AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“लाल वादळ मुंबईच्या दिशेने…”; शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शेतकरी विधानभवनावर धडकणार

नाशिक ते मुंबई पायी लाँगमार्च काढण्यात आला असून कष्टकरी, कर्मचारी, आदिवासी बांधवांकडून सरकारवर आता मोठा दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न कष्टकरी वर्गाने केला आहे.

लाल वादळ मुंबईच्या दिशेने...; शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शेतकरी विधानभवनावर धडकणार
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Mar 13, 2023 | 5:38 PM
Share

नाशिक : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना नाशिकचे पालकमंत्री म्हणून गिरीश महाजन यांनी काम पाहिले होते. त्यावेळीही अशाच प्रकारचा लाँग मार्च निघाला होता. त्यावेळी गिरीश महाजन यांनी मध्यस्थी करून त्यावेळी आंदोलन मिठवण्यात आले होते. तर आता मात्र नाशिकमधून निघालेले लाल वादळ विधानभवनावर धडकणारच असल्याचा ठाम निर्धार किसान सभेने केला आहे. त्यामुळे उद्या लाल वादळ विधानभवनावर आल्यानंतर आता सरकारतर्फे आंदोलनकर्त्यांशी बोलणार कोण असा सवाल आता निर्माण झाला आहे. त्यामुळे आता सरकारसमोर आता नवीन पेच निर्माण झाला आहे.

किसान सभेचा निघालेला लाँग मार्च आता मुंबईत धडकण्याआधी नाशिकच्या पुढे आला आहे. हा लाँग मार्च निघत असला तरी, रस्त्यावर शेतमाल फेकत आणि सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत लाल वादळ आता मुंबईकडे येत आहे. किसान सभेच्या या लाँग मार्चमध्ये आता सरकारच्या अनेक धोरणांचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

या मोर्चामध्ये शेतकरी, आदिवासी, कर्मचाऱ्यांनीही सहभाग नोंदवल्यामुळे या लाँग मार्चला आता सरकार कसं तोंड देणार ते आता उद्याच कळणार आहे.

किसान सभेचे अजित नवले , जे. पी. गावित यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढला गेला असून यामध्ये आता कष्टकरी, आदिवासी आणि कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. त्यामुळे या वर्गाच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही आता मागे हटणार नाही असंही आता स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.

नाशिक ते मुंबई पायी लाँगमार्च काढण्यात आला असून कष्टकरी, कर्मचारी, आदिवासी बांधवांकडून सरकारवर आता मोठा दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न कष्टकरी वर्गाने केला आहे.

पालकमंत्री दादा भुसे यांनी रविवारी किसान सभेबरोबर संवाद साधून आंदोलन मिठवण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला यश आले नाही. त्यामुळे आता उद्या मुंबईत लाल वादळ धडकल्यानंतर सरकारतर्फे किसान सभेबरोबर संवाद कोण साधणार असा सवाल आता केला जात आहे.

Follow Us
झारखंडमध्ये विद्यार्थी आंदोलन पेटलं, पोलिसांकडून पाण्याचा मारा
झारखंडमध्ये विद्यार्थी आंदोलन पेटलं, पोलिसांकडून पाण्याचा मारा, चपला-बूट...नेमकं काय घडतंय?
मोठी बातमी! फुटीर खासदारांमध्ये चलबिचल सुरु; ठाकरे गटाच्या नोटीसनंतर..
मोठी बातमी! फुटीर खासदारांमध्ये चलबिचल सुरु; ठाकरे गटाच्या नोटीसनंतर थेट...
NEET पेपरफुटीवर सरकारची कोंडी? अमित शाह देणार उत्तर!
NEET पेपरफुटीवर सरकारची कोंडी? विद्यार्थी आंदोलनावर चर्चा, अमित शाह देणार उत्तर!
मराठी सक्तीबाबत प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा! 105 दिवसांचा कालावधी...
Pratap Sarnaik | मराठी सक्तीबाबत प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा! 105 दिवसांचा कालावधी...
राज ठाकरेंचा अनिशा माजगावकरांना पुन्हा ग्रीन सिग्नल! मनसेत कमबॅक?
MNS | राज ठाकरेंचा अनिशा माजगावकरांना पुन्हा ग्रीन सिग्नल! मनसेत कमबॅक; भांडूपच्या राजकारणात नवं समीकरण?
पंतप्रधांसोबच्या भेटीतील खास किस्सा! अमोल कोल्हेंची पहिली प्रतिक्रिया
पंतप्रधांसोबच्या भेटीतील खास किस्सा! शरद पवारांबाबत काय म्हणाले नरेंद्र मोदी? अमोल कोल्हेंनी सगळंच सांगितलं
चाकरमान्यांसाठी सोमवार ठरला त्रासदायक! पश्चिमसह मध्य रेल्वेवर....
Mumbai Local News | चाकरमान्यांसाठी सोमवार ठरला त्रासदायक! पश्चिमसह मध्य रेल्वेवर तांत्रिक बिघाड; लोकल उशिराने
शेतकरी कर्जमाफीवर मोठी अपडेट! 1 लाख 40 हजार शेतकरी पात्र; वेळ लागेल...
शेतकरी कर्जमाफीवर मोठी अपडेट! 1 लाख 40 हजार शेतकरी पात्र; वेळ लागेल, पण... नेमकं काय म्हणाले बाबासाहेब पाटील?
मोठी खळबळ! ठाकरे गटाचा मोठा डाव; सहा फुटीर खासदारांच्या अडचणी पुन्हा..
मोठी खळबळ! ठाकरे गटाचा मोठा डाव; सहा फुटीर खासदारांच्या अडचणी पुन्हा वाढल्या?
राजकीय घडामोडींना वेग! सुप्रिया सुळेंची खासदारांसह पंतप्रधानांच्या भेट
राजकीय घडामोडींना वेग! सुप्रिया सुळे खासदारांसह पंतप्रधानांच्या भेटीसाठी दाखल; व्हिडीओ आला समोर