
इगतपुरी तालुक्यासर परिसरात जोरदार अवकाळी पाऊस झाला, पावसाबरोबरच वादळीवाऱ्यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. तर प्रचंड पाऊस लागल्याने आता शेती शिवारात पाणी साठून राहिल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.

इगतपुरी तालुक्यासह परिसरात जोरदार अवकाळी पाऊस झाला तर अवकाळी पावसाबरोबरच गारांचाही मारा झाल्याने शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

शेतातील उभी पीकं वादळी वाऱ्यामुळे आणि अवकाळी पावसामुळे भूईसपाट झाल्यामुळे शेतकऱ्यांची पिकावर पाणी सोडण्याची वेळ आली आहे. गहू पीक कापणीला आला असताना भूईसपाट झाल्याने त्यातील पीक आता शेतकऱ्यांच्या हातात किती मिळणार असा सवाल केला जात आहे.

ज्या प्रमाणे गव्हाचे प्रचंड नुकसान झाले आहे, त्याच प्रमाणे हाता तोंडाशी आलेले हरभरा पीकही अवकाळी पावसाने मातीमोल केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता जगायचे कसे असा सवाल आता उपस्थित करत आहेत.

इगतपुरी तालुक्यात रब्बी हंगाम आता वाया गेल्यासारखीच परिस्थिती आहे. गहू, हरभरा, मूग, कांदा या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ऐन हंगामात हाता तोंडाशी आलेला गव्हचे पीकही आता भूईसपाट झाल्याने शेतकऱ्यांनी आता काय करायचे असा सवाल आता बळीराजा विचारत आहे.

एकीकडे शेतीपिकाला बाजारभाव नाही, तर दुसरीकडे निसर्गाच्या कोप थांबता थांबत नाही अशी परिस्थिती असताना इगतपुरी तालुक्यात मात्र अवकाळी पावसाबरोबरच वादळ वाऱ्यामुळे द्राक्ष बागा भूईसपाट झाल्या आहेत. त्यामुळे आता शेती नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होऊ लागली आहे.

इगतपुरी तालुक्यात अवकाळी पावसाबरोबरच जोरदार वादळ झाल्यामुळे द्राक्ष बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यातील अनेक द्राक्षबाग जमिनदोस्त झाल्यामुळे ऐन हंगामात शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे.