NCP vs. Shiv Sena | कलियुगात नारदमुनींकडून भरीव होण्याची अपेक्षा फोल; परांजपेंची म्हस्केंवर टीका

आनंद परांजपे म्हणाले की, मिशन कळवाला कमिशन ठाणे ही रिअॅक्शन आहे. पक्षावर आघात करणार असाल, तर त्याला उत्तर देण्याची जबाबदारी माझी आहे.

NCP vs. Shiv Sena | कलियुगात नारदमुनींकडून भरीव होण्याची अपेक्षा फोल; परांजपेंची म्हस्केंवर टीका
Naresh Mhaske, Anand Paranjape
Follow us
| Updated on: Jan 16, 2022 | 1:26 PM

ठाणेः ऐन ठाणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये जोरदार जुंपली आहे. उड्डाणपुलाच्या लोकार्पण कार्यक्रमात तर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये बाचाबाची झाली. त्याचे दर्शन उभ्या महाराष्ट्राला झाले. त्यामुळे राज्यात जरी एकत्र असले, तरी स्थानिक पातळीवरची खदखद पुन्हा बाहेर येत आहे. आता त्याच खदखदीला आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आनंद परांजपे यांनी तोंड फोडत महापौर नरेश म्हस्के यांच्यावर पत्रकार परिषद घेत जोरदार टीका केली आहे. कलियुगात नारदमुनीकडून काही भरीव होईल, ही अपेक्षा नरेश म्हस्के यांनी फोल ठरविली आहे, अशा शब्दांत त्यांनी म्हस्के यांचा समाचार घेतला.

काय म्हणाले परांजपे?

पत्रकार परिषदेत आनंद परांजपे म्हणाले की, उद्घाटन सोहळा साजरा होताना साऱ्यांनी खेळीमेळीच्या वातावरणात आपली भूमिका मांडली. मात्र, जितेंद्र आव्हाड यांनी मांडलेल्या भूमिकेवर महापौर नरेश म्हस्के, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी टीका केली. शिवसेनेने केलेल्या या टीकेचा आम्ही निषेध करतो. कलियुगात नारदमुनीकडून काही भरीव होईल, ही अपेक्षा नरेश म्हस्के यांनी फोल ठरविली आहे. खरे तर नरेश म्हस्के हे संपूर्ण सभागृहाचे नेते आहेत. त्यांनी त्याची खबरदारी कधी घेतली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नरसेवकांना ते अपमानास्पद वागणूक देत आहेत. त्यांना मग्रुरी आली असून, हे वर्तन अशोभनीय असल्याचेही ते म्हणाले.

बोलताना भान ठेवा

परांजपे पुढे म्हणाले की, निधी आम्ही दिला हे सांगणे चुकीचे आहे. नशीब उड्डाणपुलाचे काम आमच्या निधीने झाले असं म्हणाले नाहीत. श्रीकांत शिंदे यांचे श्रेय राष्ट्रवादी घेणार नाही. मात्र, बोलताना भान ठेवणे गरजेचे आहे. बापाची चप्पल मुलाच्या पायात आली म्हणजे मुलगा बाप होत नाही, असा खरपूस समाचार घेत त्यांनी दिव्याच्या उड्डाणपुलाची टाईमलाईन जाहीर करावी, असे आवाहन केले. मलंगड येथील काम रखडलेले आहे. मानकोली, मोठगाव हे कधी होणार, विकास 2014 नंतर सुरू झाला. विकासाचे बाळ सात वर्षांचे झाले का, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

कळव्यावरची रिअॅक्शन

परांजपे म्हणाले की, मिशन कळवाला कमिशन ठाणे ही रिअॅक्शन आहे. पक्षावर आघात करणार असाल, तर त्याला उत्तर देण्याची जबाबदारी माझी आहे. जितेंद्र आव्हाड हे महाविकास आघाडीची भूमिका जबाबदारीने मांडतील. आम्ही कार्यकर्ते आदेश मानणारे आहोत. खरे तर माझी खासदारांना बोलवण्याची पद्धत नाही, असे नरेश म्हस्के म्हणाले. त्यांच्याकडून आम्ही अधिक अपेक्षा ठेवत नाही.

संबंधित बातम्या

Special Report | किरण मानेंना मालिकेतून काढण्याचा वाद पेटला, गावकऱ्यांनी मालिकेचं चित्रीकरण बंद पाडलं

वाढत्या महागाईविरोधात काँग्रेस आक्रमक, रविवारी केंद्र सरकारविरोधात राज्यभरात आंदोलन, मोदींना पाठवणार सिलिंडर

Goa Elections 20022 : उत्पल पर्रिकरांच्या तिकीटावरून रणकंदन, परीकरांना कुणाची ऑफर? वाचा सविस्तर

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.