AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“लाल वादळ मुंबईच्या दिशेने…”; शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शेतकरी विधानभवनावर धडकणार

नाशिक ते मुंबई पायी लाँगमार्च काढण्यात आला असून कष्टकरी, कर्मचारी, आदिवासी बांधवांकडून सरकारवर आता मोठा दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न कष्टकरी वर्गाने केला आहे.

लाल वादळ मुंबईच्या दिशेने...; शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शेतकरी विधानभवनावर धडकणार
| Updated on: Mar 13, 2023 | 5:38 PM
Share

नाशिक : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना नाशिकचे पालकमंत्री म्हणून गिरीश महाजन यांनी काम पाहिले होते. त्यावेळीही अशाच प्रकारचा लाँग मार्च निघाला होता. त्यावेळी गिरीश महाजन यांनी मध्यस्थी करून त्यावेळी आंदोलन मिठवण्यात आले होते. तर आता मात्र नाशिकमधून निघालेले लाल वादळ विधानभवनावर धडकणारच असल्याचा ठाम निर्धार किसान सभेने केला आहे. त्यामुळे उद्या लाल वादळ विधानभवनावर आल्यानंतर आता सरकारतर्फे आंदोलनकर्त्यांशी बोलणार कोण असा सवाल आता निर्माण झाला आहे. त्यामुळे आता सरकारसमोर आता नवीन पेच निर्माण झाला आहे.

किसान सभेचा निघालेला लाँग मार्च आता मुंबईत धडकण्याआधी नाशिकच्या पुढे आला आहे. हा लाँग मार्च निघत असला तरी, रस्त्यावर शेतमाल फेकत आणि सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत लाल वादळ आता मुंबईकडे येत आहे. किसान सभेच्या या लाँग मार्चमध्ये आता सरकारच्या अनेक धोरणांचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

या मोर्चामध्ये शेतकरी, आदिवासी, कर्मचाऱ्यांनीही सहभाग नोंदवल्यामुळे या लाँग मार्चला आता सरकार कसं तोंड देणार ते आता उद्याच कळणार आहे.

किसान सभेचे अजित नवले , जे. पी. गावित यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढला गेला असून यामध्ये आता कष्टकरी, आदिवासी आणि कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. त्यामुळे या वर्गाच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही आता मागे हटणार नाही असंही आता स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.

नाशिक ते मुंबई पायी लाँगमार्च काढण्यात आला असून कष्टकरी, कर्मचारी, आदिवासी बांधवांकडून सरकारवर आता मोठा दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न कष्टकरी वर्गाने केला आहे.

पालकमंत्री दादा भुसे यांनी रविवारी किसान सभेबरोबर संवाद साधून आंदोलन मिठवण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला यश आले नाही. त्यामुळे आता उद्या मुंबईत लाल वादळ धडकल्यानंतर सरकारतर्फे किसान सभेबरोबर संवाद कोण साधणार असा सवाल आता केला जात आहे.

मी केवळ शब्दाचा पक्का नाही, तर कामाचा माणूस आहे
मी केवळ शब्दाचा पक्का नाही, तर कामाचा माणूस आहे.
दुबेंना मोदी-शाहांचा पाठिंबा होता का? वर्षा गायकवाड यांची टीका
दुबेंना मोदी-शाहांचा पाठिंबा होता का? वर्षा गायकवाड यांची टीका.
सभागृहात न बसणाऱ्या खासदारांची पंतप्रधान मोदींकडून कानउघडणी!
सभागृहात न बसणाऱ्या खासदारांची पंतप्रधान मोदींकडून कानउघडणी!.
मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी ठाकरेंची सेना उमेदवार देणार
मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी ठाकरेंची सेना उमेदवार देणार.
वाहतूक कोंडीला नेहरूच जबाबदार म्हणू नका; अंबादास दानवेंचा खोचक टोला
वाहतूक कोंडीला नेहरूच जबाबदार म्हणू नका; अंबादास दानवेंचा खोचक टोला.
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून राऊत यांचा खोचक टोला
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून राऊत यांचा खोचक टोला.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेनंतर 'विकासा'चा आणखी एक मार्ग झाला बंद
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेनंतर 'विकासा'चा आणखी एक मार्ग झाला बंद.
दुष्काळी तालुक्यात थंड प्रदेशातील राजमाची यशस्वी शेती
दुष्काळी तालुक्यात थंड प्रदेशातील राजमाची यशस्वी शेती.
पवार कुटुंबाची विद्या प्रतिष्ठानमध्ये बैठक; राज्याचं लक्ष
पवार कुटुंबाची विद्या प्रतिष्ठानमध्ये बैठक; राज्याचं लक्ष.
राजकीयदृष्टीनं सुरू असलेल्या चर्चेवरून दु:ख वाटतं! रोहित पवारांनी व्यक
राजकीयदृष्टीनं सुरू असलेल्या चर्चेवरून दु:ख वाटतं! रोहित पवारांनी व्यक.