Nitesh Rane : ते आपल्या पोटात विष मिसळतात, नितेश राणेंनी तुकाराम मुंढेंना कॉल करून कुठे धाड टाकण्याचा सल्ला दिला?
Nitesh rane : मंत्री नितेश राणे यांनी वराह जयंतीनिमित्त तुकाराम मुंढे यांना एक सल्ला दिला. त्यांनी एका ठिकाणाी धाड टाकण्याचा सल्ला दिला. त्याचबरोबर भयंकर प्रकार देखील आयएएस मुंढे यांना सांगितला.

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त IAS तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यभर कारवाईचा धडाका सुरू आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून भेसळ रोखत कारवाईचा दणका दिला जात आहे. अनेक सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंढेंच्या विभागाने सर्वत्र जोरदार कारवाई केली आहे. अनेक व्यापाऱ्यांचे परवाने देखील निलंबित केले आहेत. कारवाईचा धडाका लावणारे तुकाराम मुंढे यांना मंत्री नितेश राणे यांनी फोन करून सल्ला दिला आहे. मुंढेंनी हाजी अली ज्युस सेंटवर धाड टाकावी, असा सल्ला दिला.
मंत्री नितेश राणे यांनी नवी मुंबईत वराह जयंतीच्या दिवशी केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे. राणे म्हणाले, ‘तुकाराम मुंढे इथे फिरूही शकत नाहीत, इतके चांगले मोदक आहेत. मी तुकाराम मुंढे यांना कॉल केला , की जरा हाजी अली ज्युस सेंटरवर धाड टाका. बडे मिया वगैरे या स्टॉल्सवर धाडी टाका, ते फालुदामध्ये रंग मिसळून आमच्या पोटात विष टाकण्याचं काम करत आहेत, असा आरोप त्यांनी केला.
नवी मुंबईतील उलवे येथील एका कार्यक्रमात मंत्री नितेश राणे म्हणाले, कृष्णा हिंदू बेकरीचे उद्घाटन आज झालेलं आहे. आपण जो काही पदार्थ हातात घेतो, विकत घेतो, त्यामध्ये थुंकलेलं आपल्याला आवडणार का? थुंक जिहादविषयी माझ्या तरुण सहकाऱ्यांनी सांगितलं. गल्ल्याच्या पलीकडे जर कोणी अब्दुल बसला असेल आणि तो जर आपल्याला काही विकत देत असेल, तर त्याच्या धर्मामध्ये तो जे काही थुंकल्याशिवाय विकतो, ते त्याच्या अल्लाहपर्यंत पोहोचणार नाही, असे त्याच्या कुराणमध्ये लिहिलं आहे. कोणताही अब्दुल त्याच्यामध्ये थुंकल्याशिवाय देणार नाही, कोणताही संशय असेल तर त्याला माझ्या बाजुला उभं करा आणि विचार मी जे बोलतोय ते खरं बोलतो की खोटं? त्यांच्या इस्लाममध्ये त्यांना जे काही विकायचं आहे, ते तोपर्यंत त्याच्यात थुंकत नाही, तोपर्यंत त्यांच्या अल्लाहपर्यंत पोहोचत नाही.
‘जिहादसाठी हे काही पैसे जमा करतात, ते तुमच्याकडून घेऊन जकातमध्ये जमा करतात. समोरचा व्यक्ती जोपर्यंत हिंदू नाही, हनुमान चाळीसा आली पाहिजे, तरच मी त्याच्याकडून विकत घेईल ही भूमिका प्रत्येक हिंदूने घेणं गरजेचे आहे. मदरसा आणि मशिदीमध्ये हनुमान चाळीसा शिकवत नाही, फक्त आतंकवाद शिकवतात. त्यांच्या कुठल्याही सणमध्ये हिंदूला परवानगी नाही, दुकान लावण्याची, चुकून हिंदू दिसला तरी त्यांचे फतवे चालू होतात. मुस्लिम लोकांनी उलव्यात लकी मराठा नावाने चार दुकाने उघडलेली आहे, आता त्यांचा काय कार्यक्रम करायचं ते करू. आपलं हिंदू राष्ट्रच आहे , भाई चारा टाका पाकिस्तानच्या XXXX, आमच्यात आणू नका, मी तुकाराम मुंडे यांना सांगणार आहे, थोड हाजी अली ज्यूस सेंटरमध्ये घुसा, जरा बडे मियामध्ये घुसा, जे विष टाकतात ते बघा, असे नितेश राणेंनी सांगितले.