AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NCP vs. Shiv Sena | कलियुगात नारदमुनींकडून भरीव होण्याची अपेक्षा फोल; परांजपेंची म्हस्केंवर टीका

आनंद परांजपे म्हणाले की, मिशन कळवाला कमिशन ठाणे ही रिअॅक्शन आहे. पक्षावर आघात करणार असाल, तर त्याला उत्तर देण्याची जबाबदारी माझी आहे.

NCP vs. Shiv Sena | कलियुगात नारदमुनींकडून भरीव होण्याची अपेक्षा फोल; परांजपेंची म्हस्केंवर टीका
Naresh Mhaske, Anand Paranjape
| Edited By: | Updated on: Jan 16, 2022 | 1:26 PM
Share

ठाणेः ऐन ठाणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये जोरदार जुंपली आहे. उड्डाणपुलाच्या लोकार्पण कार्यक्रमात तर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये बाचाबाची झाली. त्याचे दर्शन उभ्या महाराष्ट्राला झाले. त्यामुळे राज्यात जरी एकत्र असले, तरी स्थानिक पातळीवरची खदखद पुन्हा बाहेर येत आहे. आता त्याच खदखदीला आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आनंद परांजपे यांनी तोंड फोडत महापौर नरेश म्हस्के यांच्यावर पत्रकार परिषद घेत जोरदार टीका केली आहे. कलियुगात नारदमुनीकडून काही भरीव होईल, ही अपेक्षा नरेश म्हस्के यांनी फोल ठरविली आहे, अशा शब्दांत त्यांनी म्हस्के यांचा समाचार घेतला.

काय म्हणाले परांजपे?

पत्रकार परिषदेत आनंद परांजपे म्हणाले की, उद्घाटन सोहळा साजरा होताना साऱ्यांनी खेळीमेळीच्या वातावरणात आपली भूमिका मांडली. मात्र, जितेंद्र आव्हाड यांनी मांडलेल्या भूमिकेवर महापौर नरेश म्हस्के, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी टीका केली. शिवसेनेने केलेल्या या टीकेचा आम्ही निषेध करतो. कलियुगात नारदमुनीकडून काही भरीव होईल, ही अपेक्षा नरेश म्हस्के यांनी फोल ठरविली आहे. खरे तर नरेश म्हस्के हे संपूर्ण सभागृहाचे नेते आहेत. त्यांनी त्याची खबरदारी कधी घेतली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नरसेवकांना ते अपमानास्पद वागणूक देत आहेत. त्यांना मग्रुरी आली असून, हे वर्तन अशोभनीय असल्याचेही ते म्हणाले.

बोलताना भान ठेवा

परांजपे पुढे म्हणाले की, निधी आम्ही दिला हे सांगणे चुकीचे आहे. नशीब उड्डाणपुलाचे काम आमच्या निधीने झाले असं म्हणाले नाहीत. श्रीकांत शिंदे यांचे श्रेय राष्ट्रवादी घेणार नाही. मात्र, बोलताना भान ठेवणे गरजेचे आहे. बापाची चप्पल मुलाच्या पायात आली म्हणजे मुलगा बाप होत नाही, असा खरपूस समाचार घेत त्यांनी दिव्याच्या उड्डाणपुलाची टाईमलाईन जाहीर करावी, असे आवाहन केले. मलंगड येथील काम रखडलेले आहे. मानकोली, मोठगाव हे कधी होणार, विकास 2014 नंतर सुरू झाला. विकासाचे बाळ सात वर्षांचे झाले का, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

कळव्यावरची रिअॅक्शन

परांजपे म्हणाले की, मिशन कळवाला कमिशन ठाणे ही रिअॅक्शन आहे. पक्षावर आघात करणार असाल, तर त्याला उत्तर देण्याची जबाबदारी माझी आहे. जितेंद्र आव्हाड हे महाविकास आघाडीची भूमिका जबाबदारीने मांडतील. आम्ही कार्यकर्ते आदेश मानणारे आहोत. खरे तर माझी खासदारांना बोलवण्याची पद्धत नाही, असे नरेश म्हस्के म्हणाले. त्यांच्याकडून आम्ही अधिक अपेक्षा ठेवत नाही.

संबंधित बातम्या

Special Report | किरण मानेंना मालिकेतून काढण्याचा वाद पेटला, गावकऱ्यांनी मालिकेचं चित्रीकरण बंद पाडलं

वाढत्या महागाईविरोधात काँग्रेस आक्रमक, रविवारी केंद्र सरकारविरोधात राज्यभरात आंदोलन, मोदींना पाठवणार सिलिंडर

Goa Elections 20022 : उत्पल पर्रिकरांच्या तिकीटावरून रणकंदन, परीकरांना कुणाची ऑफर? वाचा सविस्तर

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.