
Bhagatsingh Koshyari on Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालकांना भाषिक मुद्दावरून चांगलेच घेरले. रटाळ प्रवचनाच्या राजकीय टीका टिप्पणी करू नका असे राज ठाकरे यांनी त्यांना सुनावले होते. त्यानंतर लागलीच त्यावर भाजपच्या गोटातून सणसणीत प्रतिक्रिया समोर आली आहे. राज ठाकरे हे नरेंद्र मोदींना जास्तच घाबरले आहेत असा खळबळजनक दावा माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केला आहे. या खळबळजनक दाव्याने नवीन वादाला फोडणी बसली आहे. तर मोदींना इतकी घाबरण्याची गरज नसल्याचा चिमटाही त्यांनी राज ठाकरे यांना काढला. काय म्हणाले कोश्यारी?
राज ठाकरे हे मोदींना जास्तच घाबरलेत
वरळी डोम येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला बॉलिवूड कलाकारांनी आणि इतर सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. त्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खरपूस समाचार घेतला. लोक घाबरून अशा रटाळ प्रवचनांना येतात असा टोला त्यांनी लगावला. सत्ता गेल्यानंतर हे लोक येथील का असा खोचक टोलाही त्यांनी लगावला होता. भाजपमधून यावर तीव्र प्रतिक्रिया येण्याची शक्यता होतीच. ती कमी माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भरून काढली.
जी लोक संघाच्या कार्यक्रमाला आली ती सर्व लोक नरेंद्र मोदींना घाबरली नसतील. मी राज ठाकरेंचा खूप सन्मान करतो. मात्र मला वाटतं ते नरेंद्र मोदींना जास्तच घाबरलेत. मोदींना घाबरू नका, त्यांच्या जवळ जा. जसे प्रभू श्रीरामाला सर्व समान होते तसेच नरेंद्र मोदींना देखील सर्वांना समान आहेत, असा सल्ला भगतसिंह कोश्यारी यांनी राज ठाकरे यांना दिला. नरेंद्र मोदींना घाबरू नका, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमित तुम्ही आहात तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. घाबरायचं असेल तर चुकीच्या कामांना घाबरा, असा टोलाही कोश्यारी यांनी बोलता बोलता लगावला.
मी अजितदादांना कधीच विसरणार नाही
आमदार रोहित पवार यांनी काल झालेल्या पत्रकार परिषदेत अजितदादांचा विमान अघात नाही तर शंभर टक्के घातपात असल्याचा आरोप केला. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. अजित पवार एक मोठे नेते होते. राज्यात माझ्यावर अनेकदा टीका झाली. मला दूषणं देण्यात आली. पण अजितदादांनी माझ्यावर कधीच टीका केली नाही. माझ्या कधीही ते विरोधात बोलले नाहीत. मी अजित दादा यांना कधीच विसरणार नाही असे कोश्यारी म्हणाले. तर रोहित पवार यांना घातपाताबाबत तसं वाटत असेल तर त्यांनी सरकारकडे चौकशीची मागणी करावी असा सल्लाही कोश्यारी यांनी दिला.
नाशिकमध्ये कॉरिडॉर व्हावा
40 वर्षांपूर्वी देखील मी नाशिकमध्ये आलो होतो. त्र्यंबकेश्वर आणि पंचवटी येथे आलो होतो. मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात. मी देखील आज एक भक्त म्हणून आलो आहे. राज्यपाल असताना देखील मी नाशिकमध्ये आलो होतो अशी आठवण भगतसिंह कोश्यारी यांनी जगावल्या. तर जसा अयोध्येत कॉरिडॉर झाला, तसा इथे देखील झाला पाहिजे अशी मोठी मागणीही त्यांनी केली.