AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिकवरील पाणी कपातीचं संकट गडद, जलसंपदा विभागाचं पालिकेला पत्र, अधिक पाणी वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

जून महिना संपून जुलै महिन्यातील 10 दिवस उलटले तरी पावसानं दडी मारल्यानं नाशिक शहरावरील पाणी कपातीचं संकट अधिक गडद झालं आहे. नाशिककला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात गतवर्षीच्या तुलनेत कमी पाणीसाठा राहिला आहे.

नाशिकवरील पाणी कपातीचं संकट गडद, जलसंपदा विभागाचं पालिकेला पत्र, अधिक पाणी वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणी वाढले आहे.
| Edited By: | Updated on: Jul 10, 2021 | 4:44 PM
Share

नाशिक: जून महिना संपून जुलै महिन्यातील 10 दिवस उलटले तरी पावसानं दडी मारल्यानं नाशिक शहरावरील पाणी कपातीचं संकट अधिक गडद झालं आहे. नाशिककला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात गतवर्षीच्या तुलनेत कमी पाणीसाठा राहिला आहे. जलंसपदा विभागानं नाशिक महापालिकेला पाणी कपात करण्यासाठी पत्र लिहिलं आहे. नाशिक जिल्ह्याकडे पावसाने पाठ फिरवल्याने बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत आहे. जिल्ह्यातील 24 लहान मोठ्या धरणांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत कमी पाणीसाठा शिल्लक राहिला असल्यानं नाशिकककरांवर पाणी कपातीचं संकट ओढावणार हे निश्चित झालं आहे. (WRD wrote letter to Nashik Municipal Corporation for water supply reduce in city due to low rain in Nashik)

जलंसपदा विभागाचं पालिकेला पत्र

नाशिक शहरवासियांवरील पाणीकपातीचे संकट गडद झालं आहे. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने दडी मारल्याने पाणी कपातीच संकट ओढावलं आहे. गंगापूर धरणातील पाणी साठा गत वर्षीच्या तुलनेत कमी असल्यानं जलसंपदा विभागानं पालिकेला पाणी कपात करण्यासाठी पत्र लिहिलं आहे. पाणी जपून वापरण्या बरोबरच अतिरिक्त पाणी वापरल्यास दंडात्मक दरात आकारणी करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या कडूनही पालिका अधिकाऱ्यांना वेळीच पाणी कपातीचा निर्णय घेण्याचे आदेश यापूर्वीचं देण्यात आला आहे.

नाशिकमधील धरणांमध्ये 27 टकके पाणीसाठा

नाशिक जिल्ह्यातील लहान मोठ्या धरणांमध्ये केवळ 27 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणामध्ये पाणीसाठा कमी होत असल्यानं पाणी कपातीचं संकट उभं राहिलं आहे.

नाशिक जिल्ह्यावर दुष्काळाचं सावट

नाशिक जून महिना संपून जुलैचे दहा दिवस उलटले तरी जिल्ह्याकडे पावसाने पाठ फिरवली आहे. बळीराजा ही सध्या पावसाच्या प्रतिक्षेत आहे. पावसानं दडी मारल्यामुळे ग्रामीण भागात शेतीची कामं देखील मंदावली आहेत. पाऊस कमी प्रमाणात राहिल्यास नाशिक जिल्ह्यावर दुष्काळाच सावट निर्माण झालं आहे.

शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचं संकंट

नाशिक जिल्ह्यात गेल्या 15 दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पहिल्या टप्प्यात पेरणी केलेल्या शेतकऱ्यांसमोर आता दुबार पेरणीचे संकट उभे राहिलेय. रोहिणी नक्षत्रात झालेल्या पावसावर ग्रामीण भागात अनेक शेतकऱ्यांना पेरण्या करता आल्यात. मात्र, मृग नक्षत्रात अद्यापही पाऊस झालेला नाहीये आठवडाभरात पाऊस झाला नाही . नाशिक जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या पेरणी संकटात सापडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात गेल्या आठवड्यात खरिपाच्या 3.22 टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. परंतु, आता पाऊस लांबल्याने या पेरण्या वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

इतर बातम्या

नाशिकमध्ये पावसाची दडी, शेती कामांना ब्रेक, जिल्ह्यावर पाणी टंचाईचं सावट

नाशिककरांवर पाणी कपातीचं सावट, शेती कामं मंदावली, पावसाने दडी मारल्यानं चिंता वाढली

(WRD wrote letter to Nashik Municipal Corporation for water supply reduce in city due to low rain in Nashik)

Follow Us
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता.
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान.
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड.
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम.
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती.
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?.
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही.....
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही......
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?.
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके...
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके....
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं.