नाशिक : नाशिक (Nashik) जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरण पाणीसाठ्यात वाढ झालीयं. गंगापूर धरणातून जवळपास दहा हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नाशिक शहरातील रामकुंड परिसरातील दुतोंड्या मारुतीच्या जवळपास मानेपर्यंत पाण्याची (water) पातळी वाढली आहे. यामुळे नागरिकांनी सर्तक राहवे असे आवाहन प्रशासनाकडून केले जातंय. इतकेच नाही तर महत्वाचे काम असल्याशिवाय घराच्या बाहेरही पडू नये, असे सांगण्यात आले.