AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar Death: विमान अपघातातील सहावी व्यक्ती कुठे आहे? राष्ट्रवादीच्या नेत्याच्या 5 सवालाने सर्वच हादरले; दादांच्या कार्यक्रमपत्रिकेतील ती माहिती काय?

Ajit Pawar Death: अपघातात पाच व्यक्तींचे मृतदेह आढळले आहेत, अशात सहावी व्यक्ती कुठे? असा प्रश्न उपस्थित होत असताना, राष्ट्रवादीच्या नेत्याच्या 5 सवालाने सर्वच हादरले आहेत.. दादांच्या कार्यक्रमपत्रिकेतील ती माहिती काय?

Ajit Pawar Death: विमान अपघातातील सहावी व्यक्ती कुठे आहे? राष्ट्रवादीच्या नेत्याच्या 5 सवालाने सर्वच हादरले; दादांच्या कार्यक्रमपत्रिकेतील ती माहिती काय?
Ajit Pawar
| Updated on: Feb 02, 2026 | 12:01 PM
Share

Ajit Pawar Death: महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. दादांच्या अकस्मित निधनानंतर राज्य अद्यापही धक्क्यात असताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि अजित पवारांचे जवळचे मानले जाणारे अमोल मिटकरी यांनी दुःख व्यक्त करत पाच प्रश्न उपस्थित केले आहे. अमोल मिटकरी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांनंतर आता संशयास्पद बाबींकडे सर्वांचं लक्ष वेधलं आहे. या पाच प्रश्नांनंतर घातपात तर नाही ना? अशी चर्चा देखील रंगू लागली आहे.

एक्सवर एक ट्विट करत अमोल मिटकरी यांनी काही फोटो पोस्ट केले आहेत. दादांसोबतच्या आठवणी देखील त्यांनी ताज्या केल्या. दादा गेले हे अजूनही कुणाचंच मन मान्यायला तयार नाही… असं म्हणत अमोल मिटकरी म्हणाले, मृत्यूचे राजकारण करण्याचं पाप मी तरी करणार नाही. मात्र हे प्रश्न माझं मन विचारतंय.. सध्या त्यांची पोस्ट व्हायरल होत आहे.

पोस्टमध्ये काय म्हणाले अमोल मिटकरी?

आदरणीय दादा गेले हे अजूनही कुणाचंच मन मानायला तयार नाही. काल देवगिरीवरील त्या दोन खुर्च्या बघून परत डोळे पाणावले… त्यातील पहिली खुर्ची – सामान्य माणसाची कामे वा तक्रार नीट बाजूला बसून ऐकणाऱ्या व्यक्तीची. आणि दुसरी – आदरणीय दादांची!!

मृत्यूच्या अगोदरिल दिवशी दुपारनंतर कुठलाच कार्यक्रम नव्हता. दादा याच ठिकाणी पक्षातील कार्यकर्त्यांना भेटल्याचे काल समजले. दुसऱ्या दिवशी याच खुर्चीवरून कामे आटोपून दादा बारामतीकडे निघाले. गेले तीन दिवस मनात शंकेचं काहूर आहे.

प्रश्नांचा आगडोंब उसळतोय. मृत्यूचे राजकारण करण्याचं पाप मी तरी करणार नाही.

मात्र हे प्रश्न माझं मन विचारतंय—

अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला, मग प्रत्यक्षात 5 मृतदेहच का सापडले?

सहावी व्यक्ती कुठे गेली?

Take-off आधी प्रवासी यादी digitally नोंदलेली असते, मग विसंगती का?

एकादाही कागदाचा तुकडा जळालेला का दिसत नाही???

एवढ्या वेळा पायलट का बदलले गेले?

प्रश्न विचारणं म्हणजे अफवा नाही… असं अमोल मिटकरी पोस्ट करत म्हणाले आहे.

Follow Us
अब की बार पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार; कायदा-सुव्यवस्था आणि भाजप.....
अब की बार पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार; कायदा-सुव्यवस्था आणि भाजप......
अंगारक चतुर्थीला दगडूशेट मंदिरात भाविकांची गर्दी; पहाटेपासून....
अंगारक चतुर्थीला दगडूशेट मंदिरात भाविकांची गर्दी; पहाटेपासून.....
बंगालमध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, म्हणाले
बंगालमध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, म्हणाले.
5 राज्यांच्या निकालानंतर मोदींचा मोठा दावा; बंगालसह आसाममध्ये विजय....
5 राज्यांच्या निकालानंतर मोदींचा मोठा दावा; बंगालसह आसाममध्ये विजय.....
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व; मोदींकडून कार्यकर्त्यांचं कौतुक
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व; मोदींकडून कार्यकर्त्यांचं कौतुक.
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा दणदणीत विजय; पंतप्रधान मोदींकडून कौतुक...
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा दणदणीत विजय; पंतप्रधान मोदींकडून कौतुक....
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा रेकॉर्ड ब्रेक विजय
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा रेकॉर्ड ब्रेक विजय.
नसरापूर अत्याचार प्रकणातील आरोपीच्या पत्नीची ओक्शाबोक्शी रडत पहिली...
नसरापूर अत्याचार प्रकणातील आरोपीच्या पत्नीची ओक्शाबोक्शी रडत पहिली....
पश्चिम बंगालमधील भवानीपूर मतमोजणी केंद्राबाहेर मोठा गोंधळ, स्वत: ममता
पश्चिम बंगालमधील भवानीपूर मतमोजणी केंद्राबाहेर मोठा गोंधळ, स्वत: ममता.
आसामच्या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांचा करिष्मा, फडणवीसांनी प्रचार...
आसामच्या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांचा करिष्मा, फडणवीसांनी प्रचार....