AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कर्नाटकमधील काही संघटनांच्या नतद्रष्ट भूमिकेमुळे सातत्याने संघर्ष; सीमावादावर ठाकरे गटाने स्पष्ट मत

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादात महाराष्ट्राचा अभिमन्यू करण्याची कुणाची भूमिका असेल तर तो चक्रव्यूह कसा भेदयचा, हे महाराष्ट्राची जनता जाणून आहे अशी टीकाही त्यांनी केंद्रावर आणि राज्य सरकारवर केली आहे.

कर्नाटकमधील काही संघटनांच्या नतद्रष्ट भूमिकेमुळे सातत्याने संघर्ष; सीमावादावर ठाकरे गटाने स्पष्ट मत
| Updated on: Dec 14, 2022 | 3:59 PM
Share

मालेगावः महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद जोरदारपणे उफाळून आला असल्याने राज्य सरकारसह कर्नाटकातील सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील गावांवर दावा केल्यानंतर हा वाद आणखी चिघळला आहे. त्यावर शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी मत व्यक्त करताना त्यांनी कर्नाटक सराकरवर टीका केली आहे.

सीमावादावर बोलताना त्या म्हणाल्या की, कर्नाटकमधील काही संघटनांच्या नतद्रष्ट भूमिकेमुळे सातत्याने हा संघर्ष सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

एखाद्या देशाच्या पंतप्रधानांनी चौकीवर अधिकार मागवा त्याप्रमाणे हे वागणं सुरू आहे असा टोला त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारला लगावला आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादात महाराष्ट्राचा अभिमन्यू करण्याची कुणाची भूमिका असेल तर तो चक्रव्यूह कसा भेदयचा, हे महाराष्ट्राची जनता जाणून आहे अशी टीकाही त्यांनी केंद्रावर आणि राज्य सरकारवर केली आहे.

त्याचप्रमाणे कर्नाटकातील जे सीमाबांधव आहेत त्यांच्याविषयीही त्यांनी आपली भूमिका मांडत असताना आम्ही त्यांच्यासोबत असल्याचेही त्यांनी सांगितले.

ठाकरे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी हिवाळी अधिवेशनातील विषयावरही आपले मत त्यांनी व्यक्त केले. समाजकल्याण विभागानी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातील आणि इतर विभागांनी जिल्हानिहाय याची माहिती ठेवण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली.

त्याच बरोबर वसतिगृहातील विद्यार्थिनींचीही माहितीही महिला अधिकाऱ्यांनी ठेवावी. मुलींच्या अडचणी त्यांच्या तक्रारीरी काही असतील तर त्याचीही दखल अधिकाऱ्यांनी घेण्याची सूचना त्यांनी केली.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.