AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“भर अंधारातदेखील मोर्चा सुरू”;किसान सभेला अजूनही मुख्यमंत्र्यांच्या बैठकीचे निमंत्रण नाही…

किसान सभेने आता थेट इशारा दिला आहे. त्यामुळे किसान सभेने आता कितीही अंधार झाला, पाऊस आला तरी मोर्चा सुरूच राहणार असल्याचा निर्धार करण्यात आला आहे.

भर अंधारातदेखील मोर्चा सुरू;किसान सभेला अजूनही मुख्यमंत्र्यांच्या बैठकीचे निमंत्रण नाही...
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Mar 14, 2023 | 8:44 PM
Share

इगतपुरी/नाशिक : कष्टकरी, शेतकरी आणि आदिवासी लोकांचा आपल्या विविध मागण्यांसाठी लाँग मार्च आज तिसऱ्या दिवशीही सुरुच आहे.सध्या इगतपुरी येथील खंबाळे या गावामध्ये लाँग मार्च आला असून सरकारकडूनही अजून कोणताचा निर्णय आला नसल्याने किसान सभेने आता आम्ही आमच्या मोर्चावर ठाम असल्याचे सांगत कष्टकरी, शेतकरी आणि आदिवासी बांधवांच्या मागण्या मान्य झाल्यापासून आम्ही मागे हटणार नाही असा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे किसान सभेचं लाल वादळ मुंबईत आल्यानंतर सरकारकडून नेमकं आंदोलनकर्त्यांना कोण भेटणार असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

किसान सभेच्या लाल वादळ नाशिकच्या दिंडोरी या ठिकाणाहून मुंबईकडे रवाना झाले होते. या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने आदिवासी कष्टकरी शेतकरी सहभागी झाले आहेत.

शेतीमालाला हमीभाव देण्याच्या मागणीसह अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या, वन जमिनी नावावर करा अशा प्रकारच्या मागण्यांसाठी हा लाँग मार्च काढण्यात आला आहे.

या लाँग मार्चवेळी दिंडोरीजवळ आंदोलन काही प्रमाणात आक्रमक झाले होते. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर कांदा फेकून कांद्याला भाव मिळत नसल्याच्या कारणावरून सरकारचा निषेध व्यक्त केला होता.

नाशिकहून निघालेल्या किसान सभेच्या लाल वादळ मुंबईत येऊन धडकणार असले तरी सरकारकडून अजूनही कोणताही निर्णय कळवण्यात आला नाही.

त्यामुळे किसान सभेने आता थेट इशारा दिला आहे. त्यामुळे किसान सभेने आता कितीही अंधार झाला, पाऊस आला तरी मोर्चा सुरूच राहणार असल्याचा निर्धार करण्यात आला आहे.

लाल वादळ मुंबईत धडकणार असून उद्याच्या मुख्यमंत्री यांच्यासोबतच्या बैठकीचे अद्याप अधिकृत कोणतेही निमंत्रण आले नसल्याचेही डॉ. डी. एल. कराड यांनी सांगितले आहे. सरकारकडून कोणतेही निमंत्रण आले नाही.

Follow Us
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान