NCP Meeting : राष्ट्रवादीच्या नेत्यांची आज रॅपिड बैठक, पुन्हा ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार, राष्ट्रवादीची तयारी सुरू

| Updated on: May 04, 2022 | 4:41 PM

राष्ट्रवादीच्या नेत्यांची आज मुंबईत बैठक पार पडणार आहे. सहाजिकच त्या बैठकीत सध्याची राज्यातली परिस्थिती आणि आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता आहे. राज्यातील विविध मुद्द्यांवर चर्चा होईल, अशी माहिती या बैठकीआधी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. 

NCP Meeting : राष्ट्रवादीच्या नेत्यांची आज रॅपिड बैठक, पुन्हा ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार, राष्ट्रवादीची तयारी सुरू
पुन्हा ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार, राष्ट्रवादीची तयारी सुरू
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : राज्यात सध्या अनेक मुद्द्यांवरून जोरदार पॉलिटिकल ड्रामा सुरू आहे. एकिकडे मशीदीवरील भोंग्याचा (Loudspeaker Row) मुद्दा गाजतोय. तर दुसरीकडे हिंदुत्वावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. अशातच आता सुप्रीम कोर्टाने राज्य शासनाला आणखी एक दणका दिला आहे. कारण ओबीसी आरक्षणाचं (OBC Reservation) घोंगड सुप्रीम कोर्टात (Supreme Court) भिजत पडलं असताना आता दोन आठवड्यात पुन्हा निवडणुका जाहीर करण्याचे आदेश दिले आहे. तर या निवडणुका या पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणाशिवायच होणार आहेत. त्यामुळे आता पुन्हा ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी या निवडणुकांसाठी कंबर कसताना दिसून येत आहे. कारण राष्ट्रवादीच्या नेत्यांची आज मुंबईत बैठक पार पडणार आहे. सहाजिकच त्या बैठकीत सध्याची राज्यातली परिस्थिती आणि आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता आहे. राज्यातील विविध मुद्द्यांवर चर्चा होईल, अशी माहिती या बैठकीआधी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे.

विनाआरक्षण निवडणुकीसाठी प्लॅन काय?

गेल्या वेळी पार पडलेल्या निवडणुका या विनाओबीसी आरक्षण पार पडल्या आहेत. त्यामुळे ओबीसींना त्याचा काहीसा फटका तर नक्कीच बसला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षण नेहमीच महत्वाची भूमिका बजावत आलंय. मागे पार पडलेल्या ग्रामपंचायची आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा वरचष्मा राहिला आहे. त्यामुळे आता पुन्हा निवडणुकींसाठी राष्ट्रवादी काय रणनिती आखते, हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तसेच या निवडणुकीत ओबीसींना न्याय देत कोणतं गणित लावलं जाणार, याबाबतही राष्ट्रवादीच्या या बैठकीत चर्चा होऊ शकते.

हे सुद्धा वाचा

राज ठाकरेंना थोपवण्यावर चर्चा होणार?

राज्यात सध्या मनसेने रान पेटवलं आहे. अजान ऐकायला आली इकडून मनसे कार्यर्तेही लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा लावत आहे. त्यामुळे राज्यात सध्या हायव्होल्टेज ड्रामा सुरू आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनावरही मोठा ताण आला आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही पोलीस प्रशासनाची आहे. तसेच सध्या गृहखातं हे राष्ट्रवादीकडे आहे. त्यामुळे सध्याच्या पॉलिटिकल राड्यावरही चर्चा होऊ शकते. कुणी कायदा हाहात घेण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या पोलीस योग्य ती कारवाई करतील असा इशारा आधीच राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिला आहे. मात्र आमच्यासाठी राज ठाकरेंचा आदेश हा सर्वात महत्वाचा आहे. आम्ही हनुमान चालीसा लावणारच अशी भूमिका काही ठिकाणचे मनसे नेते घेताना दिसून येत आहे. त्यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.