AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विदर्भातील शेतकऱ्यांवर संकट; हवामान खात्याच्या इशाऱ्याने बळीराजा धास्तावला…

पुढील दिवसात ढगाळ वातावरण राहून तापमानात घट होणार आहे तर काही ठिकाणी गारपीटसुद्धा होणार आहे. त्यामुळे गारपीट आणि वादळी वारा होण्याची शक्यता आहे.

विदर्भातील शेतकऱ्यांवर संकट; हवामान खात्याच्या इशाऱ्याने बळीराजा धास्तावला...
| Edited By: | Updated on: Mar 14, 2023 | 7:45 PM
Share

नागपूर : मागील आठवड्यात विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले होते. गहू, मका, कापूस, हरभरा आणि भाजीपाला पिकांचे या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना जोरदार दणका दिल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपल्या पिकांवर नांगर फिरवला होता. एकीकडे हे चालू असतानाच आता हवामान खात्याने मात्र आता पुन्हा एकदा गारपीठ होण्याची शक्यता वर्तवल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

आता या काळात गारपीठ झालीच तर मात्र शेतकऱ्यांच्या पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे आधीच तोट्यात असलेल्या बळीराजाला गारपीठ झालीच तर मात्र आता जगणार कसा हा प्रश्न उभा राहणार आहे.

नागपूरसह संपूर्ण विदर्भात येणाऱ्या 4 ते 5 दिवस पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर 16 आणि 17 मार्च रोजी ऑरेंज अलर्टही देण्यात आला आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे. पुढील दोन दिवसात वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता असल्याने राज्याच्या इतर भागातसुद्धा पावसाची शक्यता नागपूर हवामान विभागाकडून वर्तवली जात आहे.

येणाऱ्या पुढील दिवसात ढगाळ वातावरण राहून तापमानात घट होणार आहे तर काही ठिकाणी गारपीटसुद्धा होणार आहे. त्यामुळे गारपीट आणि वादळी वारा होण्याची शक्यता असल्याने हवामान खात्याकडून शेतकऱ्यांना सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

आज पासून पावसाला काही भागात सुरवात होऊन त्यामध्ये वाढ होणार असल्याचेही सांगितले आहे. तर 16 आणि 17 मार्च रोजी वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याचा अंदाज नागपूर हवामान विभागाचे शास्त्रज्ञ एम. एम साहू यांनी वर्तविला असल्याने शेतकऱ्यांनाही सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.