्राण गमवावे लागले होते. 17 जुलै 1947 साली भाऊच्या धक्क्यावरून अलिबागमधील रेवसकडे निघालेल्या एस.एस. रामदास (Ramdas ship) या बोटीला जलसमाधी मिळाली होती. त्यामध्ये 700 प्रवाशांचाही (700 passengers killed) दुर्दैवी मृत्यू झाला होता. ‘टायटॅनिक’ बोट बुडाल्याची जगप्रसिद्ध घटना सर्वांनाच माहीत असेल, त्यावर काढण्यात आलेला चित्रपटही अनेकांनी पाहिला असेल. मात्र आपल्याच देशात घडलेली ‘रामदास’ बोटीच्या दुर्घटनेलाही 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. मात्र बऱ्याच जणांना तर हे माहीतही नाही. तर अनेकांच्या स्मृतीपटलावरून ही घटना आता पुसली गेली असेल.

रामदास बोट ही स्कॉडलंडमध्ये 1936 साली बांधण्यात आली

1947 रोजी बुडालेली रामदास बोट ही स्कॉडलंडमध्ये 1936 साली बांधण्यात आली होती. 406 टन वजनाच्या या देखण्या बोटीची 1000 प्रवासी वाहून नेण्याची क्षमता होती. 17 जुलै 1947 साली ही बोट मुंबईतील भाऊच्या धक्क्याहून रेवसला जाण्यासाठी निघाली होती. मात्र मुंबईपासून अवघ्या काही मैलांच्या अंतरावर करंजा- काशाजवळ बुडाली. ही बोट निघण्याच्या आदल्या दिवशी मुंबईत तूफान पाऊस झाला होता. मात्र बोटीचा प्रवास सुरू झाला, तेव्हा आभाळ अगदी स्वच्छ, निरभ्र होतं. श्रावण महिन्याला लवकरच सुरूवात होणार होती, त्यामुळे अनेकांची ‘गटारी’साठी घरी पोहोचण्याची लगबग सुरू होती. या दुर्घटनेच्या दिवशी या बोटीवर 800 हून अधिक प्रवासी होते. मात्र त्यापैकी जेमतेम 100 लोकांचा जीव वाचला, त्यामध्ये बोटीचा कप्तान आणि काही प्रवाशांचा समावेश होता.

मुंबईहून निघाल्यापासून अवघ्या तासाभरात बोट बुडाली

‘रामदास’ बोट मुंबईहून निघाली तेव्हा वातावरण निरभ्र होते, अनेक जण एकमेकांशी गप्पाही मारत होते. थोड्याच वेळात ते आपल्या इच्छित स्थळी उतरून घराच्या दिशेने वाटचाल सुरू करणार होते. मात्र मुंबईपासून अवघ्या काही मैलांवर बोट पोहोचली असता सोसाट्याचा वारा सुटला आणि प्रचंड लाटा उसळू लागल्या. लाटांच्या प्रचंड तडाख्यामुळे बोट हेलकावे खाऊ लागली. प्रवाशांमध्ये एकच घबराट पसरली आणि एकच गोंधळ माजला. मुंबईहून निघाल्यापासून अवघ्या तासाभरात ही बोट बुडाली आणि शेकडो प्रवाशांना जलसमाधी मिळाली.

आणि एकच हाहा:कार उडाला…

साधारणत: दीड तासात रेवासला पोचणारी बोट बराच वेळ उलटून गेल्यानंतरही बंदरात न पोचल्याने कंपनीचे अधिकारीही काळजीत पडले. मात्र त्यावेळी बोटीवर काही संपर्काचे काही साधनही उपलब्ध नसल्याने काहीच माहिती मिळत नव्हती. बऱ्याच तासांनतर गेट वे ऑफ इंडियाजवळ गस्त घालणाऱ्या एका नौकेला बारकू मुकादम हा अवघ्या 12 वर्षांचा एक मुलगा पोहोताना आढळला. त्याची सुटका करण्यात आल्यानंतर, त्याच्या तोंडून ‘रामदास’ बोट बुडाल्याची दुर्दैवी घटना सर्वांना समजली आणि एकच हाहा:कार उडाला. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. बोटीवरील अवघ्या 100 लोकांना जीव वाचवण्यात यश मिळाले होते. त्यामध्ये बोटीचा कप्तान, काही सहाय्यक आणि प्रवाशांचा समावेश होता. त्यापैकी एक व्यक्ती ज्यू होती, तर काही ब्रिटीश नागरिकांचाही समावेश होता. उरलेले सुमार 700 प्रवासी समुद्रतळाशी पोचले होते. त्यापैकी बरेच जण मुंबईतील गिरगाव, लालबाग येथील रहिवासी, मध्यवर्गीय नागरिक होते.

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.